लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे दर्शन कृषी विभागाला झाले आहे. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थानिक यंत्रणेने शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अळी येण्याचा धोका निर्माण झाला.२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.अकोला जिल्ह्यात गुलाबी बोंड अळी दृष्टीस पडली. ही अळी उपद्रवी स्वरूपात सध्या नसली तरी वेळेपूर्वी अशा अळ्या नष्ट करण्यासाठी शेतकºयांंना पावले उचलावी लागणार आहे. कपाशीच्या फुलामध्ये याच महिन्यात गुलाबी बोंडअळी आपली जागा शोधते. एका अळीपासून दीडशे ते दोनशे अंडी दिली जातात. यामुळे या अळीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो.आता ही अळी नुकतीच कुठे-कुठे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे उमलणारे फुल उमलण्यापूर्वीच कळी स्वरुपात कायम असेल तर ते फुल उघडून पहावे. यामुळे गुलाबी बोंडअळी दृष्टीस पडते. या अळीला तत्काळ नष्ट करावे. यामुळे त्याचा प्रसार थांबण्यास मोलाची मदत मिळणार आहे. शिवाय एकरी तीन कामबंद सापळे बसवावे, लिंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रमाण वाढल्यास जैविक कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.जिनिंगमधून किड पसरण्याचा धोकायावर्षी कापूस शेतकऱ्यांच्या घरात उशिरापर्यंत पडून होता. गुलाबी बोंडअळीचे कोष या कापसामध्येच पडून राहिले. आता ढगाळ वातावरण या अळीचा कोष पुन्हा सक्रिय होतो. यावर्षी जिनिंगमध्ये जुलै अखेरपर्यंत काम सुरू राहिले. यामुळे या ठिकाणावरून अळीचा उद्रेक वाढण्याचा धोका आहे. याकरिता शेतकऱ्यांना आपल्या शेतावर अशा स्वरूपाची अळी आहे का याची पाहणी करावी लागणार आहे.फवारणी मोहीमअळ्यांचा शिरकाव लक्षात घेता जिल्ह््यात पिकांवर कीटकनाशक फवारणी मोहीम शेतकरी हाती घेणार आहेत. तीन वर्षांपूर्वी या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागाकडून फवारणीच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अपेक्षित आहे.
कपाशीवर गुलाबी बोंडअळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST
२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.
कपाशीवर गुलाबी बोंडअळी
ठळक मुद्देसावधगिरीच्या सूचना : पीकेव्ही, कृषी विभागापुढे आव्हान