शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

नेर तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी हतबल । कीड नियंत्रणासाठीचे प्रयत्न असफल, पुन्हा ओढवले आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी व कृषी संशोधन केंद्राच्या सुचविलेल्या उपाययोजनाही आता काम करत नाहीत. गुलाबी बोंडअळीने पुन्हा कापसाच्या बोंडात घर केले आहे. उभे कापसाचे पीक या बोंडअळी फस्त करीत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या प्रकोपातून पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या. मात्र त्यात अपयश आले. आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीच्या संकटात शेतकऱ्यांना योग्य साथ द्यावी, अशी मागणी होत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे संपूर्ण उत्पन्नच धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी अधीक्षकांना बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टीने सतर्क केले होते. नागपूरच्या कापूस व संशोधन केंद्रात शास्त्रज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीची विष पचविण्याची क्षमता १३८७ पट वाढल्याचे सांगितले होते. त्यानंतरही राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र बोंडअळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यात अपयशी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने बीजी-३ ला परवानगी दिली नाही. त्यानंतरही नेरमध्ये बीजी-३ ची पेरणी झाली. एकंदरीत देशी वाणांचे बियाणे संपुष्टात आणण्यासाठी परकीय कंपन्यांनी बियाण्यावर अधिराज्य निर्माण केले आहे. गुलाबी अळीला जन्म देणाºया बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे शेतकºयांची दैनावस्था झाली आहे.कृषी विभागाची यंत्रणा सुस्तचनेर तालुक्यात बोंडअळीचा उद्रेक झाला असताना कृषी विभागाची यंत्रणा सुस्त आहे. बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाही. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस