शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजासह पीककर्ज वसुली

By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST

अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे.

व्याजमाफीला हरताळ : शेतकरी सापडले आर्थिक अडचणीतहिवरी : अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला असून अशाही स्थितीत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची व्याजासह वसुली सुरू केली आहे. राज्य शासनाच्या व्याजमाफीच्या धोरणाला या बँकांनी हरताळ फसला आहे. राज्य शासनाने एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून संपूर्ण व्याजाची वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियमिततेचा जबर फटका बसला आहे. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. वाचलेल्या पिकात जेमतेम लागवड खर्च शेतकऱ्यांच्या हाती आला. यावर्षी कापसाचा हंगाम तर अवघ्या चार महिन्यातच संपला. सोयाबीन आणि तूर या पिकांचीही अतिशय दयनीय स्थिती होती. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव अतिशय कमी केले होते. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेपोटी बाजारभाव मिळत नसतानाही माल विकण्यास भाग पाडण्यात आले. आता शेतकऱ्याच्या घरात कापसाचे बोंड नसताना, सोयाबीनचा दाणा नसताना या दोन्ही मालाचे बाजारभाव दुपटीने वाढले आहे. एकंदरच बाजारपेठेतील उलाढालीतून थेट व्यापारी मालामाल झाले आहे. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. अशाच आर्थिक संकटाच्या काळात शासनाकडून केलेली व्याजमाफी ही केवळ पोकळ घोषणा म्हणून राहिली आहे. पुढील हंगामासाठी पीककर्ज मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मागील वर्षीच्या पीककर्जाची व्याजासह वसुली केली आहे. आता तर काही शेतकऱ्यांपुढे थकीत कर्जाची रक्कम भरण्याची सोय उरली नाही. पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही प्रमाणात शेतकऱ्यांना व्याजमाफीचा दिलासा देण्यात आला. मात्र राष्ट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते. कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवायला लागला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते या सर्वांची निकड भागविण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. (वार्ताहर)खरिपाची लगबगअतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करीत आहे. शेतीच्या मशागतीची कामे माघारली असून त्यातच मान्सून धडकल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे आता शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बी-बियाण्यातून तजविजीकडे दुर्लक्ष आहे.