शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिद्द, इच्छाशक्तीच्या बळावर कर्करोगावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

फोटो विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. ...

फोटो

विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण येथील १५ वर्षीय पराग वैशाली श्रीनिवास लिगदे होय.

मूळचा विडूळ येथील; परंतु आता औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेला पराग याला वयाच्या सहाव्या वर्षीच ब्रेन ट्युमर (कॅन्सर) असल्याचे निदान झाले. ही माहिती कळताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. परागचे खेळण्याबागडण्याचे वय असताना त्याला गंभीर आजाराने विळखा घातला; परंतु पालकांनी परिस्थिती बेताची असताना परागला गंभीर आजारातून बाहेर काढायचा निर्धार केला. त्याच्यावर मुंबईत जानेवारी २०११ पासून उपचार सुरू केले.

सध्या मागील दहा वर्षांपासून पराग आजारावर मात करीत आहे. आजपर्यंत त्याच्यावर ७० केमोथेरपी झाल्या. दर आठवड्यातून एकदा त्याला ही थेरपी घ्यावी लागत असे. त्याला केमोथेरपी घेतल्यानंतर त्रास होत होता. आजपर्यंत त्याने हार्मोन्सचे २२ इंजेक्शन, ब्रेन आणि स्पाइनचे १७, एमआरआय, हातापायाचे अनेक एक्स-रे, सतत दोन वर्षे पूर्णतः बेडवर झोपूनच ही ट्रीटमेंट घेतली. त्याला साधे उठता-बसता येत नव्हते. मात्र, आई-बाबांनी त्याला ‘जीवनात कधीही हार मानायची नाही, अशी प्रेरणा दिली. त्याचा आत्मविश्वास जागृत ठेवला. २४ मे २०१६ मध्ये पुन्हा एकदा ब्रेनचे ऑपरेशन झाल्यानंतर पराग व कुटुंबाला फरक पडत असल्याची जाणीव झाली. नंतर पराग हळूहळू चालायला लागला. त्याच्या आई-वडिलांनी प्रचंड परिश्रम घेतले. अखेर परागने आई-वडिलांची मेहनत आणि प्रचंड जिद्द व इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरवर मात केली.

बॉक्स

‘लोकमत’च्या महामॅरेथाॅनने बदलले जीवन

कॅन्सरमधून बरे होताच पराग विविध मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी होऊ लागला. आजवर त्याने चक्क ४५ पेक्षाही जास्त मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. मुंबईत टाटा मॅरेथॉनपासून त्याने सुरुवात केली. त्याचा आत्मविश्वास दृढावला. नंतर पुण्यात ‘लोकमत’च्या महामॅरेथॉन स्पर्धेने त्याचे जीवनच बदलून टाकले. या मॅरेथॉनमध्ये धावल्याने मला आत्मबल प्राप्त होऊन मी दुर्दम्य आजारावर मात करू शकलो, असे पराग अभिमानाने सांगतो. कॅन्सर असो की कोरोना, कोणत्याही दुर्धर आजाराची भीती न बाळगता आत्मविश्वास जागृत ठेवायचा आणि सोबतच आपली इच्छाशक्ती मजबूत ठेवायची, असे त्याने सांगितले. परागचे आई, वडील सध्या औरंगाबाद येथे राहतात. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. पराग इतरांसारखेच आयुष्य जगू शकतो, हे पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात.