शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

खेड्यापाड्यात आंतरराष्ट्रीय शिक्षणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 05:00 IST

झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदररोज कार्यशाळा : पुढील वर्षीच्या ‘पीसा’ परीक्षेची सज्जता, तज्ज्ञांद्वारे अध्यापनाचे ‘अपडेशन’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने एकीकडे शिक्षणाबाबत चिंता व्यक्त होत असताना जिल्ह्याच्या खेड्यापाड्यातील शिक्षक मात्र थेट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची सज्जता करीत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्तरावरील ‘पीसा’ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेमके काय आणि कसे शिकवावे, याची तयारी केली जात आहे. अन् त्यांना मार्गदर्शन लाभतेय माजी शिक्षण सचिव व विद्यमान रोहयो विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांचे!झरी जामणी, वणी, मारेगाव, पांढरकवडा, दारव्हा, दिग्रस अशा विविध तालुक्यातील शिक्षकांनी एकत्र येत ‘भविष्यवेधी कार्यशाळे’चा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या समन्वयाची जबाबदारी घेतली झरीचे गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे यांनी. शाळा बंद असल्याने शिक्षकांकडे भरपूर मोकळा वेळ आहे, त्या वेळेचा सदुपयोग करीत शिक्षकांना अधिक अद्ययावत अध्यापनाचे तंत्र शिकता यावे, यासाठी ही कार्यशाळा सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार असले, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणात ते तरबेज व्हावे, पुढील वर्षी पीसा परीक्षेत बाजी मारून त्यांनी देशाचे नाव उंचवावे, यासाठी तयारी केली जात आहे. विविध गावातील शिक्षक दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ६ असे एकत्र येऊन हा उपक्रम राबवित आहेत. विशेष म्हणजे, खेड्यापाड्यातील या उपक्रमशील शिक्षकांना तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.‘पिसा’ म्हणजे नेमके काय ?जगभरातील कोणत्या देशाची शिक्षण व्यवस्था सध्या उत्तम आहे, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’ ही संस्था पीसा (प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडेंट असेसमेंट) मूल्यांकन चाचणी घेत असते. त्यात जवळपास ८० देश भाग घेतात. दर तीन वर्षांतून होणाºया या परीक्षेत महाराष्ट्राने एकदाही भाग घेतला नाही. मात्र २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करण्याची तयारी तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सुरू केली होती. ती आता अधिक वेगाने सुरू आहे.आंतरराष्ट्रीय शिक्षणाची उद्गाता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाबळेवाडी शाळेचे शिक्षक दत्तात्रय वारे अनुभव कथन करतात. शिवाय, प्रत्येक शिक्षकाला रोज स्वाध्याय दिला जातो, रोज त्यांना अहवाल वाचन करावा लागतो. त्यामुळे अध्यापनशैली अधिक विद्यार्थीभिमुख होण्याकडे वाटचाल सुरू आहे.- प्रकाश नगराळेगटशिक्षणाधिकारी, झरीजामणी

टॅग्स :Educationशिक्षण