शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

-तर बेंबळावरून अमृत योजनेची पाईपलाईन टाकू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेतील पाईप लाईनच्या ‘टेस्टिंग’दरम्यान गळव्हा गावातील शेतशिवारात पाईप फुटला. यामध्ये २५ एकरांमधील शेताची सुपीक माती वाहून गेली. संपूर्ण खडक उघडा पडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी जीवन प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ...

ठळक मुद्देगळव्हाच्या शेतकऱ्यांचा इशारा : पाईपलाईन फुटल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमृत योजनेतील पाईप लाईनच्या ‘टेस्टिंग’दरम्यान गळव्हा गावातील शेतशिवारात पाईप फुटला. यामध्ये २५ एकरांमधील शेताची सुपीक माती वाहून गेली. संपूर्ण खडक उघडा पडला. यामुळे नुकसानग्रस्त शेतकºयांनी जीवन प्राधिकरणाकडे धाव घेतली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हात वर केल्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यापुढे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना शिवारात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही दिला.बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा शिवारात अमृत योजनेची पाईपलाईन फुटली. पाण्याच्या वेगाने २५ एकरातील मातीचा थर वाहून गेला. आता शेताला तलावाचे रूप आले. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या संपूर्ण बियाण्याचे नुकसान झाले. शेतशिवार दुरूस्त होण्यासाठी एका वर्षाचा कालावधी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पाच लाख रूपये मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. पाच शेतक ºयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनी केला. मात्र त्यांनी असमर्थता दर्शवित पुन्हा फोनच उचलले नाही. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धाव घेतली. या शेतकºयांनी प्राधिकरणाला आता शेत शिवारात पाय ठेवू देणार नसल्याचे सांगितले आहे.यावेळी प्रफुल्ल खोके, प्रदीप बोबडे, तुळशिराम बोबडे, मोहन वाघमारे, रामराव उकंडे, रमेश बडगुले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.