शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

By admin | Updated: September 9, 2015 02:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे,

सुधाकर अक्कलवार  घाटंजीनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश लोणकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि सरकारचे धोरण या मुद्यावर लोणकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलेपत्र लिहिले. त्याबाबत त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे दोन लाख शेतकरी सभासद आहे. त्यातील १ लाख १७ हजार शेतकरी थकबाकीदार असून ८७ हजार शेतकऱ्यांना चालू कर्ज मिळाले आहे. या नियमित शेतकऱ्यांना ४१५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले आहे तर, थकीत सभासदांकडे ४९४ कोटी रुपये थकीत आहे. असे एकूण दोन लाख शेतकऱ्यांकडे ९०९ कोटी रुपये थकले आहे. तसेच मोटरपंप, पाईप लाईन, स्प्रिंकलर, ठिबक आदींसाठी घेतलेले ९४ कोटी रुपयांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. नदी, नाले, विहिरी पावसाअभावी कोरड्या पडल्याने या खर्च केलेल्या कर्जाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. मात्र त्यावरील व्याज कायम आहे. जिल्हा बँकेचे अनेक शेतकऱ्यांकडे वाहनांसाठी दिलेले ५६ कोटी रुपयांचे बिगर शेती कर्ज तर शिक्षण व उद्योगासाठी दिलेले एक कोटी २० लाखांचे कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे. कृषी मूल्य आयोगाने कापूस व सोयाबीनला हमीभावात केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात कारखानदारांचे ४५ हजार कोटी रुपये माफ झाले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांचे ५० हजार कोटींचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सरकारला अडचण का भासावी, असा प्रश्नही लोणकर यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारने कमी प्रमाणात का होई ना दोनदा कर्जमाफी दिली. आता युती सरकारनेही सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.