शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीचीही मोहोर

By admin | Updated: October 3, 2015 02:13 IST

यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे.

२ हजार ५३ गावे : जिल्ह्याची नजरपैसेवारी ६३ पैसे यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे. २ हजार ५३ गावातील पीक पैसेवारीचा हा अहवाल ३० सप्टेंबर रोजी महसूल विभागाने जारी केला आहे. जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी ५० पैशाच्यावर ६३ पैसे एवढी निघाली. सर्वाधिक ७० पैसे मारेगाव तर सर्वात कमी ५७ पैसे उमरखेड तालुक्याची नजर पीक पैसेवारी नोंदविली गेली. जिल्ह्यात एकूण दोन हजार १५८ गावे आहेत. त्यातील दोन हजार ५३ गावातील क्षेत्र लागवडी योग्य आहे. जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी (६३ पैसे) पाहता पीक परिस्थिती उत्तम व समाधानकारक असल्याचे दिसून येते. यंदाचा खरीप हंगाम खरोखरच चांगला असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांकडून सांगितले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, पीकेव्हीचे संशोधक, तज्ज्ञ शेतकरी आदी सर्वच जण पीक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगत आहे. खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही या समाधानकारक पीक परिस्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातच नजर पीक पैसेवारी ६३ पैसे निघाल्याने पिकाच्या चांगल्या असलेल्या परिस्थितीवर आणखी मोहर उमटली आहे. त्यातही कपाशीचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून येते. त्याची सरासरी ६३ पैसे एवढी निघाली आहे. सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग याचीही स्थिती चांगली असल्याचे महसूल विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यंदाची खरीप पीक पैसेवारीसुद्धा ब्रिटीशकालीन पद्धतीनुसारच काढली गेली. मुळात या पद्धतीला शेतकरी व त्यांच्यासाठी लढणाऱ्या शेतकरी नेत्यांचा विरोध होता. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे ब्रिटीशकालीन समीकरण आहे. मात्र हे समीकरण बदलविण्याचा विचार शासन स्तरावर सुरू होता. त्यासाठी ५० पैशाऐवजी ६७ पैसे हा पीक परिस्थितीच्या चांगल्या-वाईट अवस्थेचा निकष ठरविला गेला. मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी पीक पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी आली. ते पाहता संपूर्ण राज्यातच टंचाई सदृश स्थिती जाहीर करावी लागेल व त्या अनुषंगाने शेतकरी-नागरिकांना सारामाफी, करमाफी, व्याज माफी द्यावी लागेल याची जाणीव सरकारला झाली. म्हणूनच सरकारने यावर्षी पुन्हा पैसेवारीसाठी ब्रिटीशकालीन ५० टक्क्याच्या निकषाचीच पद्धत अवलंबिण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसातच ६७ पैशाचा आदेश रद्द करून पुन्हा ५० पैसे कायम ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) वणी तालुक्यातील दोन गावांची पैसेवारी कमीसंपूर्ण जिल्ह्यात पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे पैसेवारीच्या नोंदींवरून दिसून येत असले तरी वणी तालुक्यातील दोन गावांची पैेसेवारी मात्र ५० पैशापेक्षा कमी निघाली आहे. त्यामध्ये जुगाद व कोलगावचा समावेश आहे. अर्थात तेथील पीक परिस्थिती चांगली नसल्याचे महसुली नोंदींवरुन दिसून येते.