शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

कापूस उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:39 IST

कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देदुष्काळग्रस्तांमध्ये नैराश्य : दातोडी व सायतखर्डा येथे ‘सरकार आपल्या दारी’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कापसाची उलंगवाडी दिवाळीपूर्वीच झाली. सरासरी दोन ते तीन क्विंटल उत्पन्न झाले. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. अशातच रबीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकºयांना महावितरण आणि सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाला सामोरे जावे लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येत आहे, हे वास्तव दातोडी (ता. आर्णी), सावरगाव व सायतखर्डा (ता. पांढरकडा) येथे झालेल्या ‘सरकार आपल्या दारी’ कार्यक्रमात पुढे आले.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी शेतकºयांनी त्यांच्यापुढे निर्माण झालेले प्रश्न मांडले. मागणी आल्यास पाणी सोडा, असे आदेश पालकमंत्री मदन येरावार यांनी आॅक्टोबर महिन्यात दिले. मात्र सिंचन विभागाने हा आदेश झिडकारला, असा आरोप दातोडी येथील शेतकरी प्रल्हाद पाटील जगताप यांनी केला. वेणी धरणाचे पाणी तत्काळ सोडा आणि लोअर पैनगंगा धरणविरोधी कार्यकर्त्यांवरील खटले तत्काळ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली.वीज बिल भरा, नाहीतर वीज कपात केली जाईल, असा दम विद्युत कंपनीकडून भरला जात आहे. शेतकºयांना कमीत कमी अखंडित आठ तास वीज देण्याची हमी दिल्यानंतरही जेमतेम तासभरही आणि तीही पूर्ण दाबाने पुरविली जात नाही, दररोज शेकडो मोटारी जळत आहे आदी तक्रारी यावेळी करण्यात आल्या. घाटंजी, आर्णी, वणी आणि झरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश राठोड, दातोडीचे सरपंच विकास उईके, मुबारक तंवर, प्रल्हाद पाटील जगताप, जिल्हा परिषद सदस्य पावनी कल्यमवार, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, सायतखर्डाच्या सरपंच मालनबाई शेंडे आदींनी यावेळी केली.यावेळी सुरेश बोलेनवार, बाबूलाल मेश्राम, माधवराव टेकाम, अंकित नैताम, मधुकर घसाळकर, दत्ता सिडाम, कार्यक्रमाचे संयोजक तुकाराम मोहुर्ले, अजय रेड्डी येल्टीवार, लक्ष्मण मुजमुले, संदीप गाडगे, ओमप्रकाश जगताप, अशोक पाटील, रघुनाथ शेंडे, संतोष मोहुर्ले, मधुकर चौधरी, विष्णू शेंडे, तानबा आडे, प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस