शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

‘एसटी’तील रोजंदार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली.

ठळक मुद्देकामावर बोलावून घ्या । लालपरीचा आंतरजिल्हा प्रवास सुरू, महामंडळाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लालपरीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. आता गट क्र.१ मधील रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यात यावा, ही मागणी पुढे आली आहे. यवतमाळ विभागात ११९ कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली. हे कर्मचारी कामावर रुजू होऊन अवघे काही महिने झाले होते. लॉकडाऊनमुळे सेवा खंडित झाल्याने त्यांना धक्का बसला. आधीची सर्व कामे सोडून ते लालपरीच्या सेवेत रुजू झाले. अचानक कामबंद झाल्याने या कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. आज पाच महिन्यांपासून ते कामावर नाहीत. आता महामंडळाची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे. बसफेऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात यावे, अशी मागणी आहे.संपूर्ण राज्यभरात सन २०१९ मध्ये विविध पदांसाठी महामंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. सुमारे चार हजार ५०० पदे या अंतर्गत भरली जाणार होती. पैकी एक हजार ३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यात चालक-वाहक यांचाही समावेश होता. या चालक, वाहकांना रोजंदार गट क्र.१ मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. एसटीच्या सेवेत रुजू झाल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आधीची कामे सोडून दिली. तेथून अवघ्या काही दिवसातच त्यांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात आले. ‘काम नाही तर दाम नाही’ असे एसटीचे धोरण आहे. याच धोरणाचे हे कर्मचारी बळी ठरले आहे. आज पाच महिन्यांपासून त्यांना खर्च भागविताना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून या लोकांना कामावर घेण्याची मागणी होत आहे.‘इंटक’ची राज्यव्यापी आंदोलनाची तयारीसरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग, अधिकारी आणि अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटी