शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात

By admin | Updated: July 1, 2015 00:26 IST

गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे.

शेतकरी काळजीत : पाऊस गायब, उर्वरित पेरण्या खोळंबल्या, संकट संपता संपेनादारव्हा : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने तालुक्यातील ५० हजार हेक्टरवरील पीक संकटात सापडले आहे. वातावरणात कोणताही बदल होताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन दिवसात पुरेसा पाऊस न पडल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवले जाण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.दारव्हा तालुक्यात ६६ हजार ३३५ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली. पावसाचा खंड पडल्याने उर्वरित क्षेत्रातील पेरण्या खोळंबल्या आहे. विशेषत: सोयाबीनची पेरणी बाकी असल्याचे सांगितले जात आहे. यावर्षी मान्सून चांगला राहील असा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर मान्सूनपूर्व कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. जूनच्या मध्यान्हात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी तयारी करून ठेवली होती त्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या. त्यानंतर १७ ते २२ जूनदरम्यान पाऊस झाल्याने पेरण्या चांगल्या साधल्या. परंतु २३ जूननंतर पावसाने दडी माल्याने कोवळे अंकुर मान टाकायला लागले आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते कसेबसे पाणी देऊन पीक जगविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण पाणी किती दिवस पुरेल याची शाश्वती नाही. कारण आतापर्यंत तालुक्यात एकूण २१२ मिमी पाऊस पडला आहे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. त्यामुळे या पाण्याच्या भरवशावर जास्त दिवस राहता येणार नाही.आधीच शेतकऱ्यांवर जणू संकटाची मालिका सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पीक स्थिती बरोबर नाही. त्यातच यावर्षी पीककर्जाच्या पुनर्गठनाची समस्या निर्माण झाली होती. परंतु अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन खरीप हंगामासाठी तजवीज करून ठेवली होती. १४ जूनपासून पावसाला वेग आला. त्या काळात वातावरण चांगले दिसल्याने अनेकांनी पेरण्या आटोपल्या. त्यानंतर २० जूनला १५ मिमी, २१ जूनला ७९ मिमी पाऊस पडला. या पावसाने पिके निघाली. त्यानंतर पाऊस जणू गायबच झाला. उष्णता वाढल्याने पीक करपायला लागले आहे. पाऊस न आल्याने त्याचा दुष्परिणाम पिकांवर दिसायला लागले आहे. परंतु येत्या दोन-तीन दिवसात पाऊस् न आल्यास दुबार पेरणी शिवाय गत्यंतर राहणार नाही अशी परिस्थिती आहे.शेतकऱ्यांची काळजी सध्या संपता संपत नसल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यावर्षी तरी ही परिस्थिती बदलावी, यासाठी प्रार्थना सुरू आहे. तालुक्यात सध्या १५ हजार हेक्टरवरील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या गेल्या. वेळेत पाऊस न पडल्यास पेरणीला उशिर होईल. उशिरा पेरणी झालेल्या पिकाला चांगला अ‍ॅव्हरेज मिळत नाही. त्यामुळे पेरणी झालेले व पेरणी न झालेले असे दोन्ही बाजूचे शेतकरी अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)