शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

प्रगतिशील शेतकऱ्यांनी इतरांना प्रोत्साहित करावे

By admin | Updated: March 7, 2016 02:18 IST

जिल्ह्यात अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. यात चांगले यश मिळविलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत कथन करून त्यांनाही ....

सचिंद्र प्रताप सिंह : आत्मा नियामक मंडळाची बैठक, नवीन प्रयोगातून शेतीमध्ये यशयवतमाळ : जिल्ह्यात अनेक शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. यात चांगले यश मिळविलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव इतर शेतकऱ्यांसोबत कथन करून त्यांनाही नवीन प्रयोगासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील गार्डन हॉल येथे आत्मा नियामक मंडळाची सभा शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गायकवाड, आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, कृषी विकास अधिकारी जगन राठोड यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. अनेक शेतकरी विविध प्रयोगांद्वारे चांगले उत्पन्न मिळवित आहेत. या शेतकऱ्यांचे अन्य शेतकऱ्यांकडून अनुकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले. आत्माच्या वतीने तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटाच्या वतीने चांगले काम होत आहे, भाजीपाला उत्पादक गटातील शेतकऱ्यांना हक्काचे विक्रीकेंद्र उपलब्ध करून देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय तालुकास्तरावर अन्य महत्त्वाच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी कृषी विभागास केल्या.यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळी उपलब्ध करून देण्याबाबत काही सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. जे शेतकरी यासाठी अर्ज करतील, अशांना प्राधान्याने सदर चाळी उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासोबतच शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींची दुरूस्ती, आत्माच्या शेतकरी गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची उपलब्धता यासोबतच विविध विषयांवर बैठकीत चर्चा झाली.यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनी आत्मा नियामक मंडळाच्या वतीने होत असलेल्या विविध कामांची माहिती बैठकीत सादर केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. (प्रतिनिधी)