शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

गुलाबी बोंड अळीने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 21:59 IST

शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे.

ठळक मुद्देसंजय राठोड, माणिकराव ठाकरेंची भेट : मांगलादेवी परिसरात संकटांची मालिका

लोकमत न्यूज नेटवर्कमांगलादेवी : शनिवार, २१ आॅक्टोबरच्या वादळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला. आता कपाशीवरील गुलाबी बोंड अळीमुळे हाताशी आलेले पीक पुरते हिरावले आहे. प्रशासनाने अद्यापही सर्वेक्षण सुरू न केल्याने न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न मांगलादेवी व परिसरातील शेतकरी डबडबलेल्या नजरेने करीत आहेत. या ज्वलंत प्रश्नी नेते मंडळी केवळ शेताला भेट देऊन शेतकºयांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे सोपस्कार पार पाडत आहे.झाडाची हिरवी बोंडेही कीडीने पोखरली आहे. शेतकºयांनी आपली कैफियत जिल्हाधिकाºयांकडे मांडली. यानंतर महसूल राज्यमंत्री संजय राठोड, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, देवानंद पवार यांनी शेतकºयांच्या शेतात जाऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला.रविवारी संजय राठोड यांनी कृषी संचालक, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक, जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, संबंधित बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधींसोबत मांगलादेवी येथील रामभाऊ दहापुते यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांना संपूर्ण शेतच बोंड अळीने फस्त केलेले दिसले. दहापुते यांना मागच्यावर्षी याच शेतात ५८ क्विंटल कापूस झाला होता. यंदा मात्र एक क्विंटलही कापूस होणार नाही, कर्ज काढून शेती केली, परंतु बोंड अळीने पुरता बर्बाद झालो, असे त्यांनी डोळ्यात आसवे आणत राज्यमंत्र्यांना सांगितले. अशीच परिस्थिती मांगलादेवी व परिसरातील शेतकºयांची आहे. यावेळी ना. राठोड यांनी तालुका कृषी अधिकाºयांकडे लेखी तक्रार दाखल करण्याचे आवाहन शेतकºयांना केले. बीटी कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.