शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

मतदान आणि मतमोजणी एकाच दिवशी

By admin | Updated: December 10, 2014 23:05 IST

पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे.

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेमध्ये लोकशाहीचे पाळेमुळे मजबुत करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊले उचलली जात आहे. मतदान प्रक्रिया राबवितांना पारदर्शकते सोबत गतीमानता आणली जाणार आहे. त्याची अंमलबजवनी ग्रामपंचायतींपासून होणार आहे. मतदानाच्या दिवशीच मतमोजनी होऊन निकाल जाहीर केला आहे. तसेच उमेदवारांना आॅनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे. लोकशाही प्रणालीमधील हा अभुतपूर्व बदल असून राज्य निवडणूक आयोगाने अंमलबजावनीचे आदेश दिले आहेत.पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर होणार आहे. त्याचा पहिला टप्पा निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. वार्डचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. निवडणूक घेण्यापूर्वी राज्य निवडणूक आयुक्त जोगेश्वर सहारिया यांनी राज्यभरातील अधिकाऱ्यांची व्हीडीओ काँफरन्सी घेतली. यात ग्रामपंचायत निवडणूक नवीन पद्धतीने घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र निवडणूक अधिकारी राहणार आहे. मतदानाच्या दिवशी पूर्णवेळ अधिकारी गावात असेल. मतदान पार पडल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये मतपेट्या जमा करण्यात येणार आहे. त्याचा दिवशी त्याच ठिकाणी मतमोजनी प्रक्रिया पारपडणार आहे. त्याच ठिकाणी निकाल जाहीर होणार आहे. या प्रक्रियेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. तहसीलवर जिल्हा निवडणूक विभागाचे नियंत्रण असणार आहे. ही संपूर्ण माहिती राज्य निवडणूक आयोगाकडे तत्काळ पोहचणार आहे. तसेच उमेदवाराची संपूर्ण माहिती लगतच्या पोलीस ठाण्यास जोडली जाणार आहे. विशेष म्हणजे कामकाज पारदर्शक आणि सर्वाधिक गतीमान होण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)