शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बालरुग्ण वार्ड हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत.

ठळक मुद्देवैद्यकीय महाविद्यालय : क्षमता ४४ बेडची, प्रत्यक्ष दाखल झालेत शंभरावर बालरुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरुग्ण विभागात अद्ययावत अतिदक्षता उपचार कक्ष तयार केला जात आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात वार्ड तयार करण्यात आला. त्या ठिकाणी उपलब्ध क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा अधिक रुग्ण आहेत. एका बेडवर तीन-तीन बालक उपचार घेत आहे. अनेक समस्या या वार्डमध्ये निर्माण झाल्या आहेत.तात्पुरत्या स्वरूपात मेडिकलच्या जुन्या इमारतीत बालरुग्ण विभागाचा वार्ड तयार झाला आहे. या ठिकाणी दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नाही. केवळ ४४ बेड उपलब्ध आहेत. स्वीपर, अटेडन्स, स्टाफ नर्स यांचीही संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांची सुश्रुषा करताना अनेक समस्या येत आहेत. शिवाय लिफ्ट लावलेली असूनही कार्यान्वित करण्यात आली नाही. त्यामुळे वार्डात लागणारी औषधी व इतर साहित्य पायऱ्यांवरूनच आणावे लागत आहे. अनेकदा तर रुग्णांच्या नातेवाईकांच्या डोक्यावरच औषधांचे खोके द्यावे लागते. शिवाय आजारी मुलांना घेऊन कुठल्याही तपासणीसाठी अपघात कक्षाजवळच्या एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासणीसाठी चकरा माराव्या लागतात. अनेकदा मुलांच्या माता-पित्यांना लहान मुलांना घेऊन ताटकळत बसून रहावे लागते. रविवारी रात्री ८ वाजता योगीता राठोड रा. चाणी ता. दारव्हा या मुलीला घेऊन तिचे वडील एक्स-रेसाठी बसून होते. तब्बल चार तास वाट पाहिल्यानंतरही तंत्रज्ञ त्या विभागात फिरकलाच नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.संसर्गाचा धोका वाढलाउपचारासाठी आलेल्या मुलांची प्रकृती सुधारण्याऐवजी वार्डात दाखल झाल्यानंतर आणखी गंभीर होत आहे. मुलांना वार्डात आल्यानंतर गर्दीमुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. शिवाय टीबी सारखा संसर्गजन्य वार्ड बालरुग्ण विभागाच्या वार्डाला लागून आहे. यामुळे संसर्गाचा धोका आणखीच निर्माण झाला आहे. अनेक बालक उपचार घेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा-पुन्हा आजारी पडत आहे.ट्रान्सफार्मर जळाल्याने वीज गूलमेडिकल परिसरातील ट्रान्सफार्मर जळाल्याने सोमवारी दुपारपर्यंत वीज पुरवठा खंडित झाला होता. व्हेन्टीलेटरवर असलेल्या रुग्णांना चक्क अम्बू बॅगच्या सहाय्याने कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचा प्रयत्न करावा लागला. सकाळी ७ वाजता बंद झालेला वीज पुरवठा दुपारी १२ नंतरच सुरळीत झाला. यामुळे अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जीवरक्षक प्रणाली कार्यान्वित ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे.मेडिकलचे सर्वच वार्ड हाऊसफुल्ल झाले आहे. क्षमतेपेक्षा किती तरी अधिक रुग्ण येत आहे. बाह्यरुग्ण तपासणी २६२७ रुग्ण आले. या पैकी २५० रुग्ण भरती होतात. फवारणी विषबाधा रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. एका दिवशी १७ रुग्ण दाखल झाले. मर्यादित साधने व मनुष्यबळावर आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. मनीष श्रीगिरीवारअधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.जुन्या इमारतीत लिफ्ट लावली आहे. मात्र आर्किटेक विभाग मुंबई यांच्याकडून प्रमाणपत्र आले नसल्याने लिफ्टचा वापर करता येत नाही. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- रिता बोकडेअभियंता, विद्युत विभाग.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल