शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला बाजारात अवघ्या दीड हजारांचा भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 05:00 IST

अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे. सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे.

ठळक मुद्देशेतकरी लुटला जातोय : शेतमाल ओला आणि डागी असल्याचा बसतोय फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसामुळे शेतातील आणि काढलेलेसुद्धा सोयाबीन भिजल्याचा फायदा उठवित खुल्या बाजारात व्यापार्यांनी सोयाबीनचे दर पाडले आहेत. अवघा दीड हजार रुपये क्विंटल भाव दिला जात असल्याने शेतकरी खुलेआम लुटला जातोय.अतिपावसाने शेतकऱ्यांचे सोयाबीन ओलेचिंब झाले आहे. याला वाळविण्यासाठी उसंतही मिळत नाही. यामुळे हे सोयाबीन फुली येऊन काळे पडले आहे. तर काही सोयाबीनला कुबट वास सुटला आहे. यातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला आहे.सोयाबीनला शासनाने तीन हजार ८८० रूपये क्विंटलचे हमी दर जाहीर केले आहेत. खुल्या बाजारात मात्र अवघा दीड हजारांपासून भाव सुरू होतो आहे. अधिकाधिक अर्थात चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला सव्वा तीन हजारांचा भाव मिळतो आहे. यातून शेतकऱ्यांचा अवसानच गळाले आहे. शेतीचा खर्च निघणेही अवघड झाले आहे.आसमानी संकटांसोबत शेतकऱ्यांना सुलतानी संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.जिल्ह्यात कपाशी पिकावर दहिया रोगाचे आक्रमणसततच्या पावसाने कापसावर दहिया रोगाने आक्रमण केले आहे. यामुळे कपाशीची पाने पांढरी पडली आहेत. आता कपाशी काळवंडण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे कापसाच्या उत्पादनावर याचा परिणाम होणार आहे. कापसावरील उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. जिल्ह्यात पावणे पाच लाख हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. अती पावसाने विविध किडींचे आक्रमण कापसावर होत आहे. यावर्षी दहिया रोगाने या कपाशीवर हल्ला चढविला आहे. यामुळे पाने पांढरी पडत आहेत. पातीगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. यापूर्वी अतिपावसाने लागलेल्या पात्या गळाल्या होता. आता दहिया रोगाने कापूस पिकाला चांगलाच फटका बसला आहे. काही भागात लाल्याचा प्रकोप झाला आहे. शेतशिवार पावसाच्या प्रकोपाने हादरले आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ उपाययोजना कराव्या असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे. दहिया रोगाचा प्रकोप सर्वत्र पहायला मिळत आहे. हा प्रकार पावसाने आणि वातावरण बदलाने झाला आहे. शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना कराव्या असा सल्ला येथील मध्य विदर्भ विभाग, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती