शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

दिग्रस तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:57 IST

तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरी मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.

ठळक मुद्देदुष्काळी सवलती द्या : शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी परिवर्तन विकास आघाडीतर्फे शेतकरीमोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी दुष्काळी सवलती व मदत देण्याची मागणी केली.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सर्व मोर्चेकरी एकत्रित आले. त्यानंतर माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरूवात झाली. शिवाजी चौक, शंकर टॉकिज चौक, दुगार्माता चौक, घंटीबाबा चौकमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार किशोर बागडे यांच्यामार्फत मोर्चेकºयांनी शासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी चौकातचौकात फटाके फोडून मोर्चाचे स्वागत करण्यात आले.तहसील कार्यालय परिसरात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सभेला मानोरा येथील माजी आमदार अनंतकुमार पाटील, संजय देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मोर्चेकऱ्यांनी निवेदनातून महाराष्ट्र शासनाने राज्यातील १८१ तालुक्यात दुष्काळ घोषित केला असून मदत व सवलतीत तफावत दिसत असल्याचा आरोप केला.या तफावतीमुळे तालुक्यातील शेतकरी बांधव विविध मदतीपासून वंचित राहण्याची स्थिती आहे. पीक पैसेवारी ४८ टक्के असूनही शासनामार्फत दिल्या जाणारे बहुवार्षिक पिकासाठी हेक्टरी १८ हजार व सहा हजार ८०० रुपयांच्या मदतीपासून शेतकरी बांधव वंचित राहणार आहे. हा अन्याय दूर करण्याची मागणी केली.तसेच तालुक्यातील शेतकरी पाल्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवसायिक आदी शैक्षणिक शुल्कात शुल्क माफी द्यावी, अशी मागणी केली. मोर्चात पंचायत समिती सदस्य अरविंद गादेवार, जावेद पटेल, जावेद पहेलवान, सै.अक्रम, रवींद्र अरगडे, दीपक वानखडे, साहेबराव पाटील, डॉ.प्रदीप मेहता, रामकृष्ण इंगोले, रमेश गाडे, दीपक कोठारी, सुदाम राठोडसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या मोर्चाने दिग्रसकर नागरिकांचे लक्ष वेधले होते.

टॅग्स :Morchaमोर्चाFarmerशेतकरी