शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:59 IST

यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआक्रमणाची भीती कपाशीचा पेरा दहा टक्क्याने घटण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गेल्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. या अळीने कपाशीचे संपूर्ण बोंडच पोखरले. अळीचे आक्रमण परतवून लावताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जहाल कीटकनाशकांची फवारणी केली. त्याची विषबाधा होऊन राज्यात ६२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला. त्यात सर्वाधिक संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविली गेली आहे. ही बोंडअळी यावर्षीसुद्धा कॉटन बेल्टमध्ये आक्रमण करण्याची भीती कृषी विभागाला आहे. त्यामुळेच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कृषी केंद्र चालकांकडून सतर्क केले जात आहे. तर कृषी खात्याची यंत्रणा बियाणे विक्रेत्यांना सतर्क करताना दिसते आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्रतील कापूस उत्पादक जिल्ह्यांपुरताच मर्यादित नव्हता तर लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरातमध्येही आक्रमण केले होते.

साडेपाच हजारांच्या भावाची अपेक्षादेशात सरसकट दहा टक्के पेरा कमी होण्याचा अंदाज असल्याने पुढच्या वर्षी कपाशीला साडेपाच हजारांपेक्षा अधिक भाव राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुजरातला सध्याही चांगल्या कापसाला ६१०० प्रति क्ंिवटल भाव दिला जात आहे. सरकी व ढेपेची मागणी अधिक असल्याचा हा परिणाम मानला जातो. तेथे रुईगाठीलासुद्धा ५०० रुपये अधिकचा भाव मिळतो.

रूईगाठींच्या साठ्यात सर्वाधिक घटएकीकडे कपाशीचा पेरा घटतो आहे तर दुसरीकडे रूईगाठींच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होते आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूईगाठींच्या साठ्यात घट झाल्याचे सांगितले जाते. सध्या केवळ १६ लाख रूईगाठी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. रूईगाठींना बाजारात सध्या ४७ हजारांचा भाव आहे. पुढच्या वर्षी तो ५४ हजार राहण्याची अपेक्षा आहे. महिनाभरातच हा भाव ५० हजारांवर व आॅक्टोबरनंतर ५४ हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गुलाबी बोंडअळी ओळखणे कठीणसामान्य शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी कठीण जाते. सतत शेतीच्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञ शेतकऱ्यालाच हे आक्रमण ओळखता येते. गावात अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी दोन ते तीन राहते. बोंडाच्या खालून शिरकाव होत असल्याने संपूर्ण बोंड पोखरल्यावरच अळीचे आक्रमण दृष्टीस पडते, हे विशेष.

टॅग्स :agricultureशेती