शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जिद्द, इच्छाशक्तीच्या बळावर कर्करोगावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

फोटो विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. ...

फोटो

विडूळ : जिद्द आणि इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. अगदी मृत्यूलादेखील हरवू शकतो. याचे मूर्तिमंत उदाहरण येथील १५ वर्षीय पराग वैशाली श्रीनिवास लिगदे होय.

मूळचा विडूळ येथील; परंतु आता औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेला पराग याला वयाच्या सहाव्या वर्षीच ब्रेन ट्युमर (कॅन्सर) असल्याचे निदान झाले. ही माहिती कळताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. परागचे खेळण्याबागडण्याचे वय असताना त्याला गंभीर आजाराने विळखा घातला; परंतु पालकांनी परिस्थिती बेताची असताना परागला गंभीर आजारातून बाहेर काढायचा निर्धार केला. त्याच्यावर मुंबईत जानेवारी २०११ पासून उपचार सुरू केले.

सध्या मागील दहा वर्षांपासून पराग आजारावर मात करीत आहे. आजपर्यंत त्याच्यावर ७० केमोथेरपी झाल्या. दर आठवड्यातून एकदा त्याला ही थेरपी घ्यावी लागत असे. त्याला केमोथेरपी घेतल्यानंतर त्रास होत होता. आजपर्यंत त्याने हार्मोन्सचे २२ इंजेक्शन, ब्रेन आणि स्पाइनचे १७, एमआरआय, हातापायाचे अनेक एक्स-रे, सतत दोन वर्षे पूर्णतः बेडवर झोपूनच ही ट्रीटमेंट घेतली. त्याला साधे उठता-बसता येत नव्हते. मात्र, आई-बाबांनी त्याला ‘जीवनात कधीही हार मानायची नाही, अशी प्रेरणा दिली. त्याचा आत्मविश्वास जागृत ठेवला. २४ मे २०१६ मध्ये पुन्हा एकदा ब्रेनचे ऑपरेशन झाल्यानंतर पराग व कुटुंबाला फरक पडत असल्याची जाणीव झाली. नंतर पराग हळूहळू चालायला लागला. त्याच्या आई-वडिलांनी प्रचंड परिश्रम घेतले. अखेर परागने आई-वडिलांची मेहनत आणि प्रचंड जिद्द व इच्छाशक्तीच्या बळावर कॅन्सरवर मात केली.

बॉक्स

‘लोकमत’च्या महामॅरेथाॅनने बदलले जीवन

कॅन्सरमधून बरे होताच पराग विविध मॅरेथाॅन स्पर्धेत सहभागी होऊ लागला. आजवर त्याने चक्क ४५ पेक्षाही जास्त मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला. मुंबईत टाटा मॅरेथॉनपासून त्याने सुरुवात केली. त्याचा आत्मविश्वास दृढावला. नंतर पुण्यात ‘लोकमत’च्या महामॅरेथॉन स्पर्धेने त्याचे जीवनच बदलून टाकले. या मॅरेथॉनमध्ये धावल्याने मला आत्मबल प्राप्त होऊन मी दुर्दम्य आजारावर मात करू शकलो, असे पराग अभिमानाने सांगतो. कॅन्सर असो की कोरोना, कोणत्याही दुर्धर आजाराची भीती न बाळगता आत्मविश्वास जागृत ठेवायचा आणि सोबतच आपली इच्छाशक्ती मजबूत ठेवायची, असे त्याने सांगितले. परागचे आई, वडील सध्या औरंगाबाद येथे राहतात. एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करतात. पराग इतरांसारखेच आयुष्य जगू शकतो, हे पाहून त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळतात.