शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
5
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
6
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
7
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
8
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
9
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
10
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
11
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
12
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
13
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
14
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
15
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
16
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
17
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
18
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
19
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
20
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर गुलाबी बोंडअळीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:59 IST

यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

ठळक मुद्देआक्रमणाची भीती कपाशीचा पेरा दहा टक्क्याने घटण्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी या खरीप हंगामातसुद्धा गुलाबी बोंडअळीच्या सावटात वावरताना दिसत आहे. त्यामुळे कपाशीचा पेरा सरसकट दहा टक्क्याने घटण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.गेल्या खरीप हंगामात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे आक्रमण झाले होते. या अळीने कपाशीचे संपूर्ण बोंडच पोखरले. अळीचे आक्रमण परतवून लावताना शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जहाल कीटकनाशकांची फवारणी केली. त्याची विषबाधा होऊन राज्यात ६२ शेतकरी-शेतमजुरांचा बळी गेला. त्यात सर्वाधिक संख्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात नोंदविली गेली आहे. ही बोंडअळी यावर्षीसुद्धा कॉटन बेल्टमध्ये आक्रमण करण्याची भीती कृषी विभागाला आहे. त्यामुळेच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्याला कृषी केंद्र चालकांकडून सतर्क केले जात आहे. तर कृषी खात्याची यंत्रणा बियाणे विक्रेत्यांना सतर्क करताना दिसते आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रकोप गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्रतील कापूस उत्पादक जिल्ह्यांपुरताच मर्यादित नव्हता तर लगतच्या तेलंगणा, मध्यप्रदेश व गुजरातमध्येही आक्रमण केले होते.

साडेपाच हजारांच्या भावाची अपेक्षादेशात सरसकट दहा टक्के पेरा कमी होण्याचा अंदाज असल्याने पुढच्या वर्षी कपाशीला साडेपाच हजारांपेक्षा अधिक भाव राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुजरातला सध्याही चांगल्या कापसाला ६१०० प्रति क्ंिवटल भाव दिला जात आहे. सरकी व ढेपेची मागणी अधिक असल्याचा हा परिणाम मानला जातो. तेथे रुईगाठीलासुद्धा ५०० रुपये अधिकचा भाव मिळतो.

रूईगाठींच्या साठ्यात सर्वाधिक घटएकीकडे कपाशीचा पेरा घटतो आहे तर दुसरीकडे रूईगाठींच्या साठ्यात मोठ्या प्रमाणात घट होते आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने रूईगाठींच्या साठ्यात घट झाल्याचे सांगितले जाते. सध्या केवळ १६ लाख रूईगाठी शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. रूईगाठींना बाजारात सध्या ४७ हजारांचा भाव आहे. पुढच्या वर्षी तो ५४ हजार राहण्याची अपेक्षा आहे. महिनाभरातच हा भाव ५० हजारांवर व आॅक्टोबरनंतर ५४ हजारापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.गुलाबी बोंडअळी ओळखणे कठीणसामान्य शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळी कठीण जाते. सतत शेतीच्या संपर्कात असलेल्या तज्ज्ञ शेतकऱ्यालाच हे आक्रमण ओळखता येते. गावात अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी दोन ते तीन राहते. बोंडाच्या खालून शिरकाव होत असल्याने संपूर्ण बोंड पोखरल्यावरच अळीचे आक्रमण दृष्टीस पडते, हे विशेष.

टॅग्स :agricultureशेती