शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाचा तडाखा

By admin | Updated: February 12, 2015 01:50 IST

वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली ..

वणी : वणीसह मारेगाव, झरीजामणी, पांढरकवडा तालुक्याला मंगळवारी रात्री अकाली पावसाने तडाखा दिला. बुधवारी पहाटेच्या सुमारास आलेल्या अकाली पावसामुळे या चारही तालुक्यात रबी पिकांचे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वणी तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वणी तालुक्यात रबी हंगामात ३ हजार ५०० हेक्टरवर हरभरा, २ हजार १५ हेक्टरवर गहू, तर ४८५ हेक्टरवर भाजीपाला, ज्वारी, चारा आदींची पेरणी करण्यात आली आहे. गहू आणि हरभरा पीक सध्या जोमात आहे. काही गहू ओंब्यांवर आला आहे. हरभऱ्यालाही गाठी पकडत आहेत. त्यातच आता अकाली पावसाने हजेरी लावल्याने काही परिसरात गहू व हरभरा आडवा झाला आहे. मारेगाव तालुक्यात अनेक शेतांमधील गहू आडवा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. खरिपात पिकांनी दगा दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या सर्व आशा रबीतील पिकांवर अवलंबून होत्या. रबीचे पिकही आता हातातोंडाशी आले आहे. मात्र हातातोंडाशी आलेले ही पीकही निसर्ग हिरावून घेत असल्याची प्रचिती येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा काळजीत पडले आहेत. झरीजामणी तालुक्यातही अकाली पावसाने झोपडून काढले. अनेक शेतांमधील गहू आणि हरभऱ्याला त्याचा चांगलाच फटका बसला. या अकाली पावसाने वणी शरातील खड्डे पाण्याने भरून गेले. बुधवारी सकाळच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातही गरावा निर्माण झाला. या पावसामुळे गायब झालेली थंडी पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण कायम होते. त्यानंतर आता बुधवारी पहाटेच अकाली पावसाने हजेरी लावली अहे. त्यामुळे रबी पिकांना मोठा फटका बसण्याची धास्ती शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. (कार्यालय प्रतिनिधी)चार कोटींचा विमा लाभ मिळणारवणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरिपात हवामान आधारित पीक विमा काढला होता. खरिपात या पिकांचे उत्पन्न घटले. अल्प पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याची आस लागून होती. त्यासाठी कृषी विभागाला आता ४ कोटी १५ लाख रूपये प्राप्त झाले आहे. त्यातून ९ हजार ५४३ शेतकऱ्यांना कपाशीसाठी ३ कोटी १४ लाख रूपयांचा विमा देण्यात येणार आहे. सोयाबीन पिकासाठी ७४0 शेतकऱ्यांना एक कोटी एक लाखांचा विमा लाभ मिळणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी रमेश पसलवाड यांनी सांगितले. विमा लाभाची ही रक्कम येत्या आठ दिवसांत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.