शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; टीईटीतून सुट

By अविनाश साबापुरे | Updated: January 12, 2024 17:53 IST

शिक्षण संचालकांकडून शिक्षकांनी मिळविले पत्र

यवतमाळ : टीईटीच्या अटीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्याचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर शिक्षण संचालकांनी आता पदोन्नतीसाठी टीईटी लागू नसल्याबाबतचे मार्गदर्शनपर पत्र जिल्हा परिषदेला दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो व राज्यातील हजारो शिक्षकांच्या बढतीचा मार्ग मोकळा होणार आहे.

यवतमाळ जिल्हा परिषदमध्ये विषय शिक्षक पदस्थापनेचा प्रश्न मागील चार-पाच वर्षांपासून रखडला होता. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघासह सर्व संघटनांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली. तर ५ जानेवारी रोजी शिक्षक समन्वय महासंघाने जिल्हा परिषदेपुढे एक दिवसीय धरणे आंदोलनही केले. या धरणे आंदोलनाच्या वेळेस शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. मात्र, विषय शिक्षक पदोन्नतीकरिता टीईटीची अट शिथिल करण्यात आल्याचे शिक्षण संचालकांचे पत्र असल्याशिवाय पदोन्नती करता येणार नाही, असे स्पष्ट केले होते.

या अनुषंगाने सर्व संघटना समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष मधुकर काठोळे व प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार यांनी पुणे येथे शिक्षण संचालकांकडे धाव घेतली. शिक्षण संचालक शरद गोसावी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची भेट घेऊन त्यांना पदोन्नतीबाबत निवेदन दिले. या निवेदनाची शिक्षण संचालकांनी तात्काळ दखल घेत ११ जानेवारी रोजी विषय शिक्षक पदोन्नतीकरिता टीईटीची अट शिथिल करण्यात आल्याचे पत्र निर्गमित केले. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील विषय शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. 

यवतमाळात ६३० जणांना बढतीची संधी

यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये ६३० शिक्षकांची आता विषय शिक्षक म्हणून पदोन्नती होण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. संचालकांनी पत्र दिल्यामुळे आता विषय शिक्षक पदोन्नती तात्काळ करावी, अशी मागणी शिक्षक संघाचे नेते मधुकर काठोळे, जिल्हाध्यक्ष राजेश उदार, सरचिटणीस विठ्ठलदास आरु व समन्वय महासंघाच्या वतीने किरण मानकर, रमाकांत मोहरकर यांनी केली आहे.

संचालकांच्या पत्रात काय म्हटले?

शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शासनाने २५ ऑक्टोबर २०२३ रोजी निर्गमित केलेल्या पत्रानुसार, १३ फेब्रुवारी २०१३ पूर्वीची नियुक्ती असलेल्या शिक्षकांना वेतोन्नती देताना टीईटीची अट शिथिल करण्यात आली आहे. परंतु अशा शिक्षकांनी एनसीटीईने विहित केलेली शैक्षणिक, व्यावसायिक अहर्ता (टीईटी वगळता) धारण केलेली असणे बंधनकारक आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ