शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

आतापर्यंत एक लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के, तर एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला केवळ दोन टक्के व्याज आकारले जात होते. तीन लाखांवरील कर्जाला वार्षिक पावणे अकरा टक्के व्याज आकारले जाते. झिरो टक्के आणि दोन टक्के व्याज असले तरी त्यातील फरकाची भरपाई शासन बॅंकांंना थेट देत होते. या कर्जाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात नव्हती, त्यांना अप्रत्यक्ष माफी अथवा कमी टक्क्याची सवलत मिळत होती. परंतु शासनाने आता या हंगामापासून या सवलत योजनेत काहीसा बदल केला आहे.

ठळक मुद्देयोजनेत बदल : थकबाकीदार वाढणार, नव्या कर्जाला मर्यादा, जिल्हा बॅंकेपुढे वसुलीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीक कर्जावरील व्याजाच्या योजनेत शासनाने बदल केल्याने आता कर्जासोबतच व्याजाचीही वसुली बॅंका शेतकऱ्यांकडून करणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून यथावकाश या व्याजाची रक्कम बॅंक खात्यात जमा हाेणार आहे. या नव्या पॅटर्नमुळे पीक कर्जासह व्याजाच्या वसुलीचे आव्हान अन्य बॅंकांसह  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेपुढे उभे राहणार आहे. आतापर्यंत एक लाखापर्यंतच्या कर्जाला शून्य टक्के, तर एक ते तीन लाखापर्यंतच्या कर्जाला केवळ दोन टक्के व्याज आकारले जात होते. तीन लाखांवरील कर्जाला वार्षिक पावणे अकरा टक्के व्याज आकारले जाते. झिरो टक्के आणि दोन टक्के व्याज असले तरी त्यातील फरकाची भरपाई शासन बॅंकांंना थेट देत होते. या कर्जाची वसुली शेतकऱ्यांकडून केली जात नव्हती, त्यांना अप्रत्यक्ष माफी अथवा कमी टक्क्याची सवलत मिळत होती. परंतु शासनाने आता या हंगामापासून या सवलत योजनेत काहीसा बदल केला आहे. यानुसार आता बॅंका शेतकऱ्यांकडून शून्य व दोन टक्के व्याजातील उर्वरित फरकाची थेट वसुली करेल. कुण्या शेतकऱ्याकडून किती व्याज वसूल केले गेले, याची यादी शासनाला सादर करेल, त्यानंतर शासन यथावकाश (किमान एक-दोन वर्षात) व्याजाची ही बॅंकांनी वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट जमा करेल. व्याज माफीचा हा नवा पॅटर्न बॅंकांसह शेतकऱ्यांसाठीही अडचणीचा ठरणार आहे. कारण बॅंकांना शेतकऱ्यांकडून कर्जासह व्याजाचीही वसुली करावी लागणार आहे. मग शेतकऱ्यांना व्याजाची ही रक्कम शासनाकडून मिळविण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागले. एकट्या यवतमाळ जिल्हा बॅंकेचा विचार केल्यास  सुमारे ५० हजार शेतकऱ्यांकडील व्याजाची ही रक्कम केवळ खरीप हंगामात ५० कोटींच्या घरात जाते. जेथे मूळ पीक कर्जच वसूल होत नाही, तेथे व्याजाची रक्कम कशी वसूल होणार असा प्रश्न आहे. पर्यायाने बॅंकेची थकबाकी वाढेल, शेतकरी थकबाकीदार दिसेल, त्यामुळे नव्या पीक कर्जाला तो पात्र ठरणार नाही. ही नवी गुंतागुंत सर्वांसाठीच अडचणीची ठरणार आहे. गेल्या हंगामात जिल्हा बॅंकेने पाचशे कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. त्यापैकी मार्च अखेरीस ८० टक्के अर्थात ४०० कोटी रुपयांच्या पीक कर्जाची वसुली अपेक्षित आहे. आतापर्यंत केवळ सात कोटी रुपये वसूल झाले आहेत. शेतकरी मार्चच्या तोंडावर थकबाकी भरत असल्याने हा आकडा सध्या कमी दिसत असल्याचे बॅंकेकडून सांगण्यात आले. जिल्हा बॅंकेच्या मुदती कर्जाची थकबाकी २५ कोटींच्या घरात आहे. याशिवाय बिगर शेती कर्ज ४० ते ४५ कोटी थकीत आहे. त्यात वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ३५ कोटींचा समावेश आहे. याशिवाय काही जिनिंग - प्रेसिंगकडेही थकबाकी आहे.  

जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांपुढील आव्हाने वाढणार  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा नवा अध्यक्ष ४ जानेवारी रोजी निवडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेकांची मोर्चेबांधणी सुरू असली तरी नवा अध्यक्ष हा शेतकऱ्यांचे आणि बॅंकेचेही हित पाहणारा असावा, केवळ वैयक्तिक स्वार्थ व कार्यकर्ते - मतदारांचे हित पाहणारा नसावा, असा सूर आहे. नव्या अध्यक्षांपुढे बॅंकेचा गेल्या १३ वर्षात डबघाईस आलेला कारभार सुधारणे, शेतकऱ्यांमध्ये ‘आपली बॅंक’ हा विश्वास निर्माण करणे, कारभारात पारदर्शकता आणणे, बॅंकेचा विकास करणे, शेतकरी हिताचे निर्णय घेणे, कर्ज, व्याजाची वसुली करून भांडवल - ठेवी वाढविणे, भ्रष्टाचाराचा लागलेला डाग पुसणे, नोकरभरती ‘कोटा’ पद्धत न राबविता पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, अशी विविध आव्हाने राहणार आहेत. ही सर्व आव्हाने पेलणारा सक्षम, अनुभवी आणि सर्वांना घेऊन चालणारा अध्यक्ष बॅंकेला मिळतो का, की नेता ठरवेल तोच चेहरा मिळतो, याकडे जिल्हाभरातील शेतकरी आणि बॅंकेच्या यंत्रणेचे लक्ष लागले आहे. गेली १३ वर्षे बॅंकेत ‘मिलीभगत’ कारभार चालला. ‘अर्थ’कारणामुळे बॅंक बदनाम झाली. प्रकरणे कोर्टात गेली, किमान आता तरी सत्ताधारी नेत्याशी भिडणारा खमक्या अध्यक्ष बॅंकेला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जbankबँक