शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:51 IST

ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला.

ठळक मुद्देप्रयोग सुरू तीन रुग्णालये खासगी संस्थांना

विलास गावंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्रामीण आरोग्य सेवेच्या मानगुटीवर खासगीकरणाचे भूत बसविण्यास सरकारने सुरुवात केली आहे. एक ग्रामीण रुग्णालय आणि दोन प्राथमिक आरोग्य केंद्र खासगी संस्थांना चालविण्यास देण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. पदे रिक्त राहात असल्याने नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा मिळत नसल्याचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही रुग्णालये चालविण्यास दिली जात असली तरी संपूर्ण आरोग्य सेवेच्या खासगीकरणाचाच हा घाट असल्याचे मत व्यक्त होत आहे.खासगी संस्थांना दिल्या गेलेल्या रुग्णालयांवर सरकारचे नियंत्रण राहिल, असे म्हटले आहे. मात्र आजपर्यंतचा खासगी संस्थांचा अनुभव पाहता अतिशय वाईट स्थिती आहे. सरकारने ठरवून दिल्याप्रमाणे कुठलीही कामे अथवा सेवा दिली जात नाही. आरोग्य सेवेचेही तेच होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने यापूर्वी खासगी संस्थांना रुग्णालये चालविण्यास दिलेली आहे. तेथील संपूर्ण कारभार सरकारच्या नियंत्रणाबाहेर असल्याची स्थिती आहे. कर्मचारी भरतीही याच संस्था करणार असल्याने आरोग्यसेवेतील सरकारी नोकरभरतीही आजारी पडणार आहे.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालय, याच जिल्ह्यातील तळदेव आणि तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एक वर्षाच्या कालावधीसाठी एका खासगी संस्थेला चालविण्यास दिले जाणार आहे. विविध अटी आणि शर्ती टाकून या संस्थेला काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वेतनासह विविध बाबींवरील खर्च सुरुवातीला संस्था करणार आहे. यानंतर वर्षाअखेर ही रक्कम शासनाकडून संस्थेला दिली जाणार आहे. आरोग्य सुविधांबाबत संपूर्ण जबाबदारी संस्थेवर ढकलण्यात आली आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.सदर तीन आरोग्य सेवा केंद्र चालविण्यास दिली जात असलेली संस्था कदाचित चांगली सेवा देतील. मात्र इतर बाबतीत खासगी संस्थांचा अनुभव पाहता लोकांसाठी डोकेदुखीच ठरला आहे. संस्थेला रुग्णालयाचा कारभार शासकीय नियमानुसार चालवायचा आहे. सरकार चालवू शकत नाही, ते खासगी संस्था करून दाखविणार काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.कर्मचारी नियुक्तीत मनमानी होणारआरोग्य सेवा केंद्र चालविण्यास घेतलेल्या संस्थेला कर्मचारी नियुक्तीत स्वातंत्र्य देण्यात आले आहे. सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी कायम ठेवायचे की, कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी पद्धतीने करावी याबाबत संस्थेने निर्णय घ्यावा, असे शासनाने स्पष्ट केले आहे. कर्मचारी नियुक्ती आकृतीबंधानुसारच असावी, त्यांना शासनाच्या कर्मचाºयांप्रमाणेच वेतन देण्यात यावे, असे निर्णयात म्हटले आहे. संस्थेला नियुक्तीचे अधिकार देण्यात आले. अशावेळी शासन रिक्त पदे भरून लोकांना चांगली सेवा देऊ शकत नाही काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाच्या यंत्रणेच्या भरवशावर खासगी संस्था चांगली सेवा देऊ शकतात असा विश्वास सरकारला आहे, तर शासन स्वत: ही कामे का करू शकत नाही, असा सवाल आहे. केवळ खासगीकरणासाठीच ही सारी उठाठेव असावी, असा साधार संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य