शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:45 IST

शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली.

ठळक मुद्देवाहतुकीची कोंडी : नगरपालिकेसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली. परंतु बांधकाम करताना कुणीही पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष दिले नाही. अशीच अवस्था शहरातील इतर प्रतिष्ठानांचीही आहे. त्यामुळे शहरात पार्किगची समस्या गंभीर झाली आहे. यामुळे शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघात घडत आहे. नगरपालिकेसह वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहे.उमरखेड शहरातील रस्ते आधीच लहान आहेत. त्यातच या रस्त्यालगत व्यापारी संकुले निर्माण झाली आहे. विविध दुकाने असल्याने या परिसरात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येतात. अलिकडे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. ग्राहक आपल्या वाहनाने दुकानात येतात. परंतु वाहन उभे कुठे करावे, असा प्रश्न असतो. एखाद्या दुकानात खरेदीसाठी जायचे असल्यास पहिला प्रश्न वाहन पार्किंगचाच येतो. अनेकदा नागरिक रस्त्यावर वाहने पार्किंग करून दुकानात जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशातच एखादे अवजड वाहन आल्यास तानस्तास वाहतूक खोळंबते. वाहनाच्या रांगा लागतात. काही जण कर्णकर्कश हॉर्न वाजवितात.उमरखेड नगरपालिका व काही खासगी व्यक्तींचे व्यापारी गाळे आहे. या संकुलाचे बांधकाम थेट रस्त्यापर्यंत आले आहे. खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. तसेच शहरातील बसस्थानक ते माहेश्वरी चौकापर्यंत दोनही बाजूने रस्त्यावरच फळांचे व इतर विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या असतात. हा सर्व प्रकार नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. पुसद मार्गावरील स्टेट बँक आॅफ इंडिया, गांधी चौकातील ग्रामीण बँक, बसस्थानकासमोरील महाराष्टÑ बँक, सेंट्रल बँक या सर्व बँका खासगी इमारतीमध्ये सुरू आहे. बँकेत येणारे सर्व ग्राहक रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करतात. त्यामुळे या रस्त्यावरून साधी रिक्षाही जाऊ शकत नाही. काही ठिकाणी तर व्यापारी संकुलाच्या पायºया थेट डांबरी रस्त्यापर्यंत आल्या आहेत.शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था दिसत नाही. मनमानेल त्या पद्धतीने वाहने उभी असतात. वाहतूक पोलीसही गांभीर्याने हा विषय घेत नाही.वाहतूक पोलीस नावालाचउमरखेड शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकाचौकात वाहतूक शिपायांची नियुक्ती केलेली असते. माहेश्वरी चौक, गांधी चौक, नाग चौक, पुसद रोड, ढाणकी रोड, महागाव रोड या भागात पोलीस कधीच आपले कर्तव्य बजावताना दिसत नाही. वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर कधी तरी पोलीस धावून येतात. तोपर्यंत नागरिकांना मन:स्ताप सहन करावा लागतो.