शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पोलीस वसाहत, ठाण्यांसाठी जम्बो प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:33 IST

जिल्ह्यातील पोलीस ठाणे व पोलीस वसाहतींची अवस्था बकाल झाली आहे. अनेक इमारतींनी शतक पूर्ण केले आहे. त्यानंतरही पोलिसांचा कारभार येथेच सुरू आहे. झोपडी वजा शासकीय वसाहतींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा शोधावा लागतो.

ठळक मुद्देमुख्यालयाचा होणार कायापालट : यवतमाळ शहर ठाण्याच्या जागेवर व्यापारी संकुल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पोलीस ठाणे व पोलीस वसाहतींची अवस्था बकाल झाली आहे. अनेक इमारतींनी शतक पूर्ण केले आहे. त्यानंतरही पोलिसांचा कारभार येथेच सुरू आहे. झोपडी वजा शासकीय वसाहतींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना निवारा शोधावा लागतो. आता पोलीस वसाहतीकरिता पोलीस हाउसिंग या स्वतंत्र विभागाची राज्य पोलीस महासंचालकांच्या स्तरावर स्थापना झाली आहे. येथे जिल्ह्यातील चार पोलीस ठाण्यांच्या इमारतींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शिवाय पोलीस मुख्यालयाचाही कायापालट करणारा जम्बो प्लॅन मुंबईला पाठविला आहे.पोलिसांच्या शासकीय निवासाची समस्या अनेक वर्षापासून कायम आहे. शिस्तीचे खाते म्हणून सर्वाधिक अन्याय पोलिसांना सहन करावा लागतो. संघटन नसल्याने वरिष्ठ स्तरावर दाद मागण्याची सोय नाही. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस इमारतीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी वैयक्तीस्तरावर पाठपूरावा सुरू केला. शक्य तितका निधी जिल्हा नियोजन समितीतून मिळवला. याकरित पालकमंत्री मदन येरावार यांचा पुढाकार महत्वाचा ठरला आहे.जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाणे व वसाहत बांधकामाचा कार्यादेश आला आहे. पोलीस हाउसिंगच्या निधीतून ही इमारत होत आहे. याच पद्धतीने वणी, दिग्रस व यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या इमारती व वसाहतीचा प्रस्ताव आहे. शिवाय जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरात जवळपास २५३ क्वॉर्टर प्रस्तावित आहे. पळसवाडी कॅम्प पोलीस वसाहतीत ८६ क्वॉर्टर आहे.रस्त्यावर दुकान गाळे, आत पोलीस ठाणेयवतमाळ शहरात पोलीस ठाण्याच्या जागेची व्यावसायिक उपयोगीता पाहता येथे कमर्शिअल इमारत प्रस्तावित आहे. दोन प्रमुख रस्त्यांवर दुकान गाळे काढणार आहे. तर मध्यवर्ती भागात पोलीस ठाणे व उर्वरित जागेत क्वॉर्टर राहणार आहेत. या प्रोजेक्टला १० कोटींचा खर्च अपेक्षित असून पाच कोटी जिल्हा नियोजन समितीकडून तर पाच कोटी पोलीस हाउसिंगकडे मागण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आणखी पाच कोटींच्या इमारतीचा प्रस्ताव आहे. जिल्हा नियोजन समितीतून नेर, घाटंजी व पोलीस मुख्यालयातील क्वॉर्टरसाठी चार कोटी ९९ लाखांची तरतूद नियोजन समितीकडून केली जाणार आहे. यातील त्रृटींची पूर्तता केल्यानंतर या प्रस्तावाला गती मिळणार आहे.