शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
3
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
4
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
7
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
8
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
9
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
10
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
11
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
12
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
13
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
14
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
15
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
16
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
17
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
18
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
19
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
20
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 21:40 IST

बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड लागली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि काही निवडक स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला कमाईचे साधन बनविले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिलहाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर काय कारवाई होते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देविशिष्ट संस्थांना लाभ : खोट्या दस्तावेजाद्वारे अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बळीराजा चेतना अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याला गैरप्रकाराची कीड लागली आहे. जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आणि काही निवडक स्वयंसेवी संस्थांनी या योजनेला कमाईचे साधन बनविले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिलहाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. यावर काय कारवाई होते याकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे.शेतकरी कुटुंबातील मुलींच्या विवाहास आर्थिक लाभ (अनुदान) देण्यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळावे घेतले जात आहे. शिवाय आयोजक संस्थांना काही निधी दिला जातो. मात्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांच्या संगनमताने काही संस्थांनी लाखो रुपये अनुदान लाटले आहे. जन्म प्रमाणपत्र, टीसी, सातबारा, रहिवासी दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, प्रथम विवाह असल्याबाबतचा पोलीस पाटील यांचा दाखला आदी दस्तावेज बोगस तयार करण्यात आले. ग्रामसेवकांचे कार्यालयीन शिक्के, नोंदणी क्रमांक, एवढेच नाही तर पृष्ठ क्रमांकही चुकीचा टाकण्यात आला. या आधारे सन २०१६ मध्ये एका संस्थेने अनुदान लाटले. ग्रामपंचायतीचे विवाह नोंदणी रजिस्टर तपासल्यास हा प्रकार पुढे येऊ शकतो, असे या तक्रारीत सूचित करण्यात आले आहे.दारव्हा आणि नेर तालुक्यात असलेल्या या संस्थांनी प्रामुख्याने हा घोळ घातला आहे. सन २०१६ पासून झालेल्या विवाह मेळाव्याची चौकशी करावी, अशी मागणी आहे. स्वयंसेवी संस्थेने किमान दहा पात्र जोडप्यांचा विवाह मेळावा आयोजित करणे अनिवार्य आहे. मात्र एका संस्थेने यापेक्षा कमी जोडप्यांचे विवाह मेळाव्यात लाऊन अनुदान लाटले. सर्व संस्थांसाठी सारखे नियम असावेत, असे केळझरा (ता.आर्णी) येथील चंदू राठोड यांनी तक्रारीत म्हटले आहे.अपात्र जोडप्यांना पात्र४सन २०१८ मध्ये झालेल्या विवाह मेळाव्यातील अपात्र जोडप्यांना पात्र करण्यात आले आहे. दरवर्षी हा प्रकार वाढत चालला आहे. कागदपत्रांची थातुरमातूर तपासणी करून अनुदान मंजूर केले जाते. सर्व नियम गुंडाळून ठेवले जातात. विशिष्ट संस्थांसाठी हा प्रकार केला जातो. तक्रारीमध्ये अशा संस्थांची नावेही नमूद केली जातात तरीही चौकशी होत नसल्याने साधार शंका व्यक्त केली जात आहे.बोगस असलेले प्रस्ताव नाकारले जातात. सखोल चौकशीनंतरच अनुदान दिले जाते. बोगस आढळलेल्या प्रकरणात संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी कारवाई केली जाईल. अनुदानासंदर्भात दाखल झालेली तक्रार तथ्यहीन आहे.- अर्चना इंगोले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Yavatmalयवतमाळmarriageलग्न