शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रंग खेळा पण जरा जपूनच..

By admin | Updated: March 6, 2015 02:05 IST

आपल्या सहकाऱ्याला लावलेला रंग अधिक काळ टिकावा म्हणून सवंगड्यांकडून होळीच्या दिवसांमध्ये चांगलाच प्रयत्न होतो. सहकाऱ्यांचा हा रंग त्वचेला घातक ठरू शकतो.

.रूपेश उत्तरवार यवतमाळआपल्या सहकाऱ्याला लावलेला रंग अधिक काळ टिकावा म्हणून सवंगड्यांकडून होळीच्या दिवसांमध्ये चांगलाच प्रयत्न होतो. सहकाऱ्यांचा हा रंग त्वचेला घातक ठरू शकतो. याचे कारणही तसेच आहे. कारण बाजारात आलेल्या पक्या रंगात रसायणाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळ रंग खेळतांना तो जरा जपूनच खेळावा लागणार आहे. रंगपंचमीच्या पर्वावर बाजारात नानाविध रंग आहेत. यामध्ये काही रंग पक्के तर काही रंग मॅजिक कलर आहे. यासोबत गुलालही बाजारात आला आहे. गुलालामध्ये सुहासिक गुलाल बाजारात आला आहे. रंगाचे हे विविध प्रकार बाजारात असले तरी स्वस्त दरात अधिक रंगणाऱ्या रंगालाच सर्वाधिक मागणी आहे. यामध्ये चमकीचे कलर, एमआयडीसी कलर नावाने प्रसिद्ध असलेल्या रंगांना सर्वाधिक मागणी आहे. हे रंग अधिक काळ टिकणारे रंग म्हणून ओळखले जातात.रंग तयार करताना कंपन्या अधिक रंगण्यासाठी यामध्ये रसायणाचा अधिक वापर करतात. त्वचेसाठी अधिक रसायणांचा वापर घातक आहे. डोळ्याला याची इजा पोहचण्याचा धोका आहे. यातून अंधत्व येण्याचाही धोका असल्यचे तज्ज्ञ सांगतात.गुलाल अथवा नैसर्गीक कलरच वापरारसायण युक्त रंगांची उधळण रंगपंचमीत घातक आहे. यामध्ये गुलालयुक्त रंग सुयोग्य मानले जातात. तोच सर्वाधिक सुरक्षित रंग आहे. यासोबतच पळस फुलांचा रंग उधळण्यासाठी सुयोग्य आहे. फुल कांडून त्याचा रंग तयार करण्याची पद्धती पूर्वी वापरली जात होती. मात्रा आता हा प्रकार होत नाही. थेट तयार कलर विकत घेतले जातात. याच ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होते. क्षणिक आनंदासाठी कुणालाही इजा पोहचू नये याची खबरदारी घेण्याची नितांत आवशकता आहे. काळजीपूर्वक होळी खेळल्यास या सणाचा आनंद प्रत्येकाचा व्दिगुणित होऊ शकते, याचा विचार होणे गरजेचे आहे.अशी घ्या काळजीरंग खेळण्यापूर्वी त्वचेला कुठलीही इजा होऊ नये म्हणून काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. यामध्ये संपूर्ण अंगाला ग्लिसरीन, तेल, अथवा पोमिट लावावे. यामुळे समोरच्या व्यक्तीने लावलेला कलर थेट त्वचेवर प्रभाव करणार नाही. यातून त्वचा रखरखीत होणार नाही तसेच अंगावर पुरळ येणार नाही. त्वचेची जळजळ होण्याचा प्रकार थांबेल. डोक्यावर रंग टाकल्यास प्रथम डोके साफ करावे. अंगाचा कलर साध्या कापडाने पुसून घ्यावा. यामुळे अंगाची होणारी इजा टाळता येईल.लहान मुलांना रंग लावू नकाचिमुकल्यांची त्वचा नाजूक असते. रंगाचा त्वचेवर परिणाम होतो. यासाठी चिमुकल्यांना रंग लागणार नाही, याची काळजी घेतली पाहीजे. रंगांपासून लहान मुलांना दूर ठेवण्यात यावे.