शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
2
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
3
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
4
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
5
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
6
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
7
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
8
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
9
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
10
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
11
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
12
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
13
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
14
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
15
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
16
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
17
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
18
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
19
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
20
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती खुंटली

By admin | Updated: September 28, 2016 00:22 IST

कार्यकाळ संपूनही गेल्या चार वर्षांपासून प्रभारी संचालक मंडळ असल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वांगीण प्रगती खुंटली आहे.

प्रभारी संचालक मंडळाचा परिणाम : ठेवी दोन हजार कोटींच्या आतचयवतमाळ : कार्यकाळ संपूनही गेल्या चार वर्षांपासून प्रभारी संचालक मंडळ असल्याने यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वांगीण प्रगती खुंटली आहे. आता तर या संचालक मंडळाला युती सरकारमधूनही पाठबळ मिळत असल्याने या बँकेच्या भविष्यातील प्रगतीवरही प्रश्नचिन्ह लावले जात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ डिसेंबर २०१२ ला संपला. परंतु आजतागायत हेच संचालक मंडळ कार्यरत आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून एकाच संचालक मंडळाकडे बँकेची धुरा आहे. मात्र त्यानंतरही या बँकेची अपेक्षित प्रगती या संचालक मंडळाला साधता आलेली नाही. विद्यमान संचालक मंडळाने नऊ वर्षांपूर्वी सूत्रे स्वीकारली तेव्हा बँकेच्या ठेवी एक हजार कोटींच्या होत्या. आज या ठेवी १९०० कोटींवर पोहोचल्या आहेत. परंतु त्यात दरवर्षी ठेवींमध्ये सरासरी होणारी १० टक्के वाढ आणि सुमारे १०० कोटींच्या व्याजाची पडणारी भर याचेच योगदान अधिक असल्याचे सांगितले जाते. मुळात ठेवी वाढविण्याबाबत संचालक मंडळ, प्रशासन व व्यवस्थापनाकडून तसेच कर्मचारी संघटनांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचे दिसत नाही. बँकेला प्रगतीपथावर नेण्याची धडपड या घटकांमध्ये पहायला मिळाली नाही. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या ठेवी सहा हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. अकोला सारख्या जिल्हा बँकेच्या ठेवी अडीच हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. परंतु यवतमाळ जिल्हा बँकेच्या ठेवींनी अद्याप दोन हजार कोटींचाही पल्ला गाठलेला नाही. आधीच निष्क्रियतेचा ठपका संचालक मंडळावर आहे. त्यातच हे संचालक मंडळ सलग नऊ वर्षांपासून असल्याचा हा परिणाम मानला जातो. नव्या शाखा, आधुनिकीकरण, एटीएम, आॅनलाईन व्यवहार यामध्ये बँकेने फारशी प्रगती साधली नसल्याचा सहकार क्षेत्रातील सूर आहे. बँक आणि संचालक मंडळाच्या ईमेजवर प्रगती अवलंबून असते. जिल्हा बँकेच्या ठेवी गेल्या नऊ वर्षात किमान चार हजार कोटींवर जाणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येते. मात्र अर्ध्यावरच ही प्रगती खुंटली. वास्तविक सलग नऊ वर्षाचा कार्यकाळ लाभलेल्या या संचालक मंडळाला संस्थांचा विकास, नवीन सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, बचत गटाची मोहीम, शेतकऱ्यांचे मेळाव्यांमधून प्रबोधन, दर्जेदार कर्मचाऱ्यांची भरती यावर भर देणे सहज शक्य झाले असते. मात्र इच्छाशक्तीची उणीव तेथे जाणवली. बॅकेच्या या खुंटलेल्या प्रगतीला संचालक मंडळासोबतच एक तांत्रिक तज्ज्ञ तथा स्वयंघोषित पीएलाही तेवढेच जबाबदार मानले जात आहे. बँकेचे नवे प्रशासन नावाप्रमाणे ताठर भूमिका घेईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात उलटेच झाल्याच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे. (जिल्हा प्रतिनिधी) लिपिकाच्या ३०० जागांचा प्रस्ताव नाबार्डकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरतीही प्रभारी संचालक मंडळामुळे खुंटली आहे. काही महिन्यांपूर्वी लिपिकांच्या ३०० जागांचा प्रस्ताव नाबार्डकडे त्रुट्या दुरुस्त करून पाठविण्यात आला. हा प्रस्ताव थंडबस्त्यात ठेवण्यामागे आतापर्यंत ‘प्रभारी संचालक मंडळ’ हे कारण सांगितले जात होते. परंतु आता हा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. काही संचालकांचा विविध प्रकरणातील ‘हातखंडा’ पाहता ते लिपिक भरतीचा हा प्रस्तावही नाबार्डकडून मंजूर करून आणतील, असा विश्वास बँकेतीलच काही कर्मचारी व्यक्त करीत आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर थेट चौकशीला स्थगनादेश मिळविणाऱ्या या संचालकांसाठी लिपिक भरतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळविणे आणि आपल्याच कार्यकाळात ३०० जागांची भरती करून घेणे कठीण नसल्याचे मानले जात आहे.