शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

तलावात पुरेसे पाणी, कालवे मात्र नादुरुस्त

By admin | Updated: November 9, 2014 22:36 IST

तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे.

उमरखेड (कुपटी) : तालुक्यातील सिंचन तलावात मुबलक पाणी असताना नादुरुस्त कालव्यांमुळे रबीचे सिंचन धोक्यात येणार आहे. ठिकठिकाणी कालव्यांमध्ये झुडूपे वाढले असून अनेक कालवे गाळाने भरले आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहे. नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला आहे. रबीवर असलेली आशाही आता मावळत आहे. सिंचन तलावात मुबलक पाणी दिसत असले तरी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्याची कोणतीच व्यवस्था नाही. तालुक्यातील धनज, तरोडा, पोफाळी, मरसूळ, अंबोना, पिरंजी, दराटी, निंगनूर या तलावामध्ये पाणी आहे. परंतु या तलावाचे कालवे नादुरुस्त असल्याने सिंचनासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. मुख्य कालव्यासह वितरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडूपे वाढलेली आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. काही ठिकाणी तर असलेले गेटही नष्ट झाले आहे. तडे गेलेल्या वितरिकेतून पाणी पाझरते त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. अशा स्थितीत पाटबंधारे विभाग मात्र दुरुस्तीसाठी कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही. केवळ पाण्याचे नियोजन केले जाते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना उमरखेड तालुक्यात तरी दिसत नाही. वितरिका नादुरुस्त असून या दुरुस्तीसाठी वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु रबी हंगाम तोंडावर आला तर अद्याप पाटबंधारे विभागाने लक्ष दिले नाही. यामुळे शेतकरी चिंतेत पडले आहे. आता पंचायत समितीचे माजी उपसभापती शामराव पाटील सुरोशे यांनी सहायक अभियंतांना निवेदन दिले आहे. वितरिकेतून पाणी तोडले नाही तर १५ नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. (वार्ताहर)