शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:51 IST

ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देप्रयोग सुरू तीन रुग्णालये खासगी संस्थांना

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. पदे रिक्त राहात असल्याने नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळत नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही रुग्णालये चालविण्यास दिली जात असली तरी संपूर्ण आरोग्य सेवेच्या खासगीकरणाचाच हा घाट असल्याचे मत व्यक्त होत आहे.खासगी संस्थांना दिल्या गेलेल्या रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण राहिल, असे म्हटले आहे. मात्र आजपर्यंतचा खासगी संस्थांचा अनुभव पाहता अतिशय वाईट स्थिती आहे. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे कुठलीही कामे अथवा सेवा दिली जात नाही. आरोग्य सेवेचेही तेच होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने यापूर्वी खासगी संस्थांना रुग्णालये चालविण्यास दिलेली आहे. तेथील संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाबाहेर असल्याची स्थिती आहे. कर्मचारी भरतीही याच संस्था करणार असल्याने आरोग्यसेवेतील सरकारी नोकरभरतीही आजारी पडणार आहे.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय, याच जिल्ह्यातील तळदेव आणि तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एक वर्षाच्या कालावधीसाठी एका खासगी संस्थेला चालविण्यास दिले जाणार आहे. विविध अटी आणि शर्ती टाकून या संस्थेला काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेतनासह विविध बाबींवरील खर्च सुरुवातीला संस्था करणार आहे. यानंतर वर्षाअखेर ही रक्कम शासनाकडून संस्थेला दिली जाणार आहे. आरोग्य सुविधांबाबत संपूर्ण जबाबदारी संस्थेवर ढकलण्यात आली आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सदर तीन आरोग्य सेवा केंद्र चालविण्यास दिली जात असलेली संस्था कदाचित चांगली सेवा देतील. मात्र इतर बाबतीत खासगी संस्थांचा अनुभव पाहता लोकांसाठी डोकेदुखीच ठरला आहे. संस्थेला रुग्णालयाचा कारभार शासकीय नियमानुसार चालवायचा आहे. सरकार चालवू शकत नाही, ते खासगी संस्था करून दाखविणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.कर्मचारी नियुक्तीत मनमानी होणारआरोग्य सेवा केंद्र चालविण्यास घेतलेल्या संस्थेला कर्मचारी नियुक्तीत स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी कायम ठेवायचे की, कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करावी याबाबत संस्थेने निर्णय घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे. कर्मचारी नियुक्ती आकृतीबंधानुसारच असावी, त्यांना शासनाच्या कर्मचाºयांप्रमाणेच वेतन देण्यात यावे, असे निर्णयात म्हटले आहे. संस्थेला नियुक्तीचे अधिकार देण्यात आले. अशावेळी शासन रिक्त पदे भरून लोकांना चांगली सेवा देऊ शकत नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाच्या यंत्रणेच्या भरवशावर खासगी संस्था चांगली सेवा देऊ शकतात असा विश्वास सरकारला आहे, तर शासन स्वत: ही कामे का करू शकत नाही, असा सवाल आहे. केवळ खासगीकरणासाठीच ही सारी उठाठेव असावी, असा साधार संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य