शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

जिल्हाभरातील पोलीस दररोज तीन तास रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 21:38 IST

आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे.

ठळक मुद्देतयारी गणेशोत्सवाची : कायदा व सुव्यवस्था राखण्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आगामी गणेशोत्सवातील तयारीचा भाग म्हणून जिल्हाभरातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी शुक्रवारपासून दररोज सायंकाळी ६ ते ८ असे तीन तास रस्त्यावर राहणार आहेत. या तीन तासात वाहनांची तपासणी, गुन्हेगारांची तपासणी, समन्स-वॉरंट अंमलबजावणी यावर भर दिला जाणार आहे.१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवास प्रारंभ होतो आहे. या निमित्ताने राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नुकतीच राज्यातील सर्व घटक प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत महासंचालकांनी दिलेल्या दिशानिर्देशांची माहिती देण्यासाठी व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी गुरुवारी येथे जिल्हाभरातील सर्व ठाणेदार, एसडीपीओंची बैठक घेतली. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक अमरसिंग जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. गणेशोत्सवातील शांततेसाठी अनेक उपाययोजना या बैठकीत सूचविण्यात आल्या. त्यानुसार आता दररोज सायंकाळी तीन तास सर्व पोलीस आपल्या ठाण्यांच्या हद्दीत गस्तीवर राहणार आहे. या काळात गुन्हेगारीला प्रतिबंध घालणे, लोकांना भेटणे, समस्या जाणून घेणे, संशयितांची धरपकड, शस्त्र तपासणी, रॅली, जनजागृती आदींवर भर राहणार आहे.एसडीपीओ व ठाणेदार गावातप्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांची अ आणि ब गटात वर्गवारी केली जाणार आहे. या प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेट देण्याचे आदेश एसडीपीओ व ठाणेदारांना देण्यात आले आहे. प्रत्येक गावात व्हीलेज रजिस्टर लिहून त्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्याचे बंधन त्यांना घालण्यात आले. विविध सामाजिक संस्था, शांतता समिती यांच्या बैठका घेतल्या जाणार आहे. अनेक ठाणेदारांनी गुरुवारपासूनच महानिरीक्षकांच्या सायंकाळच्या तीन तासाच्या गस्तीची अंमलबजावणी सुरू केली.तडीपारीचे प्रस्ताव निकाली काढा - तरवडेगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए, तडीपारीचे प्रस्ताव वेगाने मार्गी लावून निकाली काढण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी ठाणेदारांना दिल्या. गणेशोत्सवातील शांततेसाठी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. समन्स-वॉरंटची प्रामाणिकपणे व तत्परतेने तामिली होत नसल्याने पोलिसांवर न्यायालयाची नेहमीच नाराजी राहते. ती टाळण्यासाठी समन्स-वॉरंटची तत्काळ अंमलबजावणी करण्यास ठाणेदारांना सांगण्यात आले. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा काटेकोर तपास करून आरोपीला न्यायालयात शिक्षा होईल यावर भर द्यावा, या माध्यमातून न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचा दर वाढवावा, असे निर्देश महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी सर्व ठाणेदारांना दिले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस