शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पेंशनसाठी पोलीस कर्मचाऱ्याच्या विधवेची भटकंती

By admin | Updated: February 7, 2017 01:29 IST

आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेंन्शन मिळावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्याची विधवा दारोदार भटकत आहे.

पांढरकवडा : आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी अनुकंपा पेंन्शन मिळावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून पोलीस कर्मचाऱ्याची विधवा दारोदार भटकत आहे. परंतु अद्यापही या विधवेला पेंन्शन मिळाली नाही. तिच्या तरूण मुलाचाही मृत्यु झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबच उघड्यावर पडले आहे.स्थानिक इंदिरानगर येथील बेघर वसाहतीत वॉर्ड नं.६ मध्ये यमुनाबाई किसन उजवणे ही पोलीस कर्मचाऱ्याची विधवा आपली विधवा सून सुनीता, नातू कार्तीक व सुर्यकांत, नात पोर्णीमा यांच्यासह राहते. यमुनाबाईचे पती किसन उजवने (बकल नं.४५९) हे पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतांना एका प्रकरणात निलंबित झाले. त्यानंतर त्यांना कर्तव्यावर परत बोलविण्यात आले. परंतु सेवा पुर्ण होण्यापुर्वीच २४ आक्टोंबर २००५ रोजी त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. तेव्हापासून त्यांची विधवा यमुनाबाई ही आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी दरमहा पतीची अनुकंपा पेंन्शन मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे. पोलीस अधिक्षकांपासून, तर महासंचालक मुंबई व गृहमंत्रालयापर्यंत लेखी अर्ज विनंत्या केल्या. परंतु त्यांची दखल घेण्यात आली नाही. पतीचा मृत्यु होऊन ११ वर्षे उलटूनही पेंन्शन न मिळाल्यामुळे या कुटुंबाची रोज उपासमार होत आहे. पतीच्या मृत्युनंतर कुटुंबाचे कसेबसे पालन पोषण करणारा त्यांचा एकुलता एक तरुण मुलगा गजानन उजवणे याचासुद्धा दुर्देवी मृत्यु झाला. तेव्हापासून त्याची पत्नी, आई व तीन मुले अनाथ झाली आहे. मुलांचे पालन पोषण, त्यांचे शिक्षण करणे अशक्य झाले आहे. यमुनाबाई लोकांकडे भांडी घासण्याचे काम करुन कसेबसे जीवन व्यतीत करीत असून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवित आहे. या सर्व बाबीबाबत यमुनाबार्इंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत केले. परंतु अद्याप कोणीही या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. विशेष म्हणजे यमुनाबाईचे पती किसन यांचेसोबत असलेले दोन पोलीस कर्मचारी बकल न.४७४ व २१९ हे पण निलंबीत झाले होते. त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या पत्नीला पेंशन मिळत आहे. परंतु माझ्या पतीची हक्काची पेंशन मला का मिळत नाही, असा प्रश्न यमुनाबाईने उपस्थित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)प्रशासनाकडून नाचविले जात आहे कागदी घोडेयमुनाबाई मागील कित्येक वर्षापासून पेन्शनसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे अर्ज विनंत्या करीत आहे. त्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवित आहे.परंतु तीने अधिकाऱ्यांना सादर केलेले अर्ज व आवश्यक कागदपत्र हे फक्त या अधिकाऱ्यांकडून त्या अधिकाऱ्यांकडे तर त्या अधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहे. अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडन कित्येक वर्षापासून कागदी घोडे नाचविल्या जात आहे. परंतु गेल्या ११ वर्षापासून तिला न्याय मिळाला नाही.