शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

आठ लिटर पाण्याची किंमत " १३६०

By admin | Updated: August 27, 2016 00:49 IST

गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे.

घाटंजीत घडली किमया : समिती करणार आता चौकशीघाटंजी : गरिबांमध्ये ‘उमेद’ जागविण्यासाठी कार्य करत असलेल्या विभागाने साधलेली किमया आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी आहे. आठ लिटर पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपये या विभागाने मोजले आहे. मिळालेला हा आकडा तोंडी नसून माहितीच्या अधिकारात याच विभागाने सादर केलेला हा पुरावा आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत घाटंजीसह इतर काही तालुक्यात गेली काही वर्षांपासून गरीब आणि अती गरीब वर्गांसाठी कार्य केले जात आहे. या अभियानांतर्गत गरिबांचा विकास किती झाला याचा लेखाजोखा नसला तरी अभियाना राबविणाऱ्यांनी मात्र ‘चांगलाच’ विकास केला आहे. बचत गटाची निर्मिती, त्यांना शासनाच्या खर्चाने प्रशिक्षण, बचती विषयी मार्गदर्शन, बँकस्तरावर कर्ज आदी बाबींसाठी हे अभियान राबविले जात आहे. यातून लाखो रुपये खर्ची घातले जात आहे. ‘उमेद’ या नावाखाली हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाची उपलब्धी आणि झालेला खर्च या विषयीची माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे जिल्हा सचिव राजीव किसन चव्हाण यांनी मागितली. यात अभियानाची ‘फलश्रुती’ पुढे आली. विविध उपक्रमांसाठी झालेल्या खर्चाची देयके मनमानी काढण्यात आली. साध्या पावत्यांवर खर्च दाखवून बिले पास झाली. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी बँकर्स व्हीजीटनिमित्त यवतमाळ येथील एका प्रतिष्ठानातून आणलेल्या एक लिटर प्रमाणे आठ बॉटल्स पाण्यासाठी तब्बल एक हजार ३६० रुपयांचे बिल काढण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापक अमोल देवलासी यांच्या प्रमाणपत्रावरून एवढी रक्कम उचलली गेल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षणाच्या नावाखाली उपस्थिती पत्रकही भरून घेण्यात आले. पुढील तारखांचा वापर यासाठी करण्यात आला. यावरून सदर अभियान कशासाठी राबविले जात आहे. हे स्पष्ट होते. (प्रतिनिधी)प्रशिक्षण भत्त्यामध्येही घोळग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रशिक्षण घाटंजी तालुक्यातील रसिकाश्रय या प्रशिक्षण केंद्रात दिले गेले. यातील देयकातही मोठा घोळ घातला गेला आहे. निवासी प्रशिक्षणात महिला निवासी नसतानाही त्यांच्या नावे देयके काढल्या गेली. प्रशिक्षण संपल्याच्या दिवसाचीही देयके काढली. प्रवासभत्ता देताना एका गावासाठी प्रत्येक वेळी वेगवेगळे दर ठरविले गेले. याची कल्पना कदाचित प्रशिक्षणार्थ्यांनाही नसावी. लाखो रुपयांच्या खरेदीची बिले कच्चा कागदावर मंजूर झाली. आता याप्रकाराच्या चौकशीसाठी प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेत समिती नेमण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक २५ आॅगस्टला झाली. यात काय निष्पन्न होते, याकडे लक्ष लागले आहे. सदर प्रकरणात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राजू चव्हाण यांनी केले आहे.