शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

पांढरकवडा तालुक्यात राजकीय वातावरण तापले, सभापतींवरही अविश्वास ठराव : कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघासह आता पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:38 AM

पांढरकवडा तालुक्यात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे परस्परविरोधी गट कार्यरत आहेत. हे दोन्ही ...

पांढरकवडा तालुक्यात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे व भाजपचे नेते अण्णासाहेब पारवेकर यांचे परस्परविरोधी गट कार्यरत आहेत. हे दोन्ही गट एकमेकांविरुद्ध कुरघोडी करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. या दोन्ही गटात यापूर्वी अनेकदा समझोतासुद्धा झाला आहे; परंतु या दोन गटांतील विरोधाची ठिणगी गेल्या २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीत पडली. शिवाजीराव मोघे यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पारवेकर गट व शिवसेना यांच्यात युती करून कृषी उत्पन्न बाजार समितीने निवडणूक लढविली होती. या युतीने भरघोस यशसुद्धा मिळविले. सभापती पारवेकर गटाचा, तर उपसभापती मोघे गटाचा विराजमान झाला. त्यानंतर लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या; परंतु ठरल्याप्रमाणे पारवेकर गटाने या निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांना सहकार्य केले नाही. तेव्हापासूनच मोघे व पारवेकर गटात वितुष्ट आले. पारवेकर गटाचे बाजार समितीचे सभापती असलेले जान महम्मद जीवनी यांच्यावर मोघे गटाने अविश्वास ठराव आणला व त्यांना पायउतार केले. काही दिवस होत नाही तोच पारवेकर गटाने मोघे गटाचे खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंग कोंघारेकर यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला व त्यांना पायउतार केले. त्यानंतर मोघे गटाने पारवेकर गटावर पुन्हा कुरघोडी केली. पायउतार झालेले जितेंद्रसिंग कोंघारेकर यांनी सहायक निबंधकांकडे खविसंच्या विद्यमान नऊ संचालकांविरुद्ध तक्रार दाखल केली. खविसंच्या उपविधीतील तरतूद क्रमांक ४२ (ग) (१) नुसार विद्यमान संचालकांनी तरतुदींचे पालन केले नाही. त्यामुळे हे संचालक अपात्र ठरतात. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी तक्रार होती. सहायक निबंधकांनी या प्रकरणावर सुनावणी घेऊन संस्थेचे नऊ संचालक अपात्र ठरविण्यात आल्याचा निर्णय दिला व संस्थेवर तत्काळ प्रशासक नेमला.

बॉक्स : २७ जुलैला होणाऱ्या विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष

शिवसेनेचे विद्यमान पंचायत समिती सभापती पंकज तोडसाम यांच्यावर ८ पैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. यापैकी बहुसंख्य सदस्य हे पारवेकर गटाचे आहेत. या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी येत्या २७ तारखेला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता या विशेष सभेत पंकज तोडसाम यांच्यावर अविश्वास ठराव पारित होतो की काय, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.