शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

कापूस उत्पादक जिल्ह्यात गुलाबी बोंडअळीचा हल्ला, खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 18:19 IST

कृषी विभाग ५० टक्के अनुदानावर देणार औषधी

यवतमाळ :कापूस उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होत असल्याने, कृषी विभागाने मान्सूनपूर्व लागवड न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानंतरही अशी लागवड झाली. परिणामी, या क्षेत्रात गुलाबी बोंडअळीने हल्ला केला.

२०१७-१८ मध्ये गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्याने राज्यभरात धुमाकूळ झाला होता. यामुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. यावर मात करण्यासाठी राज्य शासनाने १ जूनपूर्वी कापसाची बियाणे विक्री न करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, यानंतरही अनेक ठिकाणी मान्सून आणि मान्सूनपूर्व कापसाची लागवड झाली.

या ठिकाणी गुलाबी बोंडअळीची कोषावस्था ब्रेक होण्यासाठी वेळ मिळाला नाही. यामुळे गुलाबी बोंडअळीने फुलांच्या आणि बोंडाच्या अवस्थेत अशा ठिकाणी पुन्हा हल्ला केला. यामुळे कपाशीच्या शेतामध्ये डोमकळ्या दिसत आहेत. याच्या आतमध्ये गुलाबी बोंडअळीचे अवशेष आहे. अशा डोमकळ्या नष्ट करण्याच्या सूचना कृषी विभागामार्फत दिल्या जात आहे. मात्र, यानंतरही अनेकांचे दुर्लक्ष झाले आहे. गुलाबी बोंडअळीला संपुष्टात आणण्यासाठी कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर फवारणीच्या औषधी दिल्या जात आहेत. या अनुषंगाने जाणीव जागृतीसाठी कृषी विभागाने तातडीची बैठकही आयोजित केली आहे. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच इतर ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि प्रकोप संपुष्टात आणावा, याबाबत गावपातळीवर सूचना दिल्या जात आहेत.

फेरोमोन ट्रॅप

गुलाबी बोंडअळीचे पतंग जेरबंद करण्यासाठी फेरोमोन ट्रॅप अर्थात, कामगंध सापळे लावण्यासाठी कृषी विभागासह कृषी विज्ञान केंद्राने शिफारस केली आहे. एकरी आठ कामगंध सापळे लावावे.

१ जूनपूर्वी अथवा १ जूननंतर केलेली कापसाची लागवड गुलाबी बोंडअळीच्या संकटात सापडलेली आहे. मध्यंतरी बरसलेला पाऊस आणि नंतरची स्थिती गुलाबी बोंडअळीसाठी पोषक होती.

कीटकनाशकाची फवारणी करताना, अंगरक्षक साधनांचा वापर करून सुरक्षित फवारणी करावी आणि पाण्याचा सामू सहा ते सात दरम्यान असावा, असे आवाहन विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ डाॅ.प्रमोद मगर यांनी केले आहे. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या नष्ट करण्याबाबत उपाययोजना आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधींचे नियंत्रण अधिकाऱ्यांना पत्र

n कीटकनाशकाच्या वापरासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. पाण्यातील पीएच कीटकनाशकाचा प्रभाव कमी करतात. यामुळे किती पीएच आवश्यक आहे, याबाबत कीटकनाशक कंपन्यांनी औषधांवर उल्लेख करणे आवश्यक आहे, ही संपूर्ण माहिती मोठ्या अक्षरात असावी, याबाबतचे पत्र खासदार नवनीत राणा आणि आमदार मदन येरावारा यांनी गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसYavatmalयवतमाळ