शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

गोरगरिबांना मोफत धान्य मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:40 AM

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही गोरगरिबांना मोफत धान्य मिळाले नाही. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात १५ एप्रिलपासून संचारबंदी आहे. यामुळे सामान्य नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. मोफत अन्नधान्य योजनेतून लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्याचे १३ एप्रिलला जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर १५ एप्रिलला रात्री ८ वाजेपासून राज्यामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.

सरकारने मोफत जाहीर केलेले धान्य घेण्यासाठी तालुक्यातील हजारो शिधापत्रिकाधारकांनी शिधा वाटप दुकानांकडे धाव घेतली. मात्र, दुकानदारांकडून अद्याप मोफत धान्य वाटपासंदर्भात आदेश आले नाहीत, धान्याचा कोटा आला नाही, धान्य कधी येईल सांगता येत नाही, असे म्हणून टोलवले जात आहे. आतापर्यंत लॉकडाऊन काळात गोरगरीब लाभार्थींना रेशन दुकानातून मोफत धान्याचा पुरवठा करायला हवा होता. मात्र, तहसीलदारांचे धान्य वाटपाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो लाभार्थींना मोफत धान्य मिळण्यासाठी मे महिना उजाडला आहे. अजून किती दिवस वाट पाहावी लागेल, हेसुद्धा सांगता येत नाही.

बॉक्स

केवळ आदेश आले, धान्य नाही

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मोफत वाटपाचा आदेश प्राप्त झाला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी मे महिन्यात हाेईल की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण जिल्हा पुरवठा विभागाकडून तसा कोटा प्राप्त झाला नाही, असे सांगितले जात आहे.