शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विषारी गवतामुळे ११ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला.

ठळक मुद्देचिचबर्डीतील घटना : दूध उत्पादकाचे चार लाखांचे नुकसान, पशुपालकांत घबराहट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : घरच्या शेतात नेहमी चरायला जाणाऱ्या जनावरांचा एका पाठोपाठ एक असा मृत्यू झाला. काही समजायच्या आत तब्बल ११ जनावरे ठार झाली. ही घटना नेर मार्गावरील चिचबर्डी येथे घडली. विषाक्त गवत खालल्यामुळे जनावरे दगावल्याचे पशुवैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.चिचबर्डी हे यवतमाळ लगत असल्याने येथे बहुतांश शेतकऱ्यांचा दूध उत्पादनाचा व्यवसाय आहे. प्रत्येकाकडे म्हशी, गाई आहे. ओमराज चव्हाण या शेतकऱ्याकडेही दुधाच्या म्हशी व गाई होत्या. आता कपाशीचे पीक शेवटच्या टप्प्यात असल्याने त्यात घरची जनावरे चरण्यासाठी सोडली. २१ जानेवारीपासून काही जनावरांमध्ये शरीरिक त्रास दिसू लागला. स्थानिक पशुवैद्यकीय यांना जनावरे दाखविली. मात्र पायझनिंगचा प्रकार आहे एवढेच सांगण्यात आले. एका पाठोपाठ एक अशी जनावरे दगावण्यास सुरुवात झाली. दुधाच्या चार म्हशी ठार झाल्या. पाच वगारी, एक हल्या व एका कालवडीचा सुद्धा यात समावेश आहे. आठ दिवसात चार लाखांचे पशुधन नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली. शिवाय गावातील इतर पशुपालकांमध्येही दहशत निर्माण झाली.नेमकी जनावरे कशामुळे दगावतात याचा शोध घेतला असता विषाचा अंश असलेले गवत शेतामध्ये आढळून आले. या गवताला बोली भाषेत छोटा मीरा, ढोर काकडा असे संबोधतात. गर्द हिरव्या रंगाचे हे गवत जनावरांना आकृष्ट करते. या गवताला जांभळ्या रंगाची फुलं येतात. गवतात विषाचा अंश असल्याने जास्त प्रमाणात खाण्यात आल्यास जनावरे दगावतात. ओमराज चव्हाण यांच्या कपाशीच्या शेतात ओलितामुळे मोठ्या प्रमाणात छोटा मीरा हे गवत उगवल्याचे दिसून येते. चिचबर्डी येथील इतरही शेतकऱ्यांच्या शेतात हे गावत उगवले आहे. मात्र वेळीच सावध होवून जनावरांना छोटा मीरा गवत असलेल्या शेतात सोडणे बंद केले.अशी आहेत लक्षणेछोटा मीरा, ढोर काकडा हे गवत खाण्यात आल्यास जनावर रवंथ करण थांबवितात. त्यानंतर लाळ गाळते. जनावराच्या शारीराला कंप सुटतो. ते थरथर कापते. जनावराची शौच व लघवी बंद होते. पोट फुगून जनावराचा मृत्यू होतो. बºयाचदा जनावराची मानही वाकडी होते. ही या गवतामुळे झालेल्या विषबाधेची लक्षणे आहे.बोली भाषेत छोटा मीरा संबोधल्या जाणाºया गवतामध्ये अ‍ॅक्झालिक पॉयझन असते. या गवताचे सेवन केल्यानंतर जनावरांना विषबाधा होते. चिचबर्डी येथील जनावरांचे नमुने पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविले आहे. लक्षणावरून जनावरांचा अ‍ॅक्झालिक पॉयझनिंगमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत आहे.- डॉ.भावना झाडेपशुधन विकास अधिकारीफिरता दवाखाना

टॅग्स :Farmerशेतकरी