शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

नगरपरिषदेत राजकीय गुंतागुत

By admin | Updated: December 26, 2015 03:20 IST

नगरपरिषदेतील विषय समिती निवड प्रक्रियेत बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

नगरसेवकांची नाराजी : समित्यांच्या सभेला कोरमच जुळेना !यवतमाळ : नगरपरिषदेतील विषय समिती निवड प्रक्रियेत बहुतांश नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे. बहुसंख्य असलेल्या भाजपच्या वाट्यालाच येथे दुय्यम पदे मिळाली. भाजपा नगरसेवकांकडून जाहीर नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी झालेल्या नियोजन आणि बांधकाम समितीच्या सभेला कोरमच जुळला नाही. त्यामुळे शेवटी या दोन्ही सभा बारगळल्या. विषय समितीवरून नगरपरिषदेतील राजकीय गुंता वाढला आहे. भाजप आणि शिवसेनेचे १७ नगरसेवक असूनही सत्तेतील महत्वाची पदे राष्ट्रवादीला दिली जातात. भाजपाचे आमदार मदन येरावार यांनी विधानसभा निवडणूक काळात अनेक नगरसेवकांना सभापती बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेळ निघून गेल्यानंतर त्यांनी शब्द फिरविल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीतही युवा नगरसेवकांने आपल्या नेत्याच्या विरोधात उघड भुमिका घेतली आहे. विषय समितीला कोरम नसल्याने उपस्थित राहण्याचा आदेश या नगरसेवकाने धुडकावून लावला आहे. विषय समितीचे कामकाजच होऊ द्यायचे नाही, असा पवित्रा काही नगरसेवकांनी घेतला आहे. विशेष म्हणजे कोणीच नेतृत्व करत नसून प्रत्येक जण व्यक्तीगत नाराजी व्यक्त करत आहे. नगरसेवकांवर पक्ष श्रेष्ठींनी निर्णय लादल्याने ही गुंतागुंत निर्माण झाली आहे. बुधवारी दुपारी नियोजन आणि बांधकाम समितीची सभा होती. मात्र कोरमच पूर्ण झाला नाही. तेव्हा समिती सदस्यांना फोन करून बोलवूनही प्रतिसाद दिला नाही. शेवटपर्यंत सभेला पाच नगरसेवक तर बांधकाम समिती सभेला चार सदस्य उपस्थित होते. सभा तहकूब करण्याची नामुष्की नवनियुक्त सभापतींवर ओढवली. (कार्यालय प्रतिनिधी)राष्ट्रवादीशी जवळीकीने भाजपा आमदारावर नाराजी भाजपाचे आमदार मदन येरावार सत्तेत आल्यानंतर भाजप नगरसेवकांना मोठे पाठबळ मिळले. अंतर्गत वादविवाद संपुष्टात येतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अनेक निष्ठावंताचा अपेक्षा भंग झाला. विषय समिती निवड प्रक्रियेत राष्ट्रवादीची नेते मंडळी वरचढ ठरली. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सलगी ठेवणाऱ्या भाजप सदस्यांनाच समितीमध्ये संधी देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा आमदार येरावार यांचे राष्ट्रवादी प्रेम उघड झाल्याची प्रक्रियात भाजपच्या गोटात आहे. समिती निवड प्रक्रियेच्या माध्यमातून भाजपा नगरसेवकांना एकसंघ करण्याची संधी होती. तसा प्रयत्न करण्याऐवजी आमदारांनी समिती निवडणुकीच्या काळात मुंबई दौरा काढला. तेथूनच ठरल्याप्रमाणे सर्व समित्यांची निवड झाली. या निवड प्रक्रियेमुळे भाजपातच गटबाजी निर्माण झाल्याची खंत व्यक्त होत आहे.