शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन महिन्यांपासून वीज बंद

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी

शेती पिके धोक्यात : वडकी विद्युत कार्यालयाची अशीही अनास्थाखैरी : ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाकडे केलेली तक्रारही दुर्लक्षित आहे. यावरून सदर कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी किती दक्ष आहे, हे दिसून येते.निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सिंचन करून पीक घेण्याची आशा आहे. परंतु वीज पुरवठाच नसल्याने त्यांच्या या आशेवर पाणी फेरले जात आहे. एकीकडे भारनियमन आणि अपुऱ्या दाबाचा वीज पुरवठा या समस्येला तोंड देताना नाकीनऊ आले असताना दुसरीकडे विद्युत कंपनीच्या अनास्थेमुळे समस्येमध्ये भर पडली आहे. २७ आॅगस्टच्या रात्री सुनील खंगार यांच्या खैरी शिवारातील शेतात असलेल्या ट्रान्सफार्मरची तोडफोड करून यातील साहित्य लंपास करण्यात आले. तसेच वसंत महादेव कापसे यांच्या शेतातून गेलेल्या तीन खांबावरील वीज तारा ५ सप्टेंबर रोजी चोरी गेल्या. खांब पाडून तारा चोरी गेल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी या खांबांवरून वीज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही बाब वसंत कापसे यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. वीज पुरवठा नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु वडकी कार्यालयाने तर दूर राळेगाव येथील अभियंत्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. आता अनेक शेतकऱ्यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)