शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
3
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
4
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
5
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
6
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
7
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
8
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
9
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
10
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
11
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
12
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
13
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
14
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
15
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
16
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
17
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
18
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
19
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
20
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रस येथील पार्कमध्ये निकृष्ट काम, कंत्राटदाराचा हलगर्जीपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तक्रार । ४४ लाखांचा निधी मंजूर, बांधकामच्या भूमिकेकडे लागले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरातील गिरीराज पार्कमध्ये नूतनीकरण केले जात आहे. मात्र निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.शहरात एकूण नऊ उद्यानांचे बांधकाम सुरू आहे. यात गिरीराज पार्कचाही समावेश आहे. शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी म्हणून गिरीराज पार्क येथे सुमारे ४४ लाख रुपयांच्या निधीतून बांधकाम सुरू आहे. लातूर येथील एका कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. मात्र कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. मुख्य प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला तडे गेले आहे. हातांचा साधा स्पर्श केल्यास या प्रवेशद्वारावरील सिमेंटचे आवरण गळून पडत आहे. वेल्डींग केलेले दरवाजे बसविण्यात आलेले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.पार्कभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली. या भिंतींनाही जागोजागी भेगा पडल्या आहे. बगीच्यात एका स्टेजची उभारणी करण्यात आली. तेथे फरशी बसविताना सिमेंटचा वापर न करता केवळ रेती टाकण्यात आली. बगीच्यातील प्रसाधनगृहांचीही स्थिती दयनीय आहे. शेकडो रोपटी मातीच्या ढिगाऱ्यात पडून आहे. पाण्याअभावी अनेक रोपटी वाळली आहे. अद्याप बगीचा पूर्णपणे तयार झाला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित हे काम सुरू आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.या सर्व बाबींची नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली आहे. आता बांधकाम विभाग कंत्राटदारावर कोणती कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.मुख्य प्रवेशद्वाराला गेले तडेकंत्राटदार कंपनीने मुख्य प्रवेशद्वाराची उभारणी केली. मात्र परिपूर्ण प्रवेशद्वार तयार होण्यापूर्वीच खांबांना तडे जात आहे. या खांबांवरील सिमेंटचे आवरणही तत्काळ गळून पडत आहे. यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येते. याच प्रकारे संपूर्ण बांधकाम झाल्यास भविष्यात लवकरच हा पार्क नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पुढाकार घेत तक्रार केली आहे.