शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
3
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
4
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
5
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
6
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
7
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
8
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
9
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
10
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
11
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
12
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
13
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
14
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
15
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
16
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
17
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
18
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
19
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
20
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!

५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात

By admin | Updated: July 1, 2015 00:26 IST

गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे.

शेतकरी काळजीत : पाऊस गायब, उर्वरित पेरण्या खोळंबल्या, संकट संपता संपेनादारव्हा : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. वातावरणात कोणताही बदल होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात पुरेसा पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवले जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.दारव्हा तालुक्यात ६६ हजार ३३५ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाचा खंड पडल्याने उर्वरित क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहे. विशेषत: सोयाबीनची पेरणी बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर मान्सूनपूर्व कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. जूनच्या मध्यान्हात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती त्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर १७ ते २२ जूनदरम्यान पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या साधल्या. परंतु २३ जूननंतर पावसाने दडी माल्याने कोवळे अंकुर मान टाकायला लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते कसेबसे पाणी देऊन पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण पाणी किती दिवस पुरेल याची शाश्वती नाही. कारण आतापर्यंत तालुक्यात एकूण २१२ मिमी पाऊस पडला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे या पाण्याच्या भरवशावर जास्त दिवस राहता येणार नाही.आधीच शेतकऱ्यांवर जणू संकटाची मालिका सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पीक स्थिती बरोबर नाही. त्यातच यावर्षी पीककर्जाच्या पुनर्गठनाची समस्या निर्माण झाली होती. परंतु अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी तजवीज करून ठेवली होती. १४ जूनपासून पावसाला वेग आला. त्या काळात वातावरण चांगले दिसल्याने अनेकांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर २० जूनला १५ मिमी, २१ जूनला ७९ मिमी पाऊस पडला. या पावसाने पिके निघाली. त्यानंतर पाऊस जणू गायबच झाला. उष्णता वाढल्याने पीक करपायला लागले आहे. पाऊस न आल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांवर दिसायला लागले आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसात पाऊस् न आल्यास दुबार पेरणी शिवाय गत्यंतर राहणार नाही अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांची काळजी सध्या संपता संपत नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावर्षी तरी ही परिस्थिती बदलावी, यासाठी प्रार्थना सुरू आहे. तालुक्यात सध्या १५ हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या गेल्या. वेळेत पाऊस न पडल्यास पेरणीला उशिर होईल. उशिरा पेरणी झालेल्या पिकाला चांगला अ‍ॅव्हरेज मिळत नाही. त्यामुळे पेरणी झालेले व पेरणी न झालेले असे दोन्ही बाजूचे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)