शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजासह पीककर्ज वसुली

By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST

अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे.

व्याजमाफीला हरताळ : शेतकरी सापडले आर्थिक अडचणीतहिवरी : अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला असून अशाही स्थितीत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची व्याजासह वसुली सुरू केली आहे. राज्य शासनाच्या व्याजमाफीच्या धोरणाला या बँकांनी हरताळ फसला आहे. राज्य शासनाने एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून संपूर्ण व्याजाची वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियमिततेचा जबर फटका बसला आहे. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. वाचलेल्या पिकात जेमतेम लागवड खर्च शेतकऱ्यांच्या हाती आला. यावर्षी कापसाचा हंगाम तर अवघ्या चार महिन्यातच संपला. सोयाबीन आणि तूर या पिकांचीही अतिशय दयनीय स्थिती होती. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव अतिशय कमी केले होते. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेपोटी बाजारभाव मिळत नसतानाही माल विकण्यास भाग पाडण्यात आले. आता शेतकऱ्याच्या घरात कापसाचे बोंड नसताना, सोयाबीनचा दाणा नसताना या दोन्ही मालाचे बाजारभाव दुपटीने वाढले आहे. एकंदरच बाजारपेठेतील उलाढालीतून थेट व्यापारी मालामाल झाले आहे. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. अशाच आर्थिक संकटाच्या काळात शासनाकडून केलेली व्याजमाफी ही केवळ पोकळ घोषणा म्हणून राहिली आहे. पुढील हंगामासाठी पीककर्ज मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मागील वर्षीच्या पीककर्जाची व्याजासह वसुली केली आहे. आता तर काही शेतकऱ्यांपुढे थकीत कर्जाची रक्कम भरण्याची सोय उरली नाही. पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही प्रमाणात शेतकऱ्यांना व्याजमाफीचा दिलासा देण्यात आला. मात्र राष्ट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते. कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवायला लागला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते या सर्वांची निकड भागविण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. (वार्ताहर)खरिपाची लगबगअतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करीत आहे. शेतीच्या मशागतीची कामे माघारली असून त्यातच मान्सून धडकल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे आता शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बी-बियाण्यातून तजविजीकडे दुर्लक्ष आहे.