शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

तूरडाळीचे भाव गगनाला

By admin | Updated: October 14, 2015 02:53 IST

केंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ ..

४५ रुपयांची विक्रमी वाढ : दर कमी करण्याचे केंद्राचे आश्वासन फोलनीलेश यमसनवार पाटणबोरीकेंद्र सरकारचे तूरडाळ आयात करून भाव कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले असून गत १५ दिवसात १३० रूपये घाऊक किंमत असलेली तूरडाळ आता तब्बल ४५ रूपयांनी वाढून १७५ रूपये प्रति किलो झाली आहे. परिणामी गृहिणींचे बजेट बिघडले असून जेवणातून आता वरण गायब होते, की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.गतवर्षी कमी झालेला पाऊस व तूरीच्या अत्यल्प उत्पादनामुळे चालू वर्षातील तूरडाळीचा साठा आता संपत आला आहे. त्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते. घाऊक बाजारात आता प्रति किलो १७५ रूपये किंमत पोहोचल्याने किरकोळ बाजारात तूरडाळीचे भाव २०० रूपये प्रति किलोवर पोहोचले आहे. त्यामुळे गरिबाच्या ताटातील वरण गायब झाले आहे. तूरडाळीपाठोपाठ अन्य डाळीच्या दरातही वाढ झाली आहे. विदर्भातील अकोला येथील किराणाच्या सर्वात मोठ्या मंडीत घाऊक बाजारात तूरडाळ १७५ रूपये प्रती किलो, चनाडाळ ६३, चिल्टा मूगडाळ १००, मूगमोगर ११५, बरबटी मोगर ८०, चिल्टा उडदडाळ १३५, उडदमोगर १५५, मसूरडाळ ८० रूपये प्रती किलो दराने विकली जात आहे. तूरडाळीची भाववाढ लक्षणीय असून आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच इतकी भाववाढ झाली आहे. साखरेचे भाव घाऊक बाजारात दोन महिन्यांपूर्वी २ हजार १५० रूपये प्रति क्विंटल होते. आता ते २ हजार ७५० रूपयांपर्यंत पोहोचले आहे. साखरेच्या भावात दोन महिन्यात ६०० रूपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. २५ रूपये प्रति किलो मिळणारी साखर आता ३० रूपये किलो विकली जात आहे. तसेच शेंगदाण्याचे भाव घाऊक बाजारात ९० रूपये किलो आहे. किरकोळ बाजारात ते १०० रूपये प्रति किलो आहे. फुटाणा (दालीया) घाऊक बाजारात ८० वर पोहोचला असून किरकोळ बाजारात ९० ते १०० रूपये किलो विकला जात आहे. तांदूळाच्या किंमतीत सुमारे २०० ते ४०० रूपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. नवरात्रात उपवासाकरिता लागणारे शेंंगदाणे, साबुदाणा, भगरच्या किंमतीही वाढल्या आहे. येत्या काही दिवसांत पोहा, मुरमुराच्या किंमतीसुद्धा वाढण्याची चिन्हे आहेत. केंद्र व राज्य शासनाने तूरडाळीच्या किंमती कमी करण्याकरिता उचलेली पावले सपशेल अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत चालला आहे. कापसाला तीन हजार ९५० ते चार हजार रूपये भाव खासगी बाजारपेठेत मिळत असून यावर्षी शेतकरी हवालदील झाला आहे.