शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम पीक परिस्थितीवर पैसेवारीचीही मोहोर

By admin | Updated: October 3, 2015 02:13 IST

यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे.

२ हजार ५३ गावे : जिल्ह्याची नजरपैसेवारी ६३ पैसे यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील खरिपाची नजरअंदाज पीक पैसेवारी सरासरी ६३ पैसे एवढी नोंदविण्यात आली आहे. २ हजार ५३ गावातील पीक पैसेवारीचा हा अहवाल ३० सप्टेंबर रोजी महसूल विभागाने जारी केला आहे. जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी ५० पैशाच्यावर ६३ पैसे एवढी निघाली. सर्वाधिक ७० पैसे मारेगाव तर सर्वात कमी ५७ पैसे उमरखेड तालुक्याची नजर पीक पैसेवारी नोंदविली गेली. जिल्ह्यात एकूण दोन हजार १५८ गावे आहेत. त्यातील दोन हजार ५३ गावातील क्षेत्र लागवडी योग्य आहे. जिल्ह्याची सरासरी पीक पैसेवारी (६३ पैसे) पाहता पीक परिस्थिती उत्तम व समाधानकारक असल्याचे दिसून येते. यंदाचा खरीप हंगाम खरोखरच चांगला असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील घटकांकडून सांगितले जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, पीकेव्हीचे संशोधक, तज्ज्ञ शेतकरी आदी सर्वच जण पीक परिस्थिती उत्तम असल्याचे सांगत आहे. खुद्द माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही या समाधानकारक पीक परिस्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यातच नजर पीक पैसेवारी ६३ पैसे निघाल्याने पिकाच्या चांगल्या असलेल्या परिस्थितीवर आणखी मोहर उमटली आहे. त्यातही कपाशीचे पीक समाधानकारक असल्याचे दिसून येते. त्याची सरासरी ६३ पैसे एवढी निघाली आहे. सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग याचीही स्थिती चांगली असल्याचे महसूल विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होते. यंदाची खरीप पीक पैसेवारीसुद्धा ब्रिटीशकालीन पद्धतीनुसारच काढली गेली. मुळात या पद्धतीला शेतकरी व त्यांच्यासाठी लढणाऱ्या शेतकरी नेत्यांचा विरोध होता. ५० टक्क्याच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्याच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे ब्रिटीशकालीन समीकरण आहे. मात्र हे समीकरण बदलविण्याचा विचार शासन स्तरावर सुरू होता. त्यासाठी ५० पैशाऐवजी ६७ पैसे हा पीक परिस्थितीच्या चांगल्या-वाईट अवस्थेचा निकष ठरविला गेला. मात्र राज्यात बहुतांश ठिकाणी पीक पैसेवारी ६७ पैशापेक्षा कमी आली. ते पाहता संपूर्ण राज्यातच टंचाई सदृश स्थिती जाहीर करावी लागेल व त्या अनुषंगाने शेतकरी-नागरिकांना सारामाफी, करमाफी, व्याज माफी द्यावी लागेल याची जाणीव सरकारला झाली. म्हणूनच सरकारने यावर्षी पुन्हा पैसेवारीसाठी ब्रिटीशकालीन ५० टक्क्याच्या निकषाचीच पद्धत अवलंबिण्याचा निर्णय घेतला. अवघ्या काही दिवसातच ६७ पैशाचा आदेश रद्द करून पुन्हा ५० पैसे कायम ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला. (जिल्हा प्रतिनिधी) वणी तालुक्यातील दोन गावांची पैसेवारी कमीसंपूर्ण जिल्ह्यात पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे पैसेवारीच्या नोंदींवरून दिसून येत असले तरी वणी तालुक्यातील दोन गावांची पैेसेवारी मात्र ५० पैशापेक्षा कमी निघाली आहे. त्यामध्ये जुगाद व कोलगावचा समावेश आहे. अर्थात तेथील पीक परिस्थिती चांगली नसल्याचे महसुली नोंदींवरुन दिसून येते.