शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:39 IST

कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांमध्ये नैराश्य : दातोडी व सायतखर्डा येथे ‘सरकार आपल्या दारी’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे, हे वास्तव दातोडी (ता. आर्णी), सावरगाव व सायतखर्डा (ता. पांढरकडा) येथे झालेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात पुढे आले.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकºयांनी त्यांच्यापुढे निर्माण झालेले प्रश्न मांडले. मागणी आल्यास पाणी सोडा, असे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी आॅक्टोबर महिन्यात दिले. मात्र सिंचन विभागाने हा आदेश झिडकारला, असा आरोप दातोडी येथील शेतकरी प्रल्हाद पाटील जगताप यांनी केला. वेणी धरणाचे पाणी तत्काळ सोडा आणि लोअर पैनगंगा धरणविरोधी कार्यकर्त्यांवरील खटले तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.वीज बिल भरा, नाहीतर वीज कपात केली जाईल, असा दम विद्युत कंपनीकडून भरला जात आहे. शेतकºयांना कमीत कमी अखंडित आठ तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही आणि तीही पूर्ण दाबाने पुरविली जात नाही, दररोज शेकडो मोटारी जळत आहे आदी तक्रारी यावेळी करण्यात आल्या. घाटंजी, आर्णी, वणी आणि झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, दातोडीचे सरपंच विकास उईके, मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य पावनी कल्यमवार, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, सायतखर्डाच्या सरपंच मालनबाई शेंडे आदींनी यावेळी केली.यावेळी सुरेश बोलेनवार, बाबूलाल मेश्राम, माधवराव टेकाम, अंकित नैताम, मधुकर घसाळकर, दत्ता सिडाम, कार्यक्रमाचे संयोजक तुकाराम मोहुर्ले, अजय रेड्डी येल्टीवार, लक्ष्मण मुजमुले, संदीप गाडगे, ओमप्रकाश जगताप, अशोक पाटील, रघुनाथ शेंडे, संतोष मोहुर्ले, मधुकर चौधरी, विष्णू शेंडे, तानबा आडे, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस