शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भूसंपादनावरून पोलीस व महसूल पथकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:42 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला.

ठळक मुद्देअर्जुना येथील घटना : ठाणेदार व दोन महिला पोलीस जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरी : नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. अर्जुना येथे महामार्गात येणाऱ्या घरांचा मोबदला देऊन जमीन संपादित केली आहे. भूसंपादनात केवळ एक घर शिल्लक असल्याने तेथे ताबा घेण्यासाठी गेलेल्या महसूल व पोलीस पथकावर एकाच कुटुंबातील तिघांनी हल्ला केला. यात ठाणेदारासह दोन महिला पोलीस जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजता घडली.भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अर्जुना येथील रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल यांनी त्यांचे राहते घर रिकामे केले नाही. या जागेचा ताबा घेण्यासाठी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक अर्जुना येथे पोहोचले. यावेळी रवींद्र गोकुलप्रसाद जयस्वाल, नीता रवींद्र जयस्वाल व रोशन रवींद्र जयस्वाल यांची महसूल कर्मचाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. घराचा मोबदला योग्य मिळाला नसल्याचा आक्षेप जयस्वाल कुटुंबियांनी घेतला. पथकातील कर्मचारी समजूत काढत असतानाच नीता जयस्वाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला. महिला पोलीस शिपाई शीला खडसे व आशा नाईक या दोघींवर हल्ला केला. तसेच इतर कर्मचाºयांवर दगडफेक सुरू केली.यातील विटेचा तुकडा पोलीस निरीक्षक दीपक पवार यांना लागला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करीत तिघांनाही ताब्यात घेतले. वाहनात डांबून त्यांना ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी नायब तहसीलदार शिल्पा नगराळे यांनी जयस्वाल कुटुंबीयांविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून हल्ला केल्याची तक्रार दिली. तसेच जखमी पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही तिघांविरुद्ध तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणात कोणतीही नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली नव्हती. मात्र आरोपींच्या अटकेसाठी न्यायालयाकडे रीतसर परवानगीचा अर्ज ग्रामीण पोलिसांनी केला होता.काही काळ तणावभूसंपादनासाठी अर्जुना येथे केवळ एकाच घराचा अडथळा आहे. तो समजुतीने दूर करण्यासाठी गेलेल्या पथकांसोबत वाद झाला यामुळे घटनेला वेगळे वळण मिळाले.

टॅग्स :PoliceपोलिसNational Highwayराष्ट्रीय महामार्ग