शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी बसस्थानकांवर परतले मात्र, एसटीच्या फेऱ्याच कमी, चालक-वाहकांना बसतो फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देआगारांचेही दररोज १२ लाख रुपयांचे नुकसान; बिनपगारीमुळे यंत्रणा त्रस्त

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वैश्विक महामारी कोरोनाचा मोठा फटका लोकवाहिनीला बसला आहे. अजूनही अनेक गावांसाठी बसफेऱ्या नाहीत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील फेऱ्यांबाबत हा अनुभव आहे. याचा परिणाम वाहक आणि चालकांवर काही प्रमाणात होत आहे. ड्यूटी लागत नसल्याने त्यांची गैरहजेरी लागते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. आधीच अनेक कामगारांचे वेतन कमी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना त्यांना मोठी सर्कस करावी लागते. अशातच महामंडळाकडून पगार कपात केली जाते. त्यामुळे त्यांचे मासिक आर्थिक बजेट बिघडते. जिल्ह्यातील अपवाद वगळता आगारांमध्ये कर्मचाऱ्यांना ड्यूटीची प्रतीक्षा करून अखेर घरी जावे लागते, त्यांची हजेरी भरली जात नाही. अलीकडे प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, काही गावांमधून प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगत  फेऱ्या सुरू केलेल्या नाहीत. परिणामी उत्पन्नही कमी मिळत आहे. १२ लाख रुपये एवढे सरासरी उत्पन्न कमी झाल्याचे सांगितले जाते. कोरोनापूर्वी ४५ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत होते. आता ३३ लाख उत्पन्न मिळत असल्याने महामंडळाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. उत्पन्न वाढण्याच्यादृष्टीने पूर्ण क्षमतेने वाहतूक होणे गरजेचे आहे.

रजा घेण्यासाठी कामगारांवर जोरकोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एसटी बसफेऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. अशावेळी काही कामगारांना रजा घेण्यास भाग पाडले जाते. या प्रकारात त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब कामगार संघटना ठासून सांगत असली तरी महामंडळाचे अधिकारी मात्र या बाबीला नकार देत आहे. प्रत्येक कामगाराला दररोज ड्यूटी मिळतेच, असे सांगितले जाते.

जिल्ह्यात बसचे उत्पन्न ४५ ऐवजी ३३ लाखमागील नऊ महिन्यांपासून एसटीच्या उत्पन्नाची बाजू कमकुवत झाली आहे. पूर्ण लाॅकडाऊन असताना एसटीची चाके थांबली होती. यानंतर काही क्षमतेने बस वाहतुकीला परवानगी देण्यात आली. या काळात मोठा आर्थिक दणका एसटीला बसला. आताही दररोज १२ लाख रुपये कमी उत्पन्न महामंडळाला मिळते.

हजेरी भरली जावीचालक-वाहक कामगिरीवर येतात. मात्र, काही लोकांना स्पेअरमध्ये ठेवले जाते. कामगिरी नसल्यास परत पाठविले जाते. अशावेळी त्यांना रजा घ्यावी लागते. त्यांचे आर्थिक नुकसान होते. महामंडळाने कामावर हजर झालेल्या कामगारांची हजेरी भरून द्यावी.- राहुल धार्मिक, विभागीय सचिव, एसटी कामगार संघटना

पूर्ण क्षमतेने वाहतूकयवतमाळ आगारातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू आहे. सोबतच माल वाहतूक करण्यासाठीही कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे यवतमाळ आगारात सर्वच चालक-वाहकांना कामगिरी दिली जाते. ग्रामीण भागातील सर्वच मार्गांवरही बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.- विवेक बनसोड, आगार प्रमुख, यवतमाळ

टॅग्स :state transportएसटी