शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कपाशीवर गुलाबी बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.

ठळक मुद्देसावधगिरीच्या सूचना : पीकेव्ही, कृषी विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे दर्शन कृषी विभागाला झाले आहे. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थानिक यंत्रणेने शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अळी येण्याचा धोका निर्माण झाला.२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.अकोला जिल्ह्यात गुलाबी बोंड अळी दृष्टीस पडली. ही अळी उपद्रवी स्वरूपात सध्या नसली तरी वेळेपूर्वी अशा अळ्या नष्ट करण्यासाठी शेतकºयांंना पावले उचलावी लागणार आहे. कपाशीच्या फुलामध्ये याच महिन्यात गुलाबी बोंडअळी आपली जागा शोधते. एका अळीपासून दीडशे ते दोनशे अंडी दिली जातात. यामुळे या अळीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो.आता ही अळी नुकतीच कुठे-कुठे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे उमलणारे फुल उमलण्यापूर्वीच कळी स्वरुपात कायम असेल तर ते फुल उघडून पहावे. यामुळे गुलाबी बोंडअळी दृष्टीस पडते. या अळीला तत्काळ नष्ट करावे. यामुळे त्याचा प्रसार थांबण्यास मोलाची मदत मिळणार आहे. शिवाय एकरी तीन कामबंद सापळे बसवावे, लिंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रमाण वाढल्यास जैविक कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.जिनिंगमधून किड पसरण्याचा धोकायावर्षी कापूस शेतकऱ्यांच्या घरात उशिरापर्यंत पडून होता. गुलाबी बोंडअळीचे कोष या कापसामध्येच पडून राहिले. आता ढगाळ वातावरण या अळीचा कोष पुन्हा सक्रिय होतो. यावर्षी जिनिंगमध्ये जुलै अखेरपर्यंत काम सुरू राहिले. यामुळे या ठिकाणावरून अळीचा उद्रेक वाढण्याचा धोका आहे. याकरिता शेतकऱ्यांना आपल्या शेतावर अशा स्वरूपाची अळी आहे का याची पाहणी करावी लागणार आहे.फवारणी मोहीमअळ्यांचा शिरकाव लक्षात घेता जिल्ह््यात पिकांवर कीटकनाशक फवारणी मोहीम शेतकरी हाती घेणार आहेत. तीन वर्षांपूर्वी या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागाकडून फवारणीच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अपेक्षित आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी