शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

नियोजन ४१६ कोटींचे खर्च केवळ ६७ कोटी

By admin | Updated: October 29, 2014 22:55 IST

जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ४१६ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. त्यातील २१३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळताही करण्यात आला. मात्र आठ महिन्यात यातील केवळ

विकास खोळंबला : नवीन जिल्हा नियोजन समितीपुढे आव्हानरूपेश उत्तरवार - यवतमाळ जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने ४१६ कोटी रुपयांचे नियोजन केले होते. त्यातील २१३ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याकडे वळताही करण्यात आला. मात्र आठ महिन्यात यातील केवळ ६७ कोटी रुपयेच खर्च झाल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील विकास कामांचा खोळंबा होत असून नवीन जिल्हा नियोजन समितीला निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे.जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी वित्त व नियोजन विभाग जिल्ह्यासाठी निधी आरक्षित करतो. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत असलेली जिल्हा नियोजन समिती विकास कामांचे नियोजन करते. त्याची वर्षभर अंमलबजावणी केली जाते. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना आणि अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी वित्त आणि नियोजन विभागाने यवतमाळ जिल्ह्यासाठी ४१६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे शासनाने एकूण तरतुदीच्या ६० टक्के निधी जिल्ह्याकडे वळता केला आहे. म्हणजे जिल्ह्याला २१३ कोटी रुपये मिळाले आहे. परंतु विविध कारणांनी हा निधी विकास कामांवर खर्चच झाला नाही. आतापर्यंत केवळ ६७ कोटी रुपये खर्च झाल्याचे पुढे आले आहे.मध्यंतरीच्या कालखंडात तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांनी जिल्ह्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकाही होत नव्हत्या. त्यानंतर पालकमंत्री बदलविण्याची मागणी पुढे आली. त्यातूनच शिवाजीराव मोघे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. काही दिवसातच विधानसभची आचारसंहिता लागली. यामुळे विकास कामांवरील खर्चाला ब्रेक लागला. यातून विकास कामांच्या योजना निधी असूनही खोळंबल्या आहेत. आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्र्यांची निवड केली जाईल, त्यानंतर जिल्ह्यात निवडून आलेले आमदार कोणत्या कामांना प्राधान्य देतात हे त्यावेळीच कळेल. त्यामुळे जिल्ह्याला मिळालेला २१३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याचे आवाहन या समितीपुढे राहणार आहे. बीडीएसवर २१३ कोटी रुपये उपलब्ध झाल्यानंतर ६७ कोटीच खर्च झाले. उर्वरित चार महिन्यात ३५२ कोटी रुपयांची कामे पूर्ण करण्याचे आवाहन राहणार आहे. आठ महिन्यात ६७ कोटी खर्च झाल्याने ३५२ कोटी चार महिन्यात कसे खर्च होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.