शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर गुलाबी बोंडअळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:00 IST

२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.

ठळक मुद्देसावधगिरीच्या सूचना : पीकेव्ही, कृषी विभागापुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या काही भागात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचे दर्शन कृषी विभागाला झाले आहे. त्या अनुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाच्या स्थानिक यंत्रणेने शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विदर्भात अनेक ठिकाणी अळी येण्याचा धोका निर्माण झाला.२०१८ मध्ये राज्यभरात गुलाबी बोंडअळीने कहर केला होता. यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यासाठी मदतीची घोषणा केली होती. मात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही. आता यावर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक घडू नये म्हणून शेतकऱ्यांना विविध उपाययोजना कराव्या लागणार आहे.अकोला जिल्ह्यात गुलाबी बोंड अळी दृष्टीस पडली. ही अळी उपद्रवी स्वरूपात सध्या नसली तरी वेळेपूर्वी अशा अळ्या नष्ट करण्यासाठी शेतकºयांंना पावले उचलावी लागणार आहे. कपाशीच्या फुलामध्ये याच महिन्यात गुलाबी बोंडअळी आपली जागा शोधते. एका अळीपासून दीडशे ते दोनशे अंडी दिली जातात. यामुळे या अळीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होतो.आता ही अळी नुकतीच कुठे-कुठे दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीचे उमलणारे फुल उमलण्यापूर्वीच कळी स्वरुपात कायम असेल तर ते फुल उघडून पहावे. यामुळे गुलाबी बोंडअळी दृष्टीस पडते. या अळीला तत्काळ नष्ट करावे. यामुळे त्याचा प्रसार थांबण्यास मोलाची मदत मिळणार आहे. शिवाय एकरी तीन कामबंद सापळे बसवावे, लिंबोळी अर्काची फवारणी करावी, प्रमाण वाढल्यास जैविक कीटकनाशक फवारावे असे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे आवश्यक आहे.जिनिंगमधून किड पसरण्याचा धोकायावर्षी कापूस शेतकऱ्यांच्या घरात उशिरापर्यंत पडून होता. गुलाबी बोंडअळीचे कोष या कापसामध्येच पडून राहिले. आता ढगाळ वातावरण या अळीचा कोष पुन्हा सक्रिय होतो. यावर्षी जिनिंगमध्ये जुलै अखेरपर्यंत काम सुरू राहिले. यामुळे या ठिकाणावरून अळीचा उद्रेक वाढण्याचा धोका आहे. याकरिता शेतकऱ्यांना आपल्या शेतावर अशा स्वरूपाची अळी आहे का याची पाहणी करावी लागणार आहे.फवारणी मोहीमअळ्यांचा शिरकाव लक्षात घेता जिल्ह््यात पिकांवर कीटकनाशक फवारणी मोहीम शेतकरी हाती घेणार आहेत. तीन वर्षांपूर्वी या फवारणीतून विषबाधा होऊन अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कृषी विभागाकडून फवारणीच्या वेळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती अपेक्षित आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी