शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

अकाली पावसाचा तडाखा

By admin | Updated: February 12, 2015 01:50 IST

वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली ..

वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली पावसामुळे या चारही तालुक्यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वणी तालुक्यात रबी हंगामात ३ हजार ५०० हेक्टरवर हरभरा, २ हजार १५ हेक्टरवर गहू, तर ४८५ हेक्टरवर भाजीपाला, ज्वारी, चारा आदींची पेरणी करण्यात आली आहे. गहू आणि हरभरा पीक सध्या जोमात आहे. काही गहू ओंब्यांवर आला आहे. हरभऱ्यालाही गाठी पकडत आहेत. त्यातच आता अकाली पावसाने हजेरी लावल्याने काही परिसरात गहू व हरभरा आडवा झाला आहे. मारेगाव तालुक्यात अनेक शेतांमधील गहू आडवा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खरिपात पिकांनी दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व आशा रबीतील पिकांवर अवलंबून होत्या. रबीचे पिकही आता हातातोंडाशी आले आहे. मात्र हातातोंडाशी आलेले ही पीकही निसर्ग हिरावून घेत असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा काळजीत पडले आहेत. झरीजामणी तालुक्यातही अकाली पावसाने झोपडून काढले. अनेक शेतांमधील गहू आणि हरभऱ्याला त्याचा चांगलाच फटका बसला. या अकाली पावसाने वणी शरातील खड्डे पाण्याने भरून गेले. बुधवारी सकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातही गरावा निर्माण झाला. या पावसामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर आता बुधवारी पहाटेच अकाली पावसाने हजेरी लावली अहे. त्यामुळे रबी पिकांना मोठा फटका बसण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)चार कोटींचा विमा लाभ मिळणारवणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपात हवामान आधारित पीक विमा काढला होता. खरिपात या पिकांचे उत्पन्न घटले. अल्प पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची आस लागून होती. त्यासाठी कृषी विभागाला आता ४ कोटी १५ लाख रूपये प्राप्त झाले आहे. त्यातून ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कपाशीसाठी ३ कोटी १४ लाख रूपयांचा विमा देण्यात येणार आहे. सोयाबीन पिकासाठी ७४0 शेतकऱ्यांना एक कोटी एक लाखांचा विमा लाभ मिळणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी सांगितले. विमा लाभाची ही रक्कम येत्या आठ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.