शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

नेर तालुक्यात कापसावर गुलाबी बोंडअळीचा हल्ला, पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देशेतकरी हतबल । कीड नियंत्रणासाठीचे प्रयत्न असफल, पुन्हा ओढवले आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : तालुक्यातील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. कृषी व कृषी संशोधन केंद्राच्या सुचविलेल्या उपाययोजनाही आता काम करत नाहीत. गुलाबी बोंडअळीने पुन्हा कापसाच्या बोंडात घर केले आहे. उभे कापसाचे पीक या बोंडअळी फस्त करीत आहेत. शेतकरी हतबल झाला आहे.टेंभी, शिरसगाव, सिंदखेड, पिंपळगाव(डुब्बा) तालुक्यातील या गावांमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. अनेक बोंडांमध्ये अळी अंडे देण्यात व्यस्त आहे. कृषी विभागाला याबाबत वारंवार माहिती देऊनही त्यांच्याकडून कोणतेच मार्गदर्शन अथवा उपाय सुचविण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी या बोंडअळीच्या प्रकोपातून पीक वाचविण्यासाठी कृषी केंद्र चालकाच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या. मात्र त्यात अपयश आले. आता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन गुलाबी बोंडअळीच्या संकटात शेतकऱ्यांना योग्य साथ द्यावी, अशी मागणी होत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे संपूर्ण उत्पन्नच धोक्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांच्यास्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शासनाने काही वर्षांपूर्वी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी अधीक्षकांना बोंडअळी नियंत्रणाच्यादृष्टीने सतर्क केले होते. नागपूरच्या कापूस व संशोधन केंद्रात शास्त्रज्ज्ञांनी गुलाबी बोंडअळीची विष पचविण्याची क्षमता १३८७ पट वाढल्याचे सांगितले होते. त्यानंतरही राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ कापूस संशोधन केंद्र बोंडअळीचे संपूर्ण उच्चाटन करण्यात अपयशी ठरले. जेनेटिक इंजिनिअरिंग कंपनीने बीजी-३ ला परवानगी दिली नाही. त्यानंतरही नेरमध्ये बीजी-३ ची पेरणी झाली. एकंदरीत देशी वाणांचे बियाणे संपुष्टात आणण्यासाठी परकीय कंपन्यांनी बियाण्यावर अधिराज्य निर्माण केले आहे. गुलाबी अळीला जन्म देणाºया बियाण्यांची निर्मिती केली जात आहे. यामुळे शेतकºयांची दैनावस्था झाली आहे.कृषी विभागाची यंत्रणा सुस्तचनेर तालुक्यात बोंडअळीचा उद्रेक झाला असताना कृषी विभागाची यंत्रणा सुस्त आहे. बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नाही. या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस