शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:59 IST

शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे.

ठळक मुद्देसंजय राठोड, माणिकराव ठाकरेंची भेट : मांगलादेवी परिसरात संकटांची मालिका

लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे. प्रशासनाने अद्यापही सर्वेक्षण सुरू न केल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न मांगलादेवी व परिसरातील शेतकरी डबडबलेल्या नजरेने करीत आहेत. या ज्वलंत प्रश्नी नेते मंडळी केवळ शेताला भेट देऊन शेतकºयांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे सोपस्कार पार पाडत आहे.झाडाची हिरवी बोंडेही कीडीने पोखरली आहे. शेतकºयांनी आपली कैफियत जिल्हाधिकाºयांकडे मांडली. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, देवानंद पवार यांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.रविवारी संजय राठोड यांनी कृषी संचालक, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, संबंधित बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना संपूर्ण शेतच बोंड अळीने फस्त केलेले दिसले. दहापुते यांना मागच्यावर्षी याच शेतात ५८ क्विंटल कापूस झाला होता. यंदा मात्र एक क्विंटलही कापूस होणार नाही, कर्ज काढून शेती केली, परंतु बोंड अळीने पुरता बर्बाद झालो, असे त्यांनी डोळ्यात आसवे आणत राज्यमंत्र्यांना सांगितले. अशीच परिस्थिती मांगलादेवी व परिसरातील शेतकºयांची आहे. यावेळी ना. राठोड यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन शेतकºयांना केले. बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.