शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देआगारांचेही दररोज १२ लाख रुपयांचे नुकसान; बिनपगारीमुळे यंत्रणा त्रस्त

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा फटका लोकवाहिनीला बसला आहे. अजूनही अनेक गावांसाठी बसफेऱ्या नाहीत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत हा अनुभव आहे. याचा परिणाम वाहक आणि चालकांवर काही प्रमाणात होत आहे. ड्यूटी लागत नसल्याने त्यांची गैरहजेरी लागते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच अनेक कामगारांचे वेतन कमी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना मोठी सर्कस करावी लागते. अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते. कोरोनापूर्वी ४५ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत होते. आता ३३ लाख उत्पन्न मिळत असल्याने महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्पन्न वाढण्याच्यादृष्टीने पूर्ण क्षमतेने वाहतूक होणे गरजेचे आहे.

रजा घेण्यासाठी कामगारांवर जोरकोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी बसफेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी काही कामगारांना रजा घेण्यास भाग पाडले जाते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब कामगार संघटना ठासून सांगत असली तरी महामंडळाचे अधिकारी मात्र या बाबीला नकार देत आहे. प्रत्येक कामगाराला दररोज ड्यूटी मिळतेच, असे सांगितले जाते.

जिल्ह्यात बसचे उत्पन्न ४५ ऐवजी ३३ लाखमागील नऊ महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नाची बाजू कमकुवत झाली आहे. पूर्ण लाॅकडाऊन असताना एसटीची चाके थांबली होती. यानंतर काही क्षमतेने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली. या काळात मोठा आर्थिक दणका एसटीला बसला. आताही दररोज १२ लाख रुपये कमी उत्पन्न महामंडळाला मिळते.

हजेरी भरली जावीचालक-वाहक कामगिरीवर येतात. मात्र, काही लोकांना स्पेअरमध्ये ठेवले जाते. कामगिरी नसल्यास परत पाठविले जाते. अशावेळी त्यांना रजा घ्यावी लागते. त्यांचे आर्थिक नुकसान होते. महामंडळाने कामावर हजर झालेल्या कामगारांची हजेरी भरून द्यावी.- राहुल धार्मिक, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

पूर्ण क्षमतेने वाहतूकयवतमाळ आगारातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. सोबतच माल वाहतूक करण्यासाठीही कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे यवतमाळ आगारात सर्वच चालक-वाहकांना कामगिरी दिली जाते. ग्रामीण भागातील सर्वच मार्गांवरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.- विवेक बनसोड, आगार प्रमुख, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी