शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

दोन महिन्यांपासून वीज बंद

By admin | Updated: November 10, 2014 22:50 IST

ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी

शेती पिके धोक्यात : वडकी विद्युत कार्यालयाची अशीही अनास्थाखैरी : ट्रान्सफार्मर आणि विद्युत तारा चोरी गेल्याने खैरी परिसरातील वीज पुरवठा गेली दोन महिन्यांपासून बंद आहे. या प्रकारात सिंचनाअभावी शेती पिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाकडे केलेली तक्रारही दुर्लक्षित आहे. यावरून सदर कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी किती दक्ष आहे, हे दिसून येते.निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सिंचन करून पीक घेण्याची आशा आहे. परंतु वीज पुरवठाच नसल्याने त्यांच्या या आशेवर पाणी फेरले जात आहे. एकीकडे भारनियमन आणि अपुऱ्या दाबाचा वीज पुरवठा या समस्येला तोंड देताना नाकीनऊ आले असताना दुसरीकडे विद्युत कंपनीच्या अनास्थेमुळे समस्येमध्ये भर पडली आहे. २७ आॅगस्टच्या रात्री सुनील खंगार यांच्या खैरी शिवारातील शेतात असलेल्या ट्रान्सफार्मरची तोडफोड करून यातील साहित्य लंपास करण्यात आले. तसेच वसंत महादेव कापसे यांच्या शेतातून गेलेल्या तीन खांबावरील वीज तारा ५ सप्टेंबर रोजी चोरी गेल्या. खांब पाडून तारा चोरी गेल्याने वीज पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी या खांबांवरून वीज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.ही बाब वसंत कापसे यांनी विद्युत कंपनीच्या वडकी येथील कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिली. वीज पुरवठा नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु वडकी कार्यालयाने तर दूर राळेगाव येथील अभियंत्यांनीही ही समस्या गांभीर्याने घेतली नाही. आता अनेक शेतकऱ्यांपुढे पीक वाचविण्याचा प्रश्न आहे. वरिष्ठांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)