शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

प्राधान्यक्रम देताना पांढरकवडा, वणी उपविभागाला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

ठळक मुद्देपोलीस दलात बदलीचे वारे : संलग्नचा आधार घेऊन मुक्कामींचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सध्या प्रशासकीय  व विनंती बदल्यांचे वारे वाहत आहे. पाच वर्षे कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. मात्र, संलग्नचा आधार घेऊन पाचपेक्षा अधिक वर्षे एकाच ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना हलविले जाणार काय, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

या तीन ठाण्यांना पसंती 

वणी : येथील पोलीस ठाणे वरकमाईसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिकारी असो की कर्मचारी त्यांची पहिली पसंती वणी पोलीस ठाण्यालाच असते. हे ठाणे मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.  यवतमाळ : यवतमाळ मुख्यालयी राहून कुटुंबासोबत दिवस काढता यावेत याकरिता संलग्नचा खटाटोप केला जातो. बरेच जण मुख्यालयी राहून आपले इतर व्यवसायही सांभाळताना दिसतात.  वाहतूक शाखा : काहींनी अनेक वर्षे वाहतूक शाखेत काढली आहेत. त्यांनी स्वत: नव्हे मात्र नातेवाइकांच्या नावाने वाहतुकीचा पूरक व्यवसायही सुरू केला आहे. काहींची ट्रान्सपोर्टिंगमध्ये गुंतवणूक आहे. 

या ठाण्यात नको रे बाबा ! 

अवधूतवाडी : जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंद होणारे ठाणे म्हणून अवधूतवाडीची ओळख आहे. या ठिकाणी जुने कर्मचारी सोडण्यास तयार नाही. मात्र, नवीन कर्मचारी तेथे येण्याचे टाळतात. येथे मुक्कामी कर्मचाऱ्यांचा भरणा आहे.  बिटरगाव : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचे पाेलीस ठाणे म्हणून बिटरगाव ओळखले जाते. सोयीसुविधांचा येथे तुलनेने अभाव आहे. यवतमाळात स्थायिक झालेल्यांना या ठिकाणी जाण्याची ॲलर्जीच आहे.खंडाळा : जिल्ह्यातील दुसऱ्या टोकावर असलेले खंडाळा पोलीस ठाणे हे अनेकांना नको असते. दुर्गम भाग असल्याने येथे कुणीही जाण्यास तयार होत नाही. तेथे झालेली बदली रद्द करण्याचाच प्रयत्न केला जातो.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली