शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

By admin | Updated: September 9, 2015 02:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे,

सुधाकर अक्कलवार  घाटंजीनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश लोणकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि सरकारचे धोरण या मुद्यावर लोणकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलेपत्र लिहिले. त्याबाबत त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे दोन लाख शेतकरी सभासद आहे. त्यातील १ लाख १७ हजार शेतकरी थकबाकीदार असून ८७ हजार शेतकऱ्यांना चालू कर्ज मिळाले आहे. या नियमित शेतकऱ्यांना ४१५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले आहे तर, थकीत सभासदांकडे ४९४ कोटी रुपये थकीत आहे. असे एकूण दोन लाख शेतकऱ्यांकडे ९०९ कोटी रुपये थकले आहे. तसेच मोटरपंप, पाईप लाईन, स्प्रिंकलर, ठिबक आदींसाठी घेतलेले ९४ कोटी रुपयांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. नदी, नाले, विहिरी पावसाअभावी कोरड्या पडल्याने या खर्च केलेल्या कर्जाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. मात्र त्यावरील व्याज कायम आहे. जिल्हा बँकेचे अनेक शेतकऱ्यांकडे वाहनांसाठी दिलेले ५६ कोटी रुपयांचे बिगर शेती कर्ज तर शिक्षण व उद्योगासाठी दिलेले एक कोटी २० लाखांचे कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे. कृषी मूल्य आयोगाने कापूस व सोयाबीनला हमीभावात केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात कारखानदारांचे ४५ हजार कोटी रुपये माफ झाले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांचे ५० हजार कोटींचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सरकारला अडचण का भासावी, असा प्रश्नही लोणकर यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारने कमी प्रमाणात का होई ना दोनदा कर्जमाफी दिली. आता युती सरकारनेही सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.