शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य

By admin | Updated: June 27, 2015 00:32 IST

शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जीव धोक्यात : वीज वितरणचे हेतुपुरस्सर दुर्लक्षउमरखेड : शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज तारांना लावलेले गार्डींगही आता दिसेनासे झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहरातील वीज खांब आणि त्यावरील तारांचे वयोमान ६० वर्ष झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी वीज तारा लोंबकळत आहे. साधा वारा आला तरी तारांमध्ये घर्षण होऊन ठिणक्या पडतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने चक्क वीज खांबातच प्रवाह संचारल्याने दोन शेळ््या दगावल्या, शेळीमालक थोडक्यात बचावला. असे प्रकार ठिकठिकाणी पुढे येत आहेत. याबाबत नगरपरिषदेने वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु वीज मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील हजारो नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. अशीच अवस्था ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीची आहे. वीज तारा लावण्यात आल्या तेव्हापासून देखभाल दुरुस्तीच झाली नाही. गावातील वीज पुरवठाही यामुळे खंडीत होतो. न्युट्रल नसलेल्या जागेवर गार्डींग न्युट्रल वापरून त्यासुद्धा तुटून रस्त्यावर पडत आहेत. काही ठिकाणी तारा तर नागरिकांच्या घरावर टेकल्या आहेत. परंतु या प्रकरणाकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. सध्या पावसाळ््याचे दिवस आहे. अशा स्थितीत एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे. वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)घरावरून गेलेल्या वीज तारा जीवघेण्या उमरखेड शहरात अनेक घरांवरील वीज तारा गेल्या आहेत. या वीज तारा घराला स्पर्श करतात की काय असे वाटते. वादळी वाऱ्यात घर्षणामुळे ठिणग्या पडतात तेव्हा या घरातील मंडळी जीव मुठीत घेऊन राहतात. तसेच अनेक ठिकाणी मोठ्ठाले वृक्ष वाढले असून फांद्यांमध्ये तार अडकून अपघात होण्याची भीती असते. घरावरील वीज तारांबाबत तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे. उमरखेड शहर अतिशय जुने आहे. त्यामुळे येथील वीज ताराही खूप वर्षापूर्वी टाकलेल्या आहे. सध्या तीन किलोमीटर लांबीच्या वीज तारांचे नूतणीकरण करण्यात आले असून ११० नवीन खांब टाकले आहे. शहराचे काम खासगी एजंसीला दिले असून त्यांच्याकडून काम सुरू आहे. परंतु मागणी प्रमाणे साहित्य उपलब्ध होत नाही. साहित्य उपलब्ध झाले की कामाला सुरुवात होईल. - एस.बी. कोंडे, सहायक अभियंता वीज वितरण उमरखेड शहर