शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

खांबावरील वीज तारा झाल्या कालबाह्य

By admin | Updated: June 27, 2015 00:32 IST

शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जीव धोक्यात : वीज वितरणचे हेतुपुरस्सर दुर्लक्षउमरखेड : शहरासह तालुक्यातील वीज खांबांवरील तारा कालबाह्य झाल्या असून, लोंबकाळणाऱ्या वीज तारा कधीही तुटून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. वीज तारांना लावलेले गार्डींगही आता दिसेनासे झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. मात्र वीज वितरण कंपनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. शहरातील वीज खांब आणि त्यावरील तारांचे वयोमान ६० वर्ष झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत ठिकठिकाणी वीज तारा लोंबकळत आहे. साधा वारा आला तरी तारांमध्ये घर्षण होऊन ठिणक्या पडतात. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने चक्क वीज खांबातच प्रवाह संचारल्याने दोन शेळ््या दगावल्या, शेळीमालक थोडक्यात बचावला. असे प्रकार ठिकठिकाणी पुढे येत आहेत. याबाबत नगरपरिषदेने वीज वितरण कंपनीशी पत्रव्यवहार केला आहे. परंतु वीज मंडळाने कोणतीही कारवाई केली नाही. शहरातील हजारो नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. अशीच अवस्था ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीची आहे. वीज तारा लावण्यात आल्या तेव्हापासून देखभाल दुरुस्तीच झाली नाही. गावातील वीज पुरवठाही यामुळे खंडीत होतो. न्युट्रल नसलेल्या जागेवर गार्डींग न्युट्रल वापरून त्यासुद्धा तुटून रस्त्यावर पडत आहेत. काही ठिकाणी तारा तर नागरिकांच्या घरावर टेकल्या आहेत. परंतु या प्रकरणाकडे लक्ष द्यायला कुणीही तयार नाही. सध्या पावसाळ््याचे दिवस आहे. अशा स्थितीत एखादा मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे. वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)घरावरून गेलेल्या वीज तारा जीवघेण्या उमरखेड शहरात अनेक घरांवरील वीज तारा गेल्या आहेत. या वीज तारा घराला स्पर्श करतात की काय असे वाटते. वादळी वाऱ्यात घर्षणामुळे ठिणग्या पडतात तेव्हा या घरातील मंडळी जीव मुठीत घेऊन राहतात. तसेच अनेक ठिकाणी मोठ्ठाले वृक्ष वाढले असून फांद्यांमध्ये तार अडकून अपघात होण्याची भीती असते. घरावरील वीज तारांबाबत तातडीने उपाययोजनेची मागणी होत आहे. उमरखेड शहर अतिशय जुने आहे. त्यामुळे येथील वीज ताराही खूप वर्षापूर्वी टाकलेल्या आहे. सध्या तीन किलोमीटर लांबीच्या वीज तारांचे नूतणीकरण करण्यात आले असून ११० नवीन खांब टाकले आहे. शहराचे काम खासगी एजंसीला दिले असून त्यांच्याकडून काम सुरू आहे. परंतु मागणी प्रमाणे साहित्य उपलब्ध होत नाही. साहित्य उपलब्ध झाले की कामाला सुरुवात होईल. - एस.बी. कोंडे, सहायक अभियंता वीज वितरण उमरखेड शहर