शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:59 IST

यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआक्रमणाची भीती कपाशीचा पेरा दहा टक्क्याने घटण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गेल्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. या अळीने कपाशीचे संपूर्ण बोंडच पोखरले. अळीचे आक्रमण परतवून लावताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जहाल कीटकनाशकांची फवारणी केली. त्याची विषबाधा होऊन राज्यात ६२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला. त्यात सर्वाधिक संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविली गेली आहे. ही बोंडअळी यावर्षीसुद्धा कॉटन बेल्टमध्ये आक्रमण करण्याची भीती कृषी विभागाला आहे. त्यामुळेच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कृषी केंद्र चालकांकडून सतर्क केले जात आहे. तर कृषी खात्याची यंत्रणा बियाणे विक्रेत्यांना सतर्क करताना दिसते आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्रतील कापूस उत्पादक जिल्ह्यांपुरताच मर्यादित नव्हता तर लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरातमध्येही आक्रमण केले होते.

साडेपाच हजारांच्या भावाची अपेक्षादेशात सरसकट दहा टक्के पेरा कमी होण्याचा अंदाज असल्याने पुढच्या वर्षी कपाशीला साडेपाच हजारांपेक्षा अधिक भाव राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुजरातला सध्याही चांगल्या कापसाला ६१०० प्रति क्ंिवटल भाव दिला जात आहे. सरकी व ढेपेची मागणी अधिक असल्याचा हा परिणाम मानला जातो. तेथे रुईगाठीलासुद्धा ५०० रुपये अधिकचा भाव मिळतो.

रूईगाठींच्या साठ्यात सर्वाधिक घटएकीकडे कपाशीचा पेरा घटतो आहे तर दुसरीकडे रूईगाठींच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होते आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूईगाठींच्या साठ्यात घट झाल्याचे सांगितले जाते. सध्या केवळ १६ लाख रूईगाठी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. रूईगाठींना बाजारात सध्या ४७ हजारांचा भाव आहे. पुढच्या वर्षी तो ५४ हजार राहण्याची अपेक्षा आहे. महिनाभरातच हा भाव ५० हजारांवर व आॅक्टोबरनंतर ५४ हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गुलाबी बोंडअळी ओळखणे कठीणसामान्य शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी कठीण जाते. सतत शेतीच्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञ शेतकऱ्यालाच हे आक्रमण ओळखता येते. गावात अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी दोन ते तीन राहते. बोंडाच्या खालून शिरकाव होत असल्याने संपूर्ण बोंड पोखरल्यावरच अळीचे आक्रमण दृष्टीस पडते, हे विशेष.

टॅग्स :agricultureशेती