शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नगरपरिषदेत राजकीय गुंतागुत

By admin | Updated: December 26, 2015 03:20 IST

नगरपरिषदेतील विषय समिती निवड प्रक्रियेत बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नगरसेवकांची नाराजी : समित्यांच्या सभेला कोरमच जुळेना !यवतमाळ : नगरपरिषदेतील विषय समिती निवड प्रक्रियेत बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुसंख्य असलेल्या भाजपच्या वाट्यालाच येथे दुय्यम पदे मिळाली. भाजपा नगरसेवकांकडून जाहीर नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी झालेल्या नियोजन आणि बांधकाम समितीच्या सभेला कोरमच जुळला नाही. त्यामुळे शेवटी या दोन्ही सभा बारगळल्या. विषय समितीवरून नगरपरिषदेतील राजकीय गुंता वाढला आहे. भाजप आणि शिवसेनेचे १७ नगरसेवक असूनही सत्तेतील महत्वाची पदे राष्ट्रवादीला दिली जातात. भाजपाचे आमदार मदन येरावार यांनी विधानसभा निवडणूक काळात अनेक नगरसेवकांना सभापती बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेळ निघून गेल्यानंतर त्यांनी शब्द फिरविल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीतही युवा नगरसेवकांने आपल्या नेत्याच्या विरोधात उघड भुमिका घेतली आहे. विषय समितीला कोरम नसल्याने उपस्थित राहण्याचा आदेश या नगरसेवकाने धुडकावून लावला आहे. विषय समितीचे कामकाजच होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा काही नगरसेवकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे कोणीच नेतृत्व करत नसून प्रत्येक जण व्यक्तीगत नाराजी व्यक्त करत आहे. नगरसेवकांवर पक्ष श्रेष्ठींनी निर्णय लादल्याने ही गुंतागुंत निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारी नियोजन आणि बांधकाम समितीची सभा होती. मात्र कोरमच पूर्ण झाला नाही. तेव्हा समिती सदस्यांना फोन करून बोलवूनही प्रतिसाद दिला नाही. शेवटपर्यंत सभेला पाच नगरसेवक तर बांधकाम समिती सभेला चार सदस्य उपस्थित होते. सभा तहकूब करण्याची नामुष्की नवनियुक्त सभापतींवर ओढवली. (कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रवादीशी जवळीकीने भाजपा आमदारावर नाराजी भाजपाचे आमदार मदन येरावार सत्तेत आल्यानंतर भाजप नगरसेवकांना मोठे पाठबळ मिळले. अंतर्गत वादविवाद संपुष्टात येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक निष्ठावंताचा अपेक्षा भंग झाला. विषय समिती निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीची नेते मंडळी वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी ठेवणाऱ्या भाजप सदस्यांनाच समितीमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आमदार येरावार यांचे राष्ट्रवादी प्रेम उघड झाल्याची प्रक्रियात भाजपच्या गोटात आहे. समिती निवड प्रक्रियेच्या माध्यमातून भाजपा नगरसेवकांना एकसंघ करण्याची संधी होती. तसा प्रयत्न करण्याऐवजी आमदारांनी समिती निवडणुकीच्या काळात मुंबई दौरा काढला. तेथूनच ठरल्याप्रमाणे सर्व समित्यांची निवड झाली. या निवड प्रक्रियेमुळे भाजपातच गटबाजी निर्माण झाल्याची खंत व्यक्त होत आहे.