शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मांडवा येथील अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे द्या

By admin | Updated: March 5, 2017 00:39 IST

गत ५० वर्षांपासून मांडवा येथे ४० कुटूंब सरकारी जागेवर वास्तव्य करीत आहे. ते रहिवासी जागेचा रितसर करही मांडवा

ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन : ४० कुटुंब भूखंडच्या प्रतीक्षेत वर्धा : गत ५० वर्षांपासून मांडवा येथे ४० कुटूंब सरकारी जागेवर वास्तव्य करीत आहे. ते रहिवासी जागेचा रितसर करही मांडवा ग्रा.पं.ला अदा करीत आहेत. यामुळे त्या कुटुंबांना शासनाने कायमस्वरूपी घरपट्टे द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत युवा परिवर्तन की आवाज संघटनेद्वारे मांडवा ग्रा.पं. प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मांडवा येथील रहिवासी आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाही. यामुळे ते भूखंड खरेदी करू शकत नाहीत. यापूर्वी मांडवा ग्रा.पं. द्वारे पट्टे देण्याबाबत चार वेळा ठराव मंजूर करण्यात आले. शिवाय तहसील कार्यालयाशी पत्रव्यवहार करीत निवेदन देण्यात आले. लोकप्रतिनिधींनाही पट्टे मिळवून देण्याची विनंती करण्यात आली; पण लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले. मांडवा येथील नागरिकांनी युवा संघटनेमार्फत पुन्हा निवेदन देत प्रशासनाला स्मरण करून दिले आहे. मांडवा येथील ४० कुटुंबियांना कायम पट्टे द्यावे, अन्यथा संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आला. यावेळी सुरेश व नरेश तामगाडगे, हरिभाऊ मडके, मारोती डोंगरे, इश्वर बेले, रमेश मेंढे, संघटनेचे पलाश उमाटे, गौरव वानखेडे, शेख अरहान आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)