शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात

By admin | Updated: July 1, 2015 00:26 IST

गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे.

शेतकरी काळजीत : पाऊस गायब, उर्वरित पेरण्या खोळंबल्या, संकट संपता संपेनादारव्हा : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. वातावरणात कोणताही बदल होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात पुरेसा पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवले जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.दारव्हा तालुक्यात ६६ हजार ३३५ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाचा खंड पडल्याने उर्वरित क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहे. विशेषत: सोयाबीनची पेरणी बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर मान्सूनपूर्व कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. जूनच्या मध्यान्हात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती त्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर १७ ते २२ जूनदरम्यान पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या साधल्या. परंतु २३ जूननंतर पावसाने दडी माल्याने कोवळे अंकुर मान टाकायला लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते कसेबसे पाणी देऊन पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण पाणी किती दिवस पुरेल याची शाश्वती नाही. कारण आतापर्यंत तालुक्यात एकूण २१२ मिमी पाऊस पडला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे या पाण्याच्या भरवशावर जास्त दिवस राहता येणार नाही.आधीच शेतकऱ्यांवर जणू संकटाची मालिका सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पीक स्थिती बरोबर नाही. त्यातच यावर्षी पीककर्जाच्या पुनर्गठनाची समस्या निर्माण झाली होती. परंतु अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी तजवीज करून ठेवली होती. १४ जूनपासून पावसाला वेग आला. त्या काळात वातावरण चांगले दिसल्याने अनेकांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर २० जूनला १५ मिमी, २१ जूनला ७९ मिमी पाऊस पडला. या पावसाने पिके निघाली. त्यानंतर पाऊस जणू गायबच झाला. उष्णता वाढल्याने पीक करपायला लागले आहे. पाऊस न आल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांवर दिसायला लागले आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसात पाऊस् न आल्यास दुबार पेरणी शिवाय गत्यंतर राहणार नाही अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांची काळजी सध्या संपता संपत नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावर्षी तरी ही परिस्थिती बदलावी, यासाठी प्रार्थना सुरू आहे. तालुक्यात सध्या १५ हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या गेल्या. वेळेत पाऊस न पडल्यास पेरणीला उशिर होईल. उशिरा पेरणी झालेल्या पिकाला चांगला अ‍ॅव्हरेज मिळत नाही. त्यामुळे पेरणी झालेले व पेरणी न झालेले असे दोन्ही बाजूचे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)