शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी

By admin | Updated: November 4, 2014 22:47 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या

अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असून पैनगंगेच्या भरोशावर सिंचन करणारे शेतकरीही अडचणीत आले आहे.यावर्षी उमरखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. सध्या नदीचे पात्र कोरडे असून नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पैनगंगेसोबतच परिसरातील सर्व नदी, नालेही कोरडे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी उन्हाळ्यात जाणवते. मात्र हिवाळ्यात यंदा पहिल्यांदाच जाणवू लागली आहे. त्यामुळे नदी तीरावरील तिवरंग, झाडगाव, भांबरखेडा, जगापूर, गौळ, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, टाकळी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, सोईट, गाजेगाव, ढाणकी, बिटरगाव, भोजनगर तांडा, सावळेश्वर, आकोली, मुरली, थेरडी, परोटी वन, गाडी, जवराळा, खरबी, दराटी, मोरचंडी या भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे.या परिसरातील महिला व पुरुषांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. पैनगंगेच्या तीरावरून अनेक गावांच्या नळयोजना आहे. परंतु पैनगंगा आटल्याने या विहिरीतील पाणीही तळाला लागले आहे. त्यामुळे अनेक नळयोजना अखेरचा श्वास घेत आहे. त्यातच भारनियमनानेही पाणी गावापर्यंत पोहोचविणे अशक्य होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. परंतु पाणीटंचाईने जनावरांसाठी पाणी उपलब्ध कसे करावे, असा प्रश्न आहे. अनेक शेतकरी पैनगंगेवर मोटरपंप लावून रबीचे सिंचन करतात. मात्र यावर्षी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडल्याने सिंचन करणेही शक्य होणार नाही.