शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीला स्थगनादेश

By admin | Updated: July 12, 2017 00:23 IST

शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासातच ‘मातोश्री’ने स्थगनादेश दिला आहे.

खासदारांच्या नाराजीचा परिणाम : २४ तासात आदेश फिरविला, राज्यमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याचा सूर लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासातच ‘मातोश्री’ने स्थगनादेश दिला आहे. खासदार भावनाताई गवळी यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने हा स्थगनादेश देण्यात आल्याचे सांगण्यात येते. येथील दोन पैकी एका जिल्हा प्रमुखाला विधानसभा निवडणुकीसाठी मोकळे करण्यात आले. त्यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे सहसंपर्क प्रमुख बनविण्यात आले होते. त्यांच्या रिक्त जागेवर यवतमाळ शहर अध्यक्ष पराग पिंगळे यांना बढती देऊन जिल्हा प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा प्रमुख म्हणून पराग पिंगळे यांच्या नेतृत्वात सोमवारी शिवसेनेने जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संपूर्ण कर्जमाफीसाठी ‘ढोल बडवा’ आंदोलनही केले. पिंगळे यांच्या जिल्हा प्रमुख पदावरील वर्णीचे शहरात व जिल्ह्यात त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत होत असतानाच त्यांच्या या उत्साहावर विरजण पडले. नियुक्तीवरून २४ तास होण्यापूर्वीच त्यांच्या नियुक्तीला स्थगनादेश देण्यात आला. पिंगळे यांच्यासोबतच जिल्हा संघटक, सहसंपर्क प्रमुख या पदावरील नियुक्त्याही करण्यात आल्या होत्या. मात्र त्या सर्वच नियुक्त्यांना स्थगनादेश दिला जात असल्याचे शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर करण्यात आले. तसे वृत्तही शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनामध्ये ११ जुलै रोजी उमटले. जिल्हा प्रमुखाच्या नियुक्तीला अवघ्या २४ तासात स्टे मिळण्यामागील राजकारण जाणून घेतले असता नेत्यांच्या वर्चस्वाचा मुद्दा पुढे आला. सूत्रानुसार, पराग पिंगळे हे महसूल राज्यमंत्री, शिवसेना नेते संजय राठोड यांच्या खास मर्जीतील मानले जातात. त्यातूनच पिंगळे यांना बढती देण्यात आली होती. परंतु ही बढती देताना यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या ज्येष्ठ नेत्या, शिवसेना खासदार भावनाताई गवळी यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचे सांगितले जाते. याच कारणावरून भावनाताई यांनी थेट ‘मातोश्री’ गाठून या परस्पर झालेल्या नियुक्तीमागील आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. शिवाय कोणत्याही परिस्थितीत या नियुक्तीला स्थगनादेश द्याच यासाठी साकडे घातले गेले. अखेर भावनातार्इंचा मुद्दा ग्राह्य मानून ‘मातोश्री’वरून पिंगळे व इतरांच्या नियुक्तीला स्थगनादेश देण्यात आला. खासदार व राज्यमंत्र्यांमध्ये धुसफूस, पक्षात उघड गटबाजीची चिन्हे मुळात संजय राठोड व भावनाताई गवळी यांच्यात अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. संजय राठोड यांना वाशिमचे पालकमंत्रीपद दिल्यानंतर त्यांनी त्या भागात दौरे वाढविले. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठीही सुरू केल्या. त्यातूनच आता संजय राठोड लोकसभा लढविणार, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. दरम्यान कालपर्यंत भावनाताई गवळींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संजय राठोड यांनी गोंजारणे सुरू केल्याचा गवळी समर्थकांचा सूर आहे. एवढेच नव्हे तर राठोड यांनी भावनातार्इंचा गृहजिल्हा असताना त्यांना विश्वासात न घेता मंगरुळपीर येथील राजेश पाटील यांची वाशिम जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली. या नियुक्तीने नाराजी होऊनही भावनातार्इंनी त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच की काय यवतमाळात पिंगळे यांच्या नियुक्तीसाठी भावनातार्इंना विश्वासात न घेता दुसरा वार करण्यात आला. हा वार जिव्हारी लागल्याने भावनातार्इंनी थेट ‘मातोश्री’ गाठून पिंगळे व इतरांच्या नियुक्त्यांना स्थगनादेश मिळवित आपलेही वजन दाखवून दिले. नेत्यांमधील या भांडणाने शिवसेनेतील गटबाजी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे. गवळींवरील नाराज कार्यकर्ते राठोडांच्या मागे तर त्यांच्यावरील नाराज कार्यकर्ते गवळींच्या मागे उभे राहण्याची व त्यातून गटबाजीचे उघड प्रदर्शन होण्याची शक्यता शिवसेनेच्या गोटात वर्तविली जात आहे.