शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘एसटी’तील रोजंदार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न तातडीने मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली.

ठळक मुद्देकामावर बोलावून घ्या । लालपरीचा आंतरजिल्हा प्रवास सुरू, महामंडळाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लालपरीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. आता गट क्र.१ मधील रोजंदार कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेत त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यात यावा, ही मागणी पुढे आली आहे. यवतमाळ विभागात ११९ कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्याची प्रतीक्षा आहे.लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली. कालांतराने जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक सुरू करताना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले नियम पाळण्याचे आदेश धडकले. शिवाय प्रवासी संख्याही नाममात्र मिळत गेली. अतिशय कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्याने महामंडळाने गट क्र.१ मध्ये नेमणूक दिलेल्या यवतमाळ विभागातील ११९ रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केली. हे कर्मचारी कामावर रुजू होऊन अवघे काही महिने झाले होते. लॉकडाऊनमुळे सेवा खंडित झाल्याने त्यांना धक्का बसला. आधीची सर्व कामे सोडून ते लालपरीच्या सेवेत रुजू झाले. अचानक कामबंद झाल्याने या कर्मचाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. आज पाच महिन्यांपासून ते कामावर नाहीत. आता महामंडळाची आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली आहे. बसफेऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात यावे, अशी मागणी आहे.संपूर्ण राज्यभरात सन २०१९ मध्ये विविध पदांसाठी महामंडळाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. सुमारे चार हजार ५०० पदे या अंतर्गत भरली जाणार होती. पैकी एक हजार ३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. यात चालक-वाहक यांचाही समावेश होता. या चालक, वाहकांना रोजंदार गट क्र.१ मध्ये नियुक्त्या देण्यात आल्या. या रोजंदार कर्मचाऱ्यांची सेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. एसटीच्या सेवेत रुजू झाल्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांनी आधीची कामे सोडून दिली. तेथून अवघ्या काही दिवसातच त्यांना कामावर येऊ नका, असे सांगण्यात आले. ‘काम नाही तर दाम नाही’ असे एसटीचे धोरण आहे. याच धोरणाचे हे कर्मचारी बळी ठरले आहे. आज पाच महिन्यांपासून त्यांना खर्च भागविताना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. म्हणून या लोकांना कामावर घेण्याची मागणी होत आहे.‘इंटक’ची राज्यव्यापी आंदोलनाची तयारीसरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक, सहायक, लिपिक टंकलेखक, राज्य संवर्ग, अधिकारी आणि अनुकंपा तत्त्वावर कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यात यावे. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेतर्फे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी दिला आहे.

टॅग्स :state transportएसटी