शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नेर तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी हतबल । कीड नियंत्रणासाठीचे प्रयत्न असफल, पुन्हा ओढवले आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी व कृषी संशोधन केंद्राच्या सुचविलेल्या उपाययोजनाही आता काम करत नाहीत. गुलाबी बोंडअळीने पुन्हा कापसाच्या बोंडात घर केले आहे. उभे कापसाचे पीक या बोंडअळी फस्त करीत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या प्रकोपातून पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या. मात्र त्यात अपयश आले. आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीच्या संकटात शेतकऱ्यांना योग्य साथ द्यावी, अशी मागणी होत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे संपूर्ण उत्पन्नच धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी अधीक्षकांना बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टीने सतर्क केले होते. नागपूरच्या कापूस व संशोधन केंद्रात शास्त्रज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीची विष पचविण्याची क्षमता १३८७ पट वाढल्याचे सांगितले होते. त्यानंतरही राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र बोंडअळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यात अपयशी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने बीजी-३ ला परवानगी दिली नाही. त्यानंतरही नेरमध्ये बीजी-३ ची पेरणी झाली. एकंदरीत देशी वाणांचे बियाणे संपुष्टात आणण्यासाठी परकीय कंपन्यांनी बियाण्यावर अधिराज्य निर्माण केले आहे. गुलाबी अळीला जन्म देणाºया बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे शेतकºयांची दैनावस्था झाली आहे.कृषी विभागाची यंत्रणा सुस्तचनेर तालुक्यात बोंडअळीचा उद्रेक झाला असताना कृषी विभागाची यंत्रणा सुस्त आहे. बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाही. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस