शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पोलीस ठाण्यातील भंगार डेंग्यूच्या डासांचा अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 21:52 IST

सर्वत्र स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाची साथ असताना पोलीस ठाण्यांच्या आवारातील भंगार साहित्य हे डेंग्यूच्या डासांचा अड्डा बनलेला असल्याचे

ठळक मुद्देअधिकारी-कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात : बहुतांश शासकीय कार्यालये ठरली आश्रयस्थान

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सर्वत्र स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू, मलेरियाची साथ असताना पोलीस ठाण्यांच्या आवारातील भंगार साहित्य हे डेंग्यूच्या डासांचा अड्डा बनलेला असल्याचे खळबळजनक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या आॅन द स्पॉट रिपोर्टिंगमध्ये उघड झाले आहे. हे चित्र केवळ यवतमाळ शहर किंवा वडगाव रोड पोलीस ठाण्याचे नसून संपूर्ण जिल्ह्यात बहुतांश हीच स्थिती आहे. डेंग्यूच्या डासांनी चक्क पोलीस ठाण्यात आश्रय घेतल्याने अधिकारी, कर्मचारी व तेथे ये-जा असलेल्या फिर्यादी, साक्षीदार, पंच, जामीनदार यांचे आरोग्यही धोक्यात सापडले.कोणत्याही पोलीस ठाण्यात भेट दिल्यास ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात जप्तीतील भंगार माल दृष्टीस पडतो. तेथील मोटरसायकली, वर्षभर न काढले जाणारे कुलर, दारुचे डबे, चारचाकी वाहने व त्यात साचलेले पाणी हे साथरोगाचे उत्पत्ती स्थळ बनले आहे. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डास, अळ्या आदींचे वास्तव्य आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाºयांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. कोर्ट-कचेरीचा मामला असल्याने हे भंगार निकाली काढण्यासाठी विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु हे दुर्लक्षच भविष्यात मानवी जीविताशी खेळ ठरू शकते. बहुतांश पोलीस ठाण्यात जप्तीतील मालाची अशीच स्थिती आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात झाडेझुडूपे वाढली आहेत. त्यामुळे सरपटणाºया प्राण्यांचाही धोका संभवतो. मुंबई व उपनगर पोलीस ठाण्यात अशा प्रकारामुळे सर्व कर्मचाºयांनाच डेंग्यूची लागण झाल्याचे महानगरपालिकेच्या सर्वेक्षणात आढळून आले. त्यानंतरही पोलीस यंत्रणा सावध झालेली नाही. भंगार साहित्याची अशी स्थिती राज्य उत्पादन शुल्क, डाक कार्यालय परिसर व अन्य शासकीय कार्यालयांमध्ये असण्याची शक्यता आहे. हिवताप निर्मूलन विभागाने आपल्या मोहिमेचा शुभारंभ खुद्द शासकीय कार्यालयापासूनच करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.पालिकेकडून फॉगिंगचा केवळ सोपस्कारग्रामीण भागात आरोग्य संवर्धनासाठी विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जातात. किटकजन्य आजार नियंत्रणासाठी हिवताप विभागाकडून स्वतंत्र मोहीम राबविली जाते. शहरात मात्र असा कोणताच उपक्रम राबविला जात नाही. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाला तुबंलेली गटारे स्वच्छ करण्यासाठी वेळ नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याच्या तक्रारीनंतर नगपरिषद आरोग्य विभागाकडून केवळ फॉगिंंगचा सोपस्कार पार पाडला जातो. तोपर्यंत किटकजन्य आजार पसरलेला असतो. यातही जीवघेणा असलेल्या डेंग्यूपासून सुटका करून घेण्यासाठी नगरपरिषदेकडे कोणतीच यंत्रणा नाही. त्यामुळे शासकीय कार्यालयांतील डास उत्पत्तीतून शहरात किटकजन्य आजाराची साथ पसरण्याची भीती वर्तविली जात आहे.