शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करा

By admin | Updated: September 9, 2015 02:42 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे,

सुधाकर अक्कलवार  घाटंजीनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वच प्रकारचे कर्ज माफ करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश लोणकर यांनी केली आहे. शेतकऱ्यांची स्थिती आणि सरकारचे धोरण या मुद्यावर लोणकर यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलेपत्र लिहिले. त्याबाबत त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे दोन लाख शेतकरी सभासद आहे. त्यातील १ लाख १७ हजार शेतकरी थकबाकीदार असून ८७ हजार शेतकऱ्यांना चालू कर्ज मिळाले आहे. या नियमित शेतकऱ्यांना ४१५ कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले गेले आहे तर, थकीत सभासदांकडे ४९४ कोटी रुपये थकीत आहे. असे एकूण दोन लाख शेतकऱ्यांकडे ९०९ कोटी रुपये थकले आहे. तसेच मोटरपंप, पाईप लाईन, स्प्रिंकलर, ठिबक आदींसाठी घेतलेले ९४ कोटी रुपयांचे मध्यम मुदती कर्ज थकीत आहे. नदी, नाले, विहिरी पावसाअभावी कोरड्या पडल्याने या खर्च केलेल्या कर्जाचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होत नाही. मात्र त्यावरील व्याज कायम आहे. जिल्हा बँकेचे अनेक शेतकऱ्यांकडे वाहनांसाठी दिलेले ५६ कोटी रुपयांचे बिगर शेती कर्ज तर शिक्षण व उद्योगासाठी दिलेले एक कोटी २० लाखांचे कर्ज थकीत आहे. या सर्व शेतकऱ्यांना सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे. कृषी मूल्य आयोगाने कापूस व सोयाबीनला हमीभावात केवळ ५० रुपये वाढ देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचेही त्यांनी नमूद केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात कारखानदारांचे ४५ हजार कोटी रुपये माफ झाले. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात व्यापाऱ्यांचे ५० हजार कोटींचे कर्ज माफ केले गेले. मग शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास सरकारला अडचण का भासावी, असा प्रश्नही लोणकर यांनी उपस्थित केला. गेल्या सरकारने कमी प्रमाणात का होई ना दोनदा कर्जमाफी दिली. आता युती सरकारनेही सर्वच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सरसकट माफी देण्याची मागणी सुरेश लोणकर यांनी केली आहे.