शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

प्राधान्यक्रम देताना पांढरकवडा, वणी उपविभागाला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST

पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

ठळक मुद्देपोलीस दलात बदलीचे वारे : संलग्नचा आधार घेऊन मुक्कामींचे काय?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा पोलीस दलात सध्या प्रशासकीय  व विनंती बदल्यांचे वारे वाहत आहे. पाच वर्षे कार्यकाळ झालेल्या कर्मचाऱ्यांचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे. मात्र, संलग्नचा आधार घेऊन पाचपेक्षा अधिक वर्षे एकाच ठाण्यात मुक्कामी असलेल्या कर्मचाऱ्यांना हलविले जाणार काय, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीस खात्यात सोयीची बदली मिळविण्याचा प्रयत्न होतो. त्यात कमाई असणारे ठाणे प्राधान्याने निवडले जाते. ज्यांनी शासकीय ड्यूटीव्यतिरिक्त इतर काही व्यवसाय थाटले ते एका परिघाबाहेर जाण्यास तयार होत नाहीत. असे कर्मचारी संलग्नचा आधार घेऊन चार-दोन दिवसांत आपल्या परिघात परत येतात. मात्र, पोेलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ यांच्या कठोर शिस्तीमुळे अशा कर्मचाऱ्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले आहे. 

या तीन ठाण्यांना पसंती 

वणी : येथील पोलीस ठाणे वरकमाईसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे अधिकारी असो की कर्मचारी त्यांची पहिली पसंती वणी पोलीस ठाण्यालाच असते. हे ठाणे मिळावे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात.  यवतमाळ : यवतमाळ मुख्यालयी राहून कुटुंबासोबत दिवस काढता यावेत याकरिता संलग्नचा खटाटोप केला जातो. बरेच जण मुख्यालयी राहून आपले इतर व्यवसायही सांभाळताना दिसतात.  वाहतूक शाखा : काहींनी अनेक वर्षे वाहतूक शाखेत काढली आहेत. त्यांनी स्वत: नव्हे मात्र नातेवाइकांच्या नावाने वाहतुकीचा पूरक व्यवसायही सुरू केला आहे. काहींची ट्रान्सपोर्टिंगमध्ये गुंतवणूक आहे. 

या ठाण्यात नको रे बाबा ! 

अवधूतवाडी : जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे नोंद होणारे ठाणे म्हणून अवधूतवाडीची ओळख आहे. या ठिकाणी जुने कर्मचारी सोडण्यास तयार नाही. मात्र, नवीन कर्मचारी तेथे येण्याचे टाळतात. येथे मुक्कामी कर्मचाऱ्यांचा भरणा आहे.  बिटरगाव : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरचे पाेलीस ठाणे म्हणून बिटरगाव ओळखले जाते. सोयीसुविधांचा येथे तुलनेने अभाव आहे. यवतमाळात स्थायिक झालेल्यांना या ठिकाणी जाण्याची ॲलर्जीच आहे.खंडाळा : जिल्ह्यातील दुसऱ्या टोकावर असलेले खंडाळा पोलीस ठाणे हे अनेकांना नको असते. दुर्गम भाग असल्याने येथे कुणीही जाण्यास तयार होत नाही. तेथे झालेली बदली रद्द करण्याचाच प्रयत्न केला जातो.

 

टॅग्स :PoliceपोलिसTransferबदली