शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

हिवाळ्यातच पैनगंगा कोरडी

By admin | Updated: November 4, 2014 22:47 IST

तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या

अविनाश खंदारे - उमरखेड (कुपटी)तालुक्याची जीवनदायिनी असलेली पैनगंगा यंदा पहिल्यांदाच हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. त्यामुळे तीरावरील ५० गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. गुराढोऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असून पैनगंगेच्या भरोशावर सिंचन करणारे शेतकरीही अडचणीत आले आहे.यावर्षी उमरखेड तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे बाराही महिने खळखळून वाहणारी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडली आहे. सध्या नदीचे पात्र कोरडे असून नागरिक पाण्यासाठी भटकंती करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. पैनगंगेसोबतच परिसरातील सर्व नदी, नालेही कोरडे झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई दरवर्षी उन्हाळ्यात जाणवते. मात्र हिवाळ्यात यंदा पहिल्यांदाच जाणवू लागली आहे. त्यामुळे नदी तीरावरील तिवरंग, झाडगाव, भांबरखेडा, जगापूर, गौळ, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बेलखेड, बारा, चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, विडूळ, चालगणी, टाकळी, साखरा, खरूस, दिघडी, लोहरा, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, सिंदगी, सोईट, गाजेगाव, ढाणकी, बिटरगाव, भोजनगर तांडा, सावळेश्वर, आकोली, मुरली, थेरडी, परोटी वन, गाडी, जवराळा, खरबी, दराटी, मोरचंडी या भागात आतापासूनच पाणीटंचाई जाणवत आहे.या परिसरातील महिला व पुरुषांना पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तालुका प्रशासनाने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. पैनगंगेच्या तीरावरून अनेक गावांच्या नळयोजना आहे. परंतु पैनगंगा आटल्याने या विहिरीतील पाणीही तळाला लागले आहे. त्यामुळे अनेक नळयोजना अखेरचा श्वास घेत आहे. त्यातच भारनियमनानेही पाणी गावापर्यंत पोहोचविणे अशक्य होत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही तीव्र होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गोपालन केले जाते. परंतु पाणीटंचाईने जनावरांसाठी पाणी उपलब्ध कसे करावे, असा प्रश्न आहे. अनेक शेतकरी पैनगंगेवर मोटरपंप लावून रबीचे सिंचन करतात. मात्र यावर्षी पैनगंगा हिवाळ्यातच कोरडी पडल्याने सिंचन करणेही शक्य होणार नाही.