शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

सोयाबीनला बाजारात अवघ्या दीड हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे.

ठळक मुद्देशेतकरी लुटला जातोय : शेतमाल ओला आणि डागी असल्याचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसामुळे शेतातील आणि काढलेलेसुद्धा सोयाबीन भिजल्याचा फायदा उठवित खुल्या बाजारात व्यापार्यांनी सोयाबीनचे दर पाडले आहेत. अवघा दीड हजार रुपये क्विंटल भाव दिला जात असल्याने शेतकरी खुलेआम लुटला जातोय.अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा अवसानच गळाले आहे. शेतीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.आसमानी संकटांसोबत शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात कपाशी पिकावर दहिया रोगाचे आक्रमणसततच्या पावसाने कापसावर दहिया रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे कपाशीची पाने पांढरी पडली आहेत. आता कपाशी काळवंडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. कापसावरील उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. जिल्ह्यात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. अती पावसाने विविध किडींचे आक्रमण कापसावर होत आहे. यावर्षी दहिया रोगाने या कपाशीवर हल्ला चढविला आहे. यामुळे पाने पांढरी पडत आहेत. पातीगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यापूर्वी अतिपावसाने लागलेल्या पात्या गळाल्या होता. आता दहिया रोगाने कापूस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही भागात लाल्याचा प्रकोप झाला आहे. शेतशिवार पावसाच्या प्रकोपाने हादरले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्या असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. दहिया रोगाचा प्रकोप सर्वत्र पहायला मिळत आहे. हा प्रकार पावसाने आणि वातावरण बदलाने झाला आहे. शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना कराव्या असा सल्ला येथील मध्य विदर्भ विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती