शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादक जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला, खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 18:19 IST

कृषी विभाग ५० टक्के अनुदानावर देणार औषधी

यवतमाळ :कापूस उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होत असल्याने, कृषी विभागाने मान्सूनपूर्व लागवड न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतरही अशी लागवड झाली. परिणामी, या क्षेत्रात गुलाबी बोंडअळीने हल्ला केला.

२०१७-१८ मध्ये गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याने राज्यभरात धुमाकूळ झाला होता. यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने १ जूनपूर्वी कापसाची बियाणे विक्री न करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, यानंतरही अनेक ठिकाणी मान्सून आणि मान्सूनपूर्व कापसाची लागवड झाली.

या ठिकाणी गुलाबी बोंडअळीची कोषावस्था ब्रेक होण्यासाठी वेळ मिळाला नाही. यामुळे गुलाबी बोंडअळीने फुलांच्या आणि बोंडाच्या अवस्थेत अशा ठिकाणी पुन्हा हल्ला केला. यामुळे कपाशीच्या शेतामध्ये डोमकळ्या दिसत आहेत. याच्या आतमध्ये गुलाबी बोंडअळीचे अवशेष आहे. अशा डोमकळ्या नष्ट करण्याच्या सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहे. मात्र, यानंतरही अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे. गुलाबी बोंडअळीला संपुष्टात आणण्यासाठी कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फवारणीच्या औषधी दिल्या जात आहेत. या अनुषंगाने जाणीव जागृतीसाठी कृषी विभागाने तातडीची बैठकही आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच इतर ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि प्रकोप संपुष्टात आणावा, याबाबत गावपातळीवर सूचना दिल्या जात आहेत.

फेरोमोन ट्रॅप

गुलाबी बोंडअळीचे पतंग जेरबंद करण्यासाठी फेरोमोन ट्रॅप अर्थात, कामगंध सापळे लावण्यासाठी कृषी विभागासह कृषी विज्ञान केंद्राने शिफारस केली आहे. एकरी आठ कामगंध सापळे लावावे.

१ जूनपूर्वी अथवा १ जूननंतर केलेली कापसाची लागवड गुलाबी बोंडअळीच्या संकटात सापडलेली आहे. मध्यंतरी बरसलेला पाऊस आणि नंतरची स्थिती गुलाबी बोंडअळीसाठी पोषक होती.

कीटकनाशकाची फवारणी करताना, अंगरक्षक साधनांचा वापर करून सुरक्षित फवारणी करावी आणि पाण्याचा सामू सहा ते सात दरम्यान असावा, असे आवाहन विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रमोद मगर यांनी केले आहे. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या नष्ट करण्याबाबत उपाययोजना आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधींचे नियंत्रण अधिकाऱ्यांना पत्र

n कीटकनाशकाच्या वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. पाण्यातील पीएच कीटकनाशकाचा प्रभाव कमी करतात. यामुळे किती पीएच आवश्यक आहे, याबाबत कीटकनाशक कंपन्यांनी औषधांवर उल्लेख करणे आवश्यक आहे, ही संपूर्ण माहिती मोठ्या अक्षरात असावी, याबाबतचे पत्र खासदार नवनीत राणा आणि आमदार मदन येरावारा यांनी गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसYavatmalयवतमाळ