शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हाटीवर फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 21:54 IST

ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ती अशी, ‘सांग पाटला काय करु, उपड पऱ्हाटी पेर गहू’. अशीच अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च पाण्यात : बोगस बियाण्यांमुळे शेतकरी त्रस्त

आॅनलाईन लोकमतकळंब : ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे. ती अशी, ‘सांग पाटला काय करु, उपड पऱ्हाटी पेर गहू’. अशीच अवस्था आता शेतकऱ्यांची झाली आहे. ही अवस्था बीटी कपाशीच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी बोंडअळीचा प्रादूर्भाव झालेल्या पऱ्हाटीवर ट्रॅक्टर फिरवित आहे.कळंब तालुक्यात बहुतेकांच्या शेतात गुलाबी बोंडअळीने कहर केला आहे. काहींची शेतीच्या-शेती अळीने फस्त केली. असे एकही शेत सुटले नाही, जिथे अळीचा प्रादूर्भाव नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग पुरता मेटाकुटीस आला आहे. लाखो रुपये खर्च करून एकही रुपयाची मिळकत मिळालेली नाही आणि येत्या काळात मिळण्याची शक्यताही नाही. त्यामुळे कपाशीच्या उभ्या पिकात जनावरे चारणे, ट्रॅक्टर फिरविणे असे प्रकार सर्रास सुरु आहेत. कपाशीच्या प्रत्येक बोंडात अळी आहे. वरून बोंड जरी चांगले दिसत असले तरी त्यातून कापूस फुटणार नाही, हे आता उघड झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी पऱ्हाटी उपटून गहू अथवा हरबरा लावण्याची लगबग सुुरु केली आहे. परंतु यातून कपाशीचे नुकसान कदापिही भरुन निघणारे नाही.तालुक्यातील महादेव काळे, शंकर इंगोले, महेश ढोले, नथ्थू सोनाळे, आनंदराव जगताप, सुभाष भगत, सुधाकर मोहनापूरे, वसंत ठाकरे यांच्यासह अनेकांची शेती अळ्यांनी फस्त केली. काहींनी कपाशी उपडणे सुरु केले आहे. आता या ठिकाणी गहू अथवा हरभरा लावून चार पैसे मिळकत मिळविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु लाखो रुपयांचे जे नुकसान झाले, त्याची भरपाई कोण आणि कशी देणार, हा प्रश्न आहे. कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला.