शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

जिल्ह्यात अडीच लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 05:00 IST

वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४५ हजार ९४३ वृक्षांची लागवड केली.

ठळक मुद्देसर्वाधिक पुसदमध्ये : यवतमाळमध्ये १४ हजार हेक्टर तर पांढरकवडा झिरो

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वन विभागाने यावर्षी शतकोटी वृक्ष लागवड योजना पैशाअभावी गुंडाळली आहे. केवळ कॅम्पा, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या निधीतूनच वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. दोन लाख ६० हजार ७४९ वृक्षांची ४५० हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली आहे. यातही सर्वाधिक वृक्ष लागवड पुसद उपविभागात आहे.वृक्ष लागवड योजनेच्या माध्यमातून मागील पाच वर्षात मोठा गाजावाजा व ईव्हेन्ट साजरा केला जात होता. २०१९ मध्ये लावलेल्या रोपांपैकी तब्बल ८५.५० टक्के रोपे जीवंत असल्याचा अहवाल वन विभागाने जाहीर केला आहे. प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळीच आहे. तीन ते चार वर्षातील सरासरी जीवंत रोपाची संख्या ही एकूण लागवडीपेक्षा ४० टक्के असल्यास योजना शंभर टक्के यशस्वी झाल्याचे मानले जाते. युती सरकारच्या काळात भाजपचे वनमंत्री असताना वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा केला. प्रत्यक्षात मात्र ही योजना किती यशस्वी ठरते याचा कधीही आढावा घेण्यात आला नाही. आता सरकार बदलले व कोरोना संसर्गामुळे सर्वत्रच आर्थिक मंदी पसरली आहे. याचा फटका वन विभागाच्या योजनांनाही बसला आहे. त्यामुळे वन विभागाने वृक्ष लागवडीला कात्री लावली आहे.वन विभागाकडे विविध प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्र सरकार वन लागवडीसाठी निधी देते. कॅम्पातून मिळालेला निधी तसेच जिल्हा नियोजन समितीने दिलेला निधी या आधारावरच २०२० या वर्षातील वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले. त्यातही पुसद उपविभागात १८ ठिकाणी दोन लाख ४५ हजार ९४३ वृक्षांची लागवड केली. यवतमाळ उपविभागात एका ठिकाणी १४ हजार ८०६ वृक्ष लागवड करण्यात आली. पांढरकवडा उपविभागात मात्र यावर्षी एकही वृक्ष लागवड झालेली नाही. वन विभाग यावर्षी पूर्णपणे वृक्ष व वनसंवर्धन, संरक्षणाच्या कामावर लक्ष देणार आहे. यामुळे जंगलातील तस्करीला आळा बसेल असे सांगण्यात येते.मागील तीन वर्षात लागवड झालेल्या वृक्षांचे जीवंत राहण्याची प्रमाण अतिशय चांगले आहे. २०१९ मध्ये लावलेल्या एकूण रोपापैकी ८५.५० टक्के रोपे सध्या जीवंत आहेत. वनसंवर्धन व संरक्षण यावरच यंत्रणेचा भर आहे. शासनाने सर्वच विभागाचे आर्थिक बजेट कमी केले आहे. याचा परिणाम काही प्रमाणात वन विभागाच्या योजनांवर होत आहे.- रवींद्र वानखडे,वनसंरक्षक, यवतमाळ

टॅग्स :environmentपर्यावरण