शहरं
Join us  
Trending Stories
1
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
2
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
3
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
4
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
5
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
6
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
7
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
8
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
9
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
10
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
11
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
12
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न
13
'फक्त कॅमेऱ्यासमोरच तुमचं रक्त उसळतं' राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, विचारले ३ प्रश्न!
14
Vaishnavi Hagawane Death Case : ..हा तर मुलींचा छळ करणारा ‘मुळशी पॅटर्न’;तृप्ती देसाई यांच्याकडून संताप  
15
पार्किंगची सोय नसेल तर खरेदी करता येणार नाही कार, सरकार कठोर नियम लागू करण्याच्या तयारीत
16
एक भारतीय कंपनी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा मोठी! हर्ष गोयंकांनी आकडेवारी मांडली
17
"...तर त्यांचे राजकारणात कसे तुकडे करायचे हे आपण ठरवू"; उद्धव ठाकरे कामगारांसमोर काय बोलले?
18
Vaishnavi Hagawane Death Case: 'जणू वैष्णवीच आमच्याकडे परतली'; बाळाला पाहताच कस्पटे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला
19
'पहलगाम हल्ल्याचे मुख्य आरोपी अजूनही मोकाट...', जयराम रमेश यांचे पंतप्रधान मोदींना 4 प्रश्न
20
"सुप्रिया सुळेंची केंद्रात मंत्री होण्याची तीव्र इच्छा, शरद पवार दुसऱ्या पक्षात जाताना दिसतील"; संजय शिरसाटांचं मोठं भाकित

राष्ट्रीयकृत बँकांकडून व्याजासह पीककर्ज वसुली

By admin | Updated: May 20, 2015 00:17 IST

अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे.

व्याजमाफीला हरताळ : शेतकरी सापडले आर्थिक अडचणीतहिवरी : अतिवृष्टी आणि वादळी पाऊस यामुळे शेतीचे सर्वच हंगाम उद्ध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला असून अशाही स्थितीत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाची व्याजासह वसुली सुरू केली आहे. राज्य शासनाच्या व्याजमाफीच्या धोरणाला या बँकांनी हरताळ फसला आहे. राज्य शासनाने एक लाखापर्यंतच्या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रीयकृत बँकांकडून संपूर्ण व्याजाची वसुली केली जात आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या अनियमिततेचा जबर फटका बसला आहे. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. वाचलेल्या पिकात जेमतेम लागवड खर्च शेतकऱ्यांच्या हाती आला. यावर्षी कापसाचा हंगाम तर अवघ्या चार महिन्यातच संपला. सोयाबीन आणि तूर या पिकांचीही अतिशय दयनीय स्थिती होती. शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत येण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी शेतमालाचे भाव अतिशय कमी केले होते. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेपोटी बाजारभाव मिळत नसतानाही माल विकण्यास भाग पाडण्यात आले. आता शेतकऱ्याच्या घरात कापसाचे बोंड नसताना, सोयाबीनचा दाणा नसताना या दोन्ही मालाचे बाजारभाव दुपटीने वाढले आहे. एकंदरच बाजारपेठेतील उलाढालीतून थेट व्यापारी मालामाल झाले आहे. त्याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. अशाच आर्थिक संकटाच्या काळात शासनाकडून केलेली व्याजमाफी ही केवळ पोकळ घोषणा म्हणून राहिली आहे. पुढील हंगामासाठी पीककर्ज मंजूर करताना राष्ट्रीयकृत बँकांनी मागील वर्षीच्या पीककर्जाची व्याजासह वसुली केली आहे. आता तर काही शेतकऱ्यांपुढे थकीत कर्जाची रक्कम भरण्याची सोय उरली नाही. पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडलेला आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही प्रमाणात शेतकऱ्यांना व्याजमाफीचा दिलासा देण्यात आला. मात्र राष्ट्रीयकृत बँका प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येते. कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवायला लागला आहे. शेतीची मशागत, बी-बियाणे, खते या सर्वांची निकड भागविण्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. (वार्ताहर)खरिपाची लगबगअतिशय प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करीत आहे. शेतीच्या मशागतीची कामे माघारली असून त्यातच मान्सून धडकल्याच्या बातम्या येत आहे. त्यामुळे आता शेतातील कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. बी-बियाण्यातून तजविजीकडे दुर्लक्ष आहे.